शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वेलटवाडी गाव होणार आत्मनिर्भर , आदिवासींना २२ हक्काची घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 00:55 IST

अलिबाग शहरापासून अवघ्या सात किमी अंतरावर खानाव ग्रामपंचायत आहे. याच ग्रामपंचायत हद्दीमध्ये डोंगर कपाऱ्यात वेलटवाडी आदिवासी वाडी आहे. वेलटवाडीमधील ग्रामस्थांची घरे २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीने, तसेच ३ जून रोजी झालेल्या ‘निसर्ग चक्रीवादळाने’ उद्ध्वस्त झाली होती.

रायगड : भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी देशातील नागरिकांना प्रोत्साहित केले आहे. अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायतीमधील वेलटवाडी आदिवासी वाडीमधील रहिवाशांना आत्मनिर्भर उपक्रमांतर्गत त्यांच्या हक्काची २२ घरे बांधून देण्यात येणार आहेत. खानाव ग्रामपंचायत, सरकार आणि आॅल इंडिया रिहॅबिलिटेशन संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम राज्यातील पहिलाच असण्याची शक्यता आहे.अलिबाग शहरापासून अवघ्या सात किमी अंतरावर खानाव ग्रामपंचायत आहे. याच ग्रामपंचायत हद्दीमध्ये डोंगर कपाऱ्यात वेलटवाडी आदिवासी वाडी आहे. वेलटवाडीमधील ग्रामस्थांची घरे २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीने, तसेच ३ जून रोजी झालेल्या ‘निसर्ग चक्रीवादळाने’ उद्ध्वस्त झाली होती. डोक्याला दगड आणि आकाश पांघरून घेण्याची वेळ येथील आदिवासी वाडीतील नागरिकांवर आली होती. यासाठी त्यांना वन विभागाच्या जागेमध्ये तात्पुरत्या झोपड्या उभारून देण्यात आल्या. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी मदत केली होती,झोपड्या उभारण्यात आल्याने, वन विभागाने जमीन खाली करण्यासाठी सातत्याने तगादा लावला होता. तात्पुरत्या झोपड्या दूर करण्याची कार्यवाही वनविभागाने सुरू केली होती. या कार्यवाहीला स्थगिती मिळावी, अशी मागणी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.प्रवीण ठाकूर यांनी राज्याचे महसूलमंत्री संजय राठोड, वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली होती. सरकारकडून निर्णय येत नव्हता, तर दुसरीकडे वन विभाग चांगलेच हट्टाला पेटले होते. ग्रामस्थांनी स्वखर्चाने वेलवली येथे ३१ गुंठे जमीन विकत घेतली. आॅल इंडिया रिहॅबिलेटेशन संस्था, रायगड महसूल विभाग आणि खानाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आता या जागेत आदिवासींना कायमस्वरूपी २२ घरे बांधून देणार आहे.या आत्मनिर्भर गावामध्ये घरांसोबतच समाज मंदिर, बगीचे, शौचालये, रस्ते, विद्युत दिवे, सीसीटीव्ही यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत.सरकार, प्रशासन आणि आॅल इंडिया रिहॅबिलिटेशन संस्थेचे डॉक्टर साजिद सैयद यांच्या सहकार्यामुळेच आम्ही हा निर्णय घेऊ शकलो. आदिवासी बांधवांच्या पाठीशी आम्ही नेहमीच राहिलो आहोत. आताच्या उपक्रमामुळे त्यांना हक्काचे घर मिळणार आहे. त्यामुळे हे गाव आत्मनिर्भर गाव म्हणून ओळखले जाईल, असे रायगड काँग्रेसचे उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी सांगितले.अनंत गोंधळी यांनी आदिवासी बांधवांना निवारा मिळण्यासाठी केलेली धडपड खरोखरच कौतुकास्पद असल्याचे आॅल इंडिया रिहायब्लिटेशन संस्थेचे डॉक्टर साजिद सैयद यांनी सांगितले.आत्मनिर्भर गाव भूमिपूजन कार्यक्रम मंगळवारी (दि.१ सप्टेंबर) रोजी भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार, अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, आॅल इंडिया रिहायब्लिटेशन संस्थेचे डॉक्टर साजिद सैयद, सरपंच अनिता गोंधळी, काँग्रेस उपाध्यक्ष अनंत गोंधळी, जितेंद्र गोंधळी आदिवासी बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायती हद्दीत असलेल्या डोंगरावर २५ आदिवासी कुटुंबे गेली दीडशे वर्षे राहत होती. २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीत वेलटवाडीवरील डोंगराला तडे गेल्याने या आदिवासी कुटुंबाना जिल्हा प्रशासनाने स्थलांतरित करून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शाळेमध्ये आणि बांधलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हलवले. वेलटवाडीवरील आपला संसार उघड्यावर ठेवून ती कुटुंबे शाळेत वास्तव्य करू लागली. प्रशासनाकडून या आदिवासी कुटुंबांच्या वास्तव्यासाठी एका शिक्षकाची जागा, आदिवासींना घरे बांधण्यासाठी देण्यात आली. विशेष म्हणजे, प्रशासनाने घरकूल योजनेतून घरे बांधण्याची मंजुरीही दिली. मात्र, याच महिन्यात आलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळाने’ या आदिवासी बांधवांना पुन्हा उघड्यावर आणले. आता वनविभागाच्या वारंवार येणाºया नोटिसांपासून सुटका झाली. गावात स्वत:चे घर मिळणार असल्याने आम्ही समाधानी असल्याचे संदेश गडखळ यांनी दिले.

टॅग्स :Raigadरायगड