शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निर्माल्याचा सेंद्रिय खतासाठी उपयोग

By admin | Updated: September 26, 2015 01:02 IST

शहर व ग्रामीण भागातील १७२ खेडी व गावांमध्ये तब्बल १५ हजार गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. यामध्ये दीड दिवसाचे, पाच दिवसांचे, बारशी व अनंतचतुर्दशीसह साखरचौथ

पेण : शहर व ग्रामीण भागातील १७२ खेडी व गावांमध्ये तब्बल १५ हजार गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. यामध्ये दीड दिवसाचे, पाच दिवसांचे, बारशी व अनंतचतुर्दशीसह साखरचौथ गणरायाच्या आगमनासह जागोजागी निर्माल्याचा मोठा खच पडतो. मात्र पेण शहर व ग्रामीण परिसरातील बहुतांश बाप्पांचे विसर्जन वाहत्या प्रवाही पाण्यात केले जाते. या विसर्जनस्थळावर सध्या पडणाऱ्या निर्माल्याच्या कचऱ्यामुळे जलप्रदूषण होऊ नये आणि पर्यावरणाची हानी टळावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत येथे स्वच्छता केली जाते. काही ठिकाणी सामाजिक स्वयंसेवी संस्था, युवा मंडळे व आध्यात्मिक सांप्रदायाचे स्वयंसेवक यासाठी पुढाकार घेवून विसर्जनस्थळी व नदीतटावरील निर्माल्य उचलण्याची कार्यवाही गेल्या चार, पाच वर्षांपासून करीत असल्याने या संकलित केलेल्या निर्माल्याचा सेंद्रिय खत म्हणून जागोजागी उपयोग केला जात आहे. पेण शहरातील साई मंदिर कसार तलावात शहरातील बहुतांश घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.बाप्पाच्या विसर्जनासाठी पेण पालिकेने तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश बसवून निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली आहे.विसर्जनाच्या दिवशी गणेशभक्तांच्या स्वागतासाठी उभारलेल्या स्वागतकक्षातून गणेशभक्तांना निर्माल्य कलशात टाकण्याचे आवाहन केले आहे. मात्र दीड,पाच आणि सात दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन केल्यानंतर गळ्यातील हार, फुले इतर पदार्थ पाण्यावर तरंगत होते. ते नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांनी काढून टाकत स्वच्छता केली. या तलावात पोहण्यासाठी लहानासह मोठमोठी मंडळी येत असल्याने या साईमंदिर परिसर व कासार तलावातील निर्माल्य काढून ते आंबेघर धामणी येथील सेंद्रिय खत बनविणाऱ्या डम्पिंग ग्राऊंडवर नेण्यात आले.ग्रामीण विभागात बहुतांश ठिकाणी नदी, नाले व समुद्र खाड्यातील वाहत्या प्रवाही पाण्यामध्ये बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन केले जात असल्याने खाडीत टाकलेल्या निर्माल्य भरतीच्या पाण्याबरोबर वाहत समुद्राकडे जाते. खाडी व नदी तटावरील निर्माल्य त्या त्या ठिकाणच्या नेमलेल्या जागांवर टाकण्यात येते. याशिवाय गावोगावच्या सार्वजनिक तलावातील विसर्जनानंतरचे निर्माल्य संबंधित ग्रामपंचायतीमार्फत काढून स्वच्छ केले जाते. काही ठिकाणी या निर्माल्याचा उपयोग कंपोस्ट खत तयार करण्यासाठी केला जातो.सध्या स्वच्छ भारत अभियानाबद्दल जनजागृती झाल्याने गावच्या स्वयंसेवी संस्था व युवा मंडळे याबाबीत दक्षता घेवून विसर्जनस्थळावरील अनावश्यक कचरा व निर्माल्य तातडीने उचलण्याची व्यवस्था करतात. यामुळे पाणी व परिसर स्वच्छ राहण्यात मदत मिळते. निर्माल्य ठरवून दिलेल्या जागेवर, तेथे असणाऱ्या स्वयंसेवकांच्या हाती दिले तर त्याची योग्य विल्हेवाट लागेल अशी भावना जागरु क नागरिकांनी व्यक्त केली.