शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

विक्रम, मिनिडोअर व्यवसाय करणारे हे मतदार नाहीत का ? आंदोलन कर्त्यांचा शासनाला प्रश्न

By राजेश भोस्तेकर | Updated: November 10, 2022 16:49 IST

विक्रम, मिनिडोअर व्यवसाय करणारे हे मतदार नाहीत का ? आमच्याच प्रलंबित मागण्या दूर करण्यात राजकीय नेते, प्रशासन, शासन चालढकलपणा करीत आहेत.

अलिबाग : विक्रम, मिनिडोअर व्यवसाय करणारे हे मतदार नाहीत का ? आमच्याच प्रलंबित मागण्या दूर करण्यात राजकीय नेते, प्रशासन, शासन चालढकलपणा करीत आहेत. पालकमंत्री यांनी जनता दरबारमध्ये जिल्हाधिकारी यांना बैठक लावण्याचे निर्देश देऊनही कानाडोळा केला. त्यामुळे आम्हाला आमच्या न्यायिक मागण्यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला लागला आहे. गुरुवार सायंकाळ पर्यंत निर्णय न झाल्यास शुक्रवार पासून रस्त्यावर एकही वाहन फिरणार नसून उपोषण सोडले जाणार नाही असा इशारा रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. 

जिल्ह्यातील १३ हजार कुटुंब विक्रम, मिनीडोअर व्यवसायावर चरितार्थ चालवत आहेत. मात्र या व्यवसायावर प्रशासन कुऱ्हाड फिरविण्याचा उद्योग करीत आहेत. गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित न्यायिक मागण्यासाठी व्यवसायिक आवाज उठवत आहेत. मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही आहे. यासाठी अखेर आमरण उपोषणाचा पवित्रा उचलण्यात आला आहे. गुरुवारी १० नोव्हेंबर रोजी शेकडो विक्रम, मिनीडोअर चालकांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर याना शिष्टमंडळाने दिले आहे. 

विक्रम, मिनीडोअर हा व्यवसाय गेल्या पंचवीस वर्षांपासून जिह्यात सुरू आहे. अनेक वाहने ही जुनी झाली आहेत. २० व २५ वर्ष जुनी झालेल्या वाहनांना दोन वर्ष वाढवून द्या, जुन्या परमिट वरील रिक्षा स्क्रॅप केल्यानंतर बदली वाहनाला बीएस वीआय मानांकन वाहनाला सीएनजी वापरण्यास मान्यता द्या. परवाना धारकांना व्यवसाय कराचा भरणा करताना व्याज सूट द्यावी, परवाना हस्तांतरण शुल्कात कपात करावी. विलंब वाहन नोंदणी दंड माफ करावा, महाड किंवा माणगाव येथे पासिंग ट्रक मंजूर करावा. जिल्ह्यातील विक्रम, इको, मिनीडोअर, मॅजिक, टॅक्सी या प्रवासी वाहनांना पर्यटनास जाण्यास परवानगी द्यावी. या प्रमुख वीस प्रलंबित मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी याना दिले आहे.

गेल्या तीन वर्षापासून धरमतर येथे जलसमाधी, टाळा बंद अशी आंदोलने केली आहेत. मुख्यमंत्री, पालकमंत्री याच्या सोबत दोन दोन वेळा बैठका झाल्या. मात्र आमच्या मागण्या जैसे थे आहेत. मागण्या मान्य न झाल्यास शुक्रवार पासून सर्व खाजगी प्रवासी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. तर १३ हजार कुटुंबाचा विचार शासनाने आणि लोकप्रतिनिधी यांनी केला नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल.

विजय पाटील, अध्यक्ष, रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर संघटना

टॅग्स :Raigadरायगड