शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

वाहन पार्किंग समस्या गंभीर

By admin | Updated: October 5, 2015 23:57 IST

वाढत्या नागरीकरणामुळे शहरात वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नसल्याने वाहनांच्या

नागोठणे : वाढत्या नागरीकरणामुळे शहरात वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नसल्याने वाहनांच्या कोंडाळ्यात सध्या नागोठणे गुरफटून गेले आहे. बिल्डर सुद्धा इमारतीमध्ये योग्य त्या प्रमाणात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देत नसल्यामुळे अनेक इमारतींमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांची वाहने रस्त्यावरच उभी राहात आहेत. भविष्यात पार्किंगचे योग्य ते नियोजन न केल्यास पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवेल असे नागरिकांचे म्हणणे आहे. १९८४ नंतर येथे आयपीसीएल (आताची रिलायन्स) चा प्रकल्प आला आणि औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. त्यामुळे येथे बैठी असणारी घरे जावून इमारती उभ्या करण्याचा कार्यक्र म चालू झाला, तो आजपर्यंत सुरूच आहे. नागोठणे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण, एसटी - रेल्वेची मुबलक सुविधा उपलब्ध असल्यामुळे नोकरी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी विभागातील नागरिकांसह नोकरदार वर्गाने येथे स्थायिक होण्याचा सपाटा लावला. याचा फायदा बिल्डर मंडळींनी घेत शहरात अनेक ठिकाणी इमारती उभ्या केल्या.काही इमारती वगळता बहुतांशी इमारतींच्या खाली चारचाकी वाहने उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध करण्यात आलेली नाही. केवळ दहा ते वीस सदनिकांमध्ये वाहने पार्क करण्यासाठी जागा देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी फक्त चार ते आठच वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे. बहुतांशी सदनिकाधारकांकडे चारचाकी वाहने असल्याने आपण राहात असलेल्या इमारतीच्या आवारात गाडी उभी करण्यासाठी त्यांना जागाच नसल्याने नाईलाजाने वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. इमारतीबाहेर रस्ता नसेल, तर काही वाहने एखाद्याच्या मालकीच्या जागेत संमती घेवून पार्ककरावी लागतात. ग्रामपंचायतीने सुनियोजनासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.