शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

वेलटवाडी गाव होणार आत्मनिर्भर , आदिवासींना २२ हक्काची घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 00:55 IST

अलिबाग शहरापासून अवघ्या सात किमी अंतरावर खानाव ग्रामपंचायत आहे. याच ग्रामपंचायत हद्दीमध्ये डोंगर कपाऱ्यात वेलटवाडी आदिवासी वाडी आहे. वेलटवाडीमधील ग्रामस्थांची घरे २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीने, तसेच ३ जून रोजी झालेल्या ‘निसर्ग चक्रीवादळाने’ उद्ध्वस्त झाली होती.

रायगड : भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी देशातील नागरिकांना प्रोत्साहित केले आहे. अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायतीमधील वेलटवाडी आदिवासी वाडीमधील रहिवाशांना आत्मनिर्भर उपक्रमांतर्गत त्यांच्या हक्काची २२ घरे बांधून देण्यात येणार आहेत. खानाव ग्रामपंचायत, सरकार आणि आॅल इंडिया रिहॅबिलिटेशन संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम राज्यातील पहिलाच असण्याची शक्यता आहे.अलिबाग शहरापासून अवघ्या सात किमी अंतरावर खानाव ग्रामपंचायत आहे. याच ग्रामपंचायत हद्दीमध्ये डोंगर कपाऱ्यात वेलटवाडी आदिवासी वाडी आहे. वेलटवाडीमधील ग्रामस्थांची घरे २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीने, तसेच ३ जून रोजी झालेल्या ‘निसर्ग चक्रीवादळाने’ उद्ध्वस्त झाली होती. डोक्याला दगड आणि आकाश पांघरून घेण्याची वेळ येथील आदिवासी वाडीतील नागरिकांवर आली होती. यासाठी त्यांना वन विभागाच्या जागेमध्ये तात्पुरत्या झोपड्या उभारून देण्यात आल्या. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी मदत केली होती,झोपड्या उभारण्यात आल्याने, वन विभागाने जमीन खाली करण्यासाठी सातत्याने तगादा लावला होता. तात्पुरत्या झोपड्या दूर करण्याची कार्यवाही वनविभागाने सुरू केली होती. या कार्यवाहीला स्थगिती मिळावी, अशी मागणी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.प्रवीण ठाकूर यांनी राज्याचे महसूलमंत्री संजय राठोड, वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली होती. सरकारकडून निर्णय येत नव्हता, तर दुसरीकडे वन विभाग चांगलेच हट्टाला पेटले होते. ग्रामस्थांनी स्वखर्चाने वेलवली येथे ३१ गुंठे जमीन विकत घेतली. आॅल इंडिया रिहॅबिलेटेशन संस्था, रायगड महसूल विभाग आणि खानाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आता या जागेत आदिवासींना कायमस्वरूपी २२ घरे बांधून देणार आहे.या आत्मनिर्भर गावामध्ये घरांसोबतच समाज मंदिर, बगीचे, शौचालये, रस्ते, विद्युत दिवे, सीसीटीव्ही यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत.सरकार, प्रशासन आणि आॅल इंडिया रिहॅबिलिटेशन संस्थेचे डॉक्टर साजिद सैयद यांच्या सहकार्यामुळेच आम्ही हा निर्णय घेऊ शकलो. आदिवासी बांधवांच्या पाठीशी आम्ही नेहमीच राहिलो आहोत. आताच्या उपक्रमामुळे त्यांना हक्काचे घर मिळणार आहे. त्यामुळे हे गाव आत्मनिर्भर गाव म्हणून ओळखले जाईल, असे रायगड काँग्रेसचे उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी सांगितले.अनंत गोंधळी यांनी आदिवासी बांधवांना निवारा मिळण्यासाठी केलेली धडपड खरोखरच कौतुकास्पद असल्याचे आॅल इंडिया रिहायब्लिटेशन संस्थेचे डॉक्टर साजिद सैयद यांनी सांगितले.आत्मनिर्भर गाव भूमिपूजन कार्यक्रम मंगळवारी (दि.१ सप्टेंबर) रोजी भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार, अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, आॅल इंडिया रिहायब्लिटेशन संस्थेचे डॉक्टर साजिद सैयद, सरपंच अनिता गोंधळी, काँग्रेस उपाध्यक्ष अनंत गोंधळी, जितेंद्र गोंधळी आदिवासी बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायती हद्दीत असलेल्या डोंगरावर २५ आदिवासी कुटुंबे गेली दीडशे वर्षे राहत होती. २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीत वेलटवाडीवरील डोंगराला तडे गेल्याने या आदिवासी कुटुंबाना जिल्हा प्रशासनाने स्थलांतरित करून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शाळेमध्ये आणि बांधलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हलवले. वेलटवाडीवरील आपला संसार उघड्यावर ठेवून ती कुटुंबे शाळेत वास्तव्य करू लागली. प्रशासनाकडून या आदिवासी कुटुंबांच्या वास्तव्यासाठी एका शिक्षकाची जागा, आदिवासींना घरे बांधण्यासाठी देण्यात आली. विशेष म्हणजे, प्रशासनाने घरकूल योजनेतून घरे बांधण्याची मंजुरीही दिली. मात्र, याच महिन्यात आलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळाने’ या आदिवासी बांधवांना पुन्हा उघड्यावर आणले. आता वनविभागाच्या वारंवार येणाºया नोटिसांपासून सुटका झाली. गावात स्वत:चे घर मिळणार असल्याने आम्ही समाधानी असल्याचे संदेश गडखळ यांनी दिले.

टॅग्स :Raigadरायगड