शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अदिवासीवाड्यांमध्ये सुविधांची वानवा, रुग्णांना नेण्यासाठी आजही झोळीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 07:05 IST

कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील माणगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या धाईबाई गोमा पारधी यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांच्या नातेवाइकांना त्यांना रात्रीच्या वेळी झोळी करून रुग्णालयात न्यावे लागले.

- कांता हाबळनेरळ : कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील माणगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या धाईबाई गोमा पारधी यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांच्या नातेवाइकांना त्यांना रात्रीच्या वेळी झोळी करून रुग्णालयात न्यावे लागले. कर्जत तालुक्यातील अनेक आदिवासीवाड्यांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने अनेक अडचणींचा सामना या आदिवासी बांधवांना करावा लागत आहे. येथील रस्त्यांची तर बिकट अवस्था असून, अनेकांना वेळेत उपचार मिळत नसल्याने आपला जीव गमवावा लागत आहे. तेव्हा तालुक्यातील आदिवासीवाड्यांकडे लक्ष देण्याची मागणी प्रशासन आणि सरकारकडे आदिवासी बांधवांकडून करण्यात येत आहे.कर्जत तालुक्यातील खाणीची वाडी येथील आदिवासी कातकरी समाजातील विवाहित महिलेला आठवड्याभरापूर्वी रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने, तिला तातडीने रुग्णालयात नेत असताना रस्त्याच्या सुविधेंअभावी या महिलेला चादरींची झोळी करून नेत असताना, रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा बेकरेवाडीतही अशीच घटना घडली आहे. बेकरेवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्या धाईबाई गोमा पारधी यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांच्या घरच्या पुरुष मंडळींनी त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचे ठरविले; परंतु रस्ता नसल्याने या महिलेला झोळी करून न्यावे लागले. सुदैवाने धाईबाई पारधी या सुखरूप आहेत. १० दिवसांपूर्वी त्यांच्याच सुनेला प्रसूतीसाठी नेत असताना तिची रस्त्यातच प्रसूती झाल्याचे त्यांनी सांगितले; परंतु अशा परिस्थितींना अजून किती दिवस सामोरे जावे लागणार? असा प्रश्न अदिवासींनी उपस्थित केला आहे.माणगाव ग्रामपंचायत हद्दीत बेकरेवाडी असून, सुमारे २८ घरांची येथे वस्ती आहे; परंतु येथील आदिवासी समाजाला अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या वाडीत येण्यासाठी धड रस्ताही नाही, तसेच एकच विहीर असल्याने काही दिवसांत येथे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा अनेक सुविधांपासून अदिवासी समाजाला वंचित राहावे लागत आहे.निवडणुका आल्या की, अनेक पुढारी आणि उमेदवार आदिवासीवाड्या-पांड्यांवर गस्त घालून बसतात. मात्र, अशा पुढाºयांना आता आदिवासी समाजाचे होणारे हाल दिसत नाहीत का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आदिवासींच्या लोकसंख्येनुसार राज्याच्या बजेटमध्ये अर्थिक तरतूद केली जाते. विकासासाठी अनेक योजना आखल्या जात आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखविला जातो, असे असतानाही मात्र आदिवासींच्या विकासाचा लवलेशही कुठेच दिसत नाही. हे कर्जत तालुक्यात विदारक वास्तव आहे.निवडणूक काळात आश्वासनांची पुढाºयांची खैरातनिवडणूक काळात आदिवासी लोकांचे उंबरठे झिजवून आदिवासींची हाजी हाजी करणाºया पुढाºयांनी अशा काळात आदिवासी समाजाला साथ देण्याची खरी गरज आहे.अनेक वाड्यांमध्ये आता पाणीटंचाईची समस्या सुरू होणार आहे, त्यासाठी काही उपाययोजना आखण्याची खरी गरज आहे.माझ्या छातीत अचानक दुखत असल्याने घरच्या पुरुष मंडळींनी मला झोळी करून दवाखान्यात नेले. रस्ता नसल्याने आमच्या अदिवासी लोकांचे मोठे हाल होत आहेत. त्याचा त्रास आमच्या आदिवासी समाजाला होत आहे. तरी शासनाने आम्हाला चांगला रस्ता करून द्यावा.- धाईबाई पारधी,माजी ग्रामपंचायत सदस्याआदिवासी बांधवअद्यापही दुर्लक्षितच१कर्जत तालुक्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील आदिवासीवाड्यांमध्ये पाणी, रस्ते, वीज, आरोग्य अशा मूलभूत सुविधांची वानवा असून यामुळे आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.२आदिवासी वाडे-पाड्यांवरील मुलांना शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी पायपीट करावी लागत आहे, तर अनेक ठिकाणी शिक्षणांपासून ही मुले वंचित राहत असल्याने आदिवासी समाज अशिक्षित राहत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.३आदिवासी वाड्या-पाडे हे दुर्गम अशा डोंगराळ भागात वसलेल्या असल्यामुळे याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. येथील आदिवासी बांधवांना स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. सरकारचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड