शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

वाहन पार्किंग समस्या गंभीर

By admin | Updated: October 5, 2015 23:57 IST

वाढत्या नागरीकरणामुळे शहरात वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नसल्याने वाहनांच्या

नागोठणे : वाढत्या नागरीकरणामुळे शहरात वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नसल्याने वाहनांच्या कोंडाळ्यात सध्या नागोठणे गुरफटून गेले आहे. बिल्डर सुद्धा इमारतीमध्ये योग्य त्या प्रमाणात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देत नसल्यामुळे अनेक इमारतींमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांची वाहने रस्त्यावरच उभी राहात आहेत. भविष्यात पार्किंगचे योग्य ते नियोजन न केल्यास पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवेल असे नागरिकांचे म्हणणे आहे. १९८४ नंतर येथे आयपीसीएल (आताची रिलायन्स) चा प्रकल्प आला आणि औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. त्यामुळे येथे बैठी असणारी घरे जावून इमारती उभ्या करण्याचा कार्यक्र म चालू झाला, तो आजपर्यंत सुरूच आहे. नागोठणे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण, एसटी - रेल्वेची मुबलक सुविधा उपलब्ध असल्यामुळे नोकरी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी विभागातील नागरिकांसह नोकरदार वर्गाने येथे स्थायिक होण्याचा सपाटा लावला. याचा फायदा बिल्डर मंडळींनी घेत शहरात अनेक ठिकाणी इमारती उभ्या केल्या.काही इमारती वगळता बहुतांशी इमारतींच्या खाली चारचाकी वाहने उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध करण्यात आलेली नाही. केवळ दहा ते वीस सदनिकांमध्ये वाहने पार्क करण्यासाठी जागा देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी फक्त चार ते आठच वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे. बहुतांशी सदनिकाधारकांकडे चारचाकी वाहने असल्याने आपण राहात असलेल्या इमारतीच्या आवारात गाडी उभी करण्यासाठी त्यांना जागाच नसल्याने नाईलाजाने वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. इमारतीबाहेर रस्ता नसेल, तर काही वाहने एखाद्याच्या मालकीच्या जागेत संमती घेवून पार्ककरावी लागतात. ग्रामपंचायतीने सुनियोजनासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.