शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलिविरुद्ध अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
6
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
7
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
8
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
9
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
10
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
11
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
12
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
13
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
14
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
15
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
16
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
17
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
18
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
19
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
20
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!

नवनवीन तंत्रज्ञान वापरा

By admin | Updated: March 25, 2017 01:27 IST

औषधोपचारातील प्रगत तंत्रज्ञानाचा, तसेच जनजागृतीसाठी प्रसार व प्रसिद्धीच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून क्षयरोग

अलिबाग : औषधोपचारातील प्रगत तंत्रज्ञानाचा, तसेच जनजागृतीसाठी प्रसार व प्रसिद्धीच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून क्षयरोग निर्मूलनाचे काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे यांनी शुक्रवारी येथे केले.सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कुरूळ (अलिबाग) येथे आयोजित केलेल्या कार्यक्र मात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोटे बोलत होते. ते म्हणाले, केंद्र शासनाने विशेष कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने क्षयरोगाचे छुपे रु ग्ण शोधून त्यांना उपचाराच्या कार्यक्रमांतर्गत आणणे महत्त्वाचे आहे. एकही रु ग्ण दुर्लक्षित राहता कामा नये. याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रगत औषधोपचाराबरोबरच क्षयरोगाविषयी जनसमान्यांमध्ये जागृती होऊन रोग निर्मूलनासाठी त्याचा उपयोग व्हावा, याकरिता प्रसारमाध्यमांच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, तसेच या कार्यक्रमात प्रत्येकाने सहभाग घ्यावा,असे आवाहनही केले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी म्हणाले, क्षयरोग निर्मूलनाच्या कामात राज्यात रायगड जिल्ह्याचा क्रमांक दुसरा लागतो. जिल्ह्यात संशयित क्षयरुग्णांना तातडीने उपचार मिळावे, फक्त खोकला येतो त्यासाठी आलेल्या रुग्णांच्या तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. आज गौरवपत्र देवून सन्मान करण्यात आलेल्या जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यापुढेही क्षय रु ग्ण शोधमोहिमेत व क्षयरोग रु ग्णांच्या उपचारासाठी चांगले काम करावे.वर्षभरात १८ लाख लोकांना क्षयरोग होतो. तीन ते चार लाख मृत्यू होतात. देशात एक हजार रु ग्ण एका दिवसात मरण पावतात. एक थुंकी दूषित रु ग्ण वर्षात दहा ते पंधरा नवे रुग्ण तयार करतो. क्षयरोग प्रामुख्याने कमावत्या वयोगटातील व्यक्तींना होत असल्यामुळे कुटुंबाची व देशाची हानी होते, अशी माहिती डॉ.सुरेश देवकर यांनी प्रास्ताविकात दिली. क्षयरोग निर्मूलनासाठी उत्कृष्ट काम केलेल्या क्षयरोग पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरवपत्र देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच क्षयरोगासंदर्भात जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, परिवहन मंडळाचे व्यवस्थापक अनिल गीते आदींसह आरोग्य पथकातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.