शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

जिल्ह्यातील असंघटित कामगारांची नोंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:48 IST

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा मिळणार लाभ

अलिबाग : जिल्ह्यातील ५० हजार असंघटित कामगारांची नोंद करून त्यांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. ५ मार्चपूर्वी जिल्ह्यातील २२ हजार असंघटित कामगारांची नोंद करण्याचे लक्ष्यही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेतील पेन्शन योजनेचा लाभ वयाच्या ६० व्या वर्षापासून सुरू होऊन लाभार्थ्याच्या मृत्यूपर्यंत पेन्शन मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्याची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे आहे. वयाच्या १८ व्या वर्षी योजनेत सहभागी झालेले लाभार्थी तब्बल ४२ वर्षांनंतर पेन्शन घेण्यास पात्र होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची माहिती देण्यासाठी राजस्व सभागृहात शुक्र वारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. केंद्र सरकारने १५ फेब्रुवारीपासून असंघटित क्षेत्रात काम करणाºया कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना सुरू केली आहे. कोणतीही पेन्शन योजना लागू नसलेले कामगार या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यांची ग्रामपंचायतस्तरावर नावनोंदणी करावी व गरजू कामगारांना या योजनेत सहभागी करून घ्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक हे या योजनेचे नोडल अधिकारी आहेत. तर या योजनेत कामगारांना सहभागी करून घेण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर ४ मार्च रोजी शिबिराचे आयोजन करून असंघटित कामगारांची नोंदणी करावी असे सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी आदी उपस्थित होते.हे कामगार घेऊ शकतात लाभया योजनेचा लाभ घरात काम करणारे कामगार, दुकानातील कामगार, ड्रायव्हर, प्लंबर, मिड डे मील वर्कर, रिक्षा चालवणारे, वीटभट्टीवर काम करणारे कामगार, कारखान्यातील कामगार, शेतमजूर असंघटित शेतातील कामगारांसोबत शासकीय यंत्रणेसोबत काम करणारे काही प्रवर्ग यात अंगणवाडी सेविकांचे मदतनीस, ग्रामपंचायतीमधील कंत्राटी कामगार, महिला बचतगटाच्या सदस्य असलेल्या महिला यादेखील लाभ घेऊ शकतात.५०-५० टक्के हप्तायोजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे महिन्याचे उत्पन्न हे १५ हजार रु पयांपेक्षा कमी असावे, लाभार्थी जितका हप्ता भरणार आहे, तेवढाच हप्ता केंद्र सरकारही देणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या लाभार्थ्याचे वय १८ आहे तर त्याला हप्ता असेल ५५ रु पये म्हणजेच केंद्र सरकारही ५५ रु पये भरणार आहे.लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ११० रु पये जमा होतील. वयाच्या ६० वर्षांनंतर त्याला तीन हजार रुपये एवढी पेन्शन सुरू होईल. लाभार्थ्याचा मृत्यू झाला तरीही त्याच्या कुटुंबीयांना ५० टक्के फॅमिली पेन्शन सुरू राहणार.