शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वाहन पार्क करताय कर्जतकरांनो सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:44 IST

मुंबई-पुण्याच्या मध्यवर्तीचे ठिकाण म्हणून कर्जतची ओळख आहे, तिसरी मुंबई म्हणून कर्जत तालुका झपाट्याने वाढत चालला आहे

कर्जत : मुंबई-पुण्याच्या मध्यवर्तीचे ठिकाण म्हणून कर्जतची ओळख आहे, तिसरी मुंबई म्हणून कर्जत तालुका झपाट्याने वाढत चालला आहे, त्यामुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहेत. तालुक्याचे मुख्य शहर म्हणून कर्जतची ओळख आहे. या ठिकाणी येणाºया वाहनांमुळे शहरातील रहदारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे, यावर उपाय म्हणूण कर्जत नगर परिषद, वाहतूक नियंत्रण अधिकारी (आरटीओ) आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने कर्जत शहरातील पार्किंग आणि रहदारी विषयी एक आराखडा यापूर्वीच तयार केला आहे, त्यावर अंमलबजावणी सुरू होती, त्यामुळे कुठेही आणि कशीही वाहने उभी करणाºयांवर दंडात्मक कारवाई होत होती. मात्र, संबंधित ठेकादाराचा ठेका संपल्याने चार-पाच महिने कारवाई बंद होती. मात्र, ही कारवाई सोमवार, ३१ जुलैपासून सुरू होणार आहे, त्यामुळे कर्जतच्या रस्त्यावर कशीही, कुठेही वाहने उभी करणाºयांनो सावधान, तुमच्यावरही कारवाई होऊ शकते.कर्जत नगरपरिषदेच्या स्थापनेला २५ वर्षे झाली, त्याआधी कर्जत ग्रामपंचायत अस्तित्वात होती, कर्जत हे मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या रेल्वेस्थानकांच्या मधील शहर असल्याने त्याचा विकास झपाट्याने सुरू आहे. तिसरी मुंबई म्हणून आता कर्जत शहराची ओळख दिसू लागली आहे. शहराबाहेरील मुख्य रस्ते रु ंद झाले असून ते चांगले झाले आहेत, त्यावर वाढलेली रहदारी, त्यामुळे कर्जत शहरात येणारी वाहनांची संख्या त्यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेत होणारी वाहतूककोंडी हा आता कर्जतकरांचा रोजचाच त्रास झाला आहे. त्यामधून सर्वसामान्य नागरिकाला चालणे कठीण झाले आहे. कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते काही प्रमाणात रु ंद झाले आहेत. मात्र, शहरातील काही इमारती या ग्रामपंचायत असताना बांधल्या गेल्या आहेत, त्यामुळे त्यांना इमारतीखाली पार्किंग नाही आणि काही इमारती या नगरपरिषद झाल्यावर बांधण्यात आल्या आहेत. मात्र, या इमारतीना पार्किंगची सोय न करता सर्व नियम धाब्यावर बसवून बिल्डरांनी इमारती बांधल्या आहेत. त्या इमारतींमध्ये फ्लॅट घेणाºयांना सध्या पार्किंग सोय नसल्यामुळे ते आपली मोटारसायकल असो की कार, रस्त्यावर उभी करत आहेत.शहरातील काही रस्ते तर पार्किंग झोन झाले आहेत. त्या रस्त्यांवर दिवसा जा की रात्री फेरी मारा, त्या ठिकाणी गाड्या उभ्या आहेत, ही बाब चिंताजनक आहे.बाजारपेठेतील रस्ते काही प्रमाणात रु ंद झाले आहेत. मात्र, ते रु ंद झालेले रस्ते फक्त रात्रीच मोठे झालेले दिसतात. अन्यथा, दिवसा प्रत्येक दुकानदाराचे सामान आपल्या दुकानाच्या पाच-सात फूट बाहेर आलेले असते, काहींच्या दुकानाचे फलक रस्त्यावर ठेवलेले असतात आणि त्याच रस्त्यावर फेरीवाले असतात आणि त्यामध्ये एखादे वाहन आले तर वाहतूककोंडी होते. त्यामधून रस्ता शोधून पादचारी चालत असतो.