शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

विजेचा लपंडावामुळे उरणकरांचा संताप

By admin | Updated: June 9, 2015 22:34 IST

पहिल्याच पावसाच्या दणक्याने महावितरणच्या मान्सूनपूर्व कारभार उघडकीस आला आहे. वीजेच्या लपंडाव आणि विद्युत वितरण विभागाच्या अनागोंदी कारभाराची भर पडल्याने उरणची जनता पार त्रस्त झाली आहे.

उरण : पहिल्याच पावसाच्या दणक्याने महावितरणच्या मान्सूनपूर्व कारभार उघडकीस आला आहे. वीजेच्या लपंडाव आणि विद्युत वितरण विभागाच्या अनागोंदी कारभाराची भर पडल्याने उरणची जनता पार त्रस्त झाली आहे. विद्युत ट्रान्स्फॉर्ममध्ये दोष निर्माण झाल्याने विजेअभावी दोन दिवसांपासून अंधाराचा सामना करणाऱ्या उरण शहरातील काही भागांतील नागरिकांनी सोमवारी सबस्टेशन दोन तास बंद पाडले. ट्रान्स्फार्मर बसविल्याशिवाय इतर विभागाचाही विजपुरवठा बंद करावा, अशी मागणी करीत सबस्टेशनमधील सामानाची नासधूस करुन संताप व्यक्त केला. नागरिकांच्या संतापामुळे उरण एमएसईबी सबस्टेशनमधील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.उरण परिसरात सध्या महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार सुरु आहे. महावितरण विभागाच्या सावळागोंधळामुळे केव्हाही कधीही कुठल्याही ठिकाणची कितीही काळ अचानक वीज गुल होऊ लागली आहे. उरण विभागातील ग्रामीण भागातील काही गावांत तर दोन-दोन दिवस वीज गायब असते. चार दिवसांपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक दोषच सापडला नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. (वार्ताहर)