शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

वाहन पार्किंग समस्या गंभीर

By admin | Updated: October 5, 2015 23:57 IST

वाढत्या नागरीकरणामुळे शहरात वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नसल्याने वाहनांच्या

नागोठणे : वाढत्या नागरीकरणामुळे शहरात वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नसल्याने वाहनांच्या कोंडाळ्यात सध्या नागोठणे गुरफटून गेले आहे. बिल्डर सुद्धा इमारतीमध्ये योग्य त्या प्रमाणात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देत नसल्यामुळे अनेक इमारतींमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांची वाहने रस्त्यावरच उभी राहात आहेत. भविष्यात पार्किंगचे योग्य ते नियोजन न केल्यास पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवेल असे नागरिकांचे म्हणणे आहे. १९८४ नंतर येथे आयपीसीएल (आताची रिलायन्स) चा प्रकल्प आला आणि औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. त्यामुळे येथे बैठी असणारी घरे जावून इमारती उभ्या करण्याचा कार्यक्र म चालू झाला, तो आजपर्यंत सुरूच आहे. नागोठणे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण, एसटी - रेल्वेची मुबलक सुविधा उपलब्ध असल्यामुळे नोकरी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी विभागातील नागरिकांसह नोकरदार वर्गाने येथे स्थायिक होण्याचा सपाटा लावला. याचा फायदा बिल्डर मंडळींनी घेत शहरात अनेक ठिकाणी इमारती उभ्या केल्या.काही इमारती वगळता बहुतांशी इमारतींच्या खाली चारचाकी वाहने उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध करण्यात आलेली नाही. केवळ दहा ते वीस सदनिकांमध्ये वाहने पार्क करण्यासाठी जागा देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी फक्त चार ते आठच वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे. बहुतांशी सदनिकाधारकांकडे चारचाकी वाहने असल्याने आपण राहात असलेल्या इमारतीच्या आवारात गाडी उभी करण्यासाठी त्यांना जागाच नसल्याने नाईलाजाने वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. इमारतीबाहेर रस्ता नसेल, तर काही वाहने एखाद्याच्या मालकीच्या जागेत संमती घेवून पार्ककरावी लागतात. ग्रामपंचायतीने सुनियोजनासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.