शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

दिवेआगर खाडीच्या झडपा तुटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:13 IST

शेती जाणार पाण्याखाली : वादळामुळे शेतक ऱ्यांवर दुहेरी संकट

दिघी : वादळामुळे अगोदरच शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले असताना, त्यातच आता शिस्ते- दिवेआगर मार्गावरील खाडीचे दरवाजे तुटल्याने समुद्राच्या भरतीचे पाणी शेतात घुसू लागले आहे. मात्र, संबंधित प्रशासन हातावर हात ठेवून गप्प बसल्याचे दिसते आहे. यामुळे शेतकºयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.श्रीवर्धन तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक शेतकºयांचे शेती व घरांचे नुकसान झाले आहे. वादळग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नाही. हे सहन करीत असताना कुठे चार घास खायला मिळतील, या उद्देशाने जगणारा शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. दिवेआगर खाडीलगत बोर्लीपंचतन परिसरातील आठ ते दहा गावांतील अनेक शेतकºयांची खारशेती जमीन आहे. त्यात शेतकरी दरवर्षी भाताचे उत्पन्न घेतात. खाडीतून शेतात समुद्राचे पाणी जाऊ नये, यासाठी भक्कम दरवाजे असलेली ‘सात उघडी’ आहेत. मात्र, दोन महिन्यांपूर्वी उधाणाच्या भरतीमुळे हे दरवाजे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकºयांची शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. सध्या शेतकरी भातशेती करीत असल्याने भरतीचे पाणी खाडीद्वारे शेतीत येऊ लागल्याने शेतकºयांच्या संकटात आणखीच वाढ झाली आहे. हातात येत असलेल्या लावणीच्या पिकाचे नुकसान झाले, तर लावणी कशी करणार? पावसात भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतीत शिरण्याची शक्यता आहे. मग अशा वेळी शेतीचे नुकसानच होण्याची शक्यता नकारता येत नाही.झडपा बसविण्यासाठीचे अंदाजपत्रक पेण येथील विभागीय कार्यालयात मंजुरीसाठी पाठविले असल्याचे समजते. याबाबत खारभूमी सर्वेक्षण व अन्वेक्षण विभागाचे उपविभागीय अधिकारी अशोक जाधव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.या वर्षी शेतीचे उत्पन्न नाहीलावणीपूर्वी खाडीला झडपा बसविणे आवश्यक होते. मात्र, ते अद्यापही न झाल्याने भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर शेतात साचले आहे. या खाºया पाण्यात भाताची लावणी कशी करणार? असा प्रश्न संतोष कांबळे व संतोष गोविलकर या शेतकºयांनी उपस्थित केला आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.