शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

निर्माल्याचा सेंद्रिय खतासाठी उपयोग

By admin | Updated: September 26, 2015 01:02 IST

शहर व ग्रामीण भागातील १७२ खेडी व गावांमध्ये तब्बल १५ हजार गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. यामध्ये दीड दिवसाचे, पाच दिवसांचे, बारशी व अनंतचतुर्दशीसह साखरचौथ

पेण : शहर व ग्रामीण भागातील १७२ खेडी व गावांमध्ये तब्बल १५ हजार गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. यामध्ये दीड दिवसाचे, पाच दिवसांचे, बारशी व अनंतचतुर्दशीसह साखरचौथ गणरायाच्या आगमनासह जागोजागी निर्माल्याचा मोठा खच पडतो. मात्र पेण शहर व ग्रामीण परिसरातील बहुतांश बाप्पांचे विसर्जन वाहत्या प्रवाही पाण्यात केले जाते. या विसर्जनस्थळावर सध्या पडणाऱ्या निर्माल्याच्या कचऱ्यामुळे जलप्रदूषण होऊ नये आणि पर्यावरणाची हानी टळावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत येथे स्वच्छता केली जाते. काही ठिकाणी सामाजिक स्वयंसेवी संस्था, युवा मंडळे व आध्यात्मिक सांप्रदायाचे स्वयंसेवक यासाठी पुढाकार घेवून विसर्जनस्थळी व नदीतटावरील निर्माल्य उचलण्याची कार्यवाही गेल्या चार, पाच वर्षांपासून करीत असल्याने या संकलित केलेल्या निर्माल्याचा सेंद्रिय खत म्हणून जागोजागी उपयोग केला जात आहे. पेण शहरातील साई मंदिर कसार तलावात शहरातील बहुतांश घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.बाप्पाच्या विसर्जनासाठी पेण पालिकेने तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश बसवून निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली आहे.विसर्जनाच्या दिवशी गणेशभक्तांच्या स्वागतासाठी उभारलेल्या स्वागतकक्षातून गणेशभक्तांना निर्माल्य कलशात टाकण्याचे आवाहन केले आहे. मात्र दीड,पाच आणि सात दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन केल्यानंतर गळ्यातील हार, फुले इतर पदार्थ पाण्यावर तरंगत होते. ते नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांनी काढून टाकत स्वच्छता केली. या तलावात पोहण्यासाठी लहानासह मोठमोठी मंडळी येत असल्याने या साईमंदिर परिसर व कासार तलावातील निर्माल्य काढून ते आंबेघर धामणी येथील सेंद्रिय खत बनविणाऱ्या डम्पिंग ग्राऊंडवर नेण्यात आले.ग्रामीण विभागात बहुतांश ठिकाणी नदी, नाले व समुद्र खाड्यातील वाहत्या प्रवाही पाण्यामध्ये बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन केले जात असल्याने खाडीत टाकलेल्या निर्माल्य भरतीच्या पाण्याबरोबर वाहत समुद्राकडे जाते. खाडी व नदी तटावरील निर्माल्य त्या त्या ठिकाणच्या नेमलेल्या जागांवर टाकण्यात येते. याशिवाय गावोगावच्या सार्वजनिक तलावातील विसर्जनानंतरचे निर्माल्य संबंधित ग्रामपंचायतीमार्फत काढून स्वच्छ केले जाते. काही ठिकाणी या निर्माल्याचा उपयोग कंपोस्ट खत तयार करण्यासाठी केला जातो.सध्या स्वच्छ भारत अभियानाबद्दल जनजागृती झाल्याने गावच्या स्वयंसेवी संस्था व युवा मंडळे याबाबीत दक्षता घेवून विसर्जनस्थळावरील अनावश्यक कचरा व निर्माल्य तातडीने उचलण्याची व्यवस्था करतात. यामुळे पाणी व परिसर स्वच्छ राहण्यात मदत मिळते. निर्माल्य ठरवून दिलेल्या जागेवर, तेथे असणाऱ्या स्वयंसेवकांच्या हाती दिले तर त्याची योग्य विल्हेवाट लागेल अशी भावना जागरु क नागरिकांनी व्यक्त केली.