शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील असंघटित कामगारांची नोंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:48 IST

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा मिळणार लाभ

अलिबाग : जिल्ह्यातील ५० हजार असंघटित कामगारांची नोंद करून त्यांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. ५ मार्चपूर्वी जिल्ह्यातील २२ हजार असंघटित कामगारांची नोंद करण्याचे लक्ष्यही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेतील पेन्शन योजनेचा लाभ वयाच्या ६० व्या वर्षापासून सुरू होऊन लाभार्थ्याच्या मृत्यूपर्यंत पेन्शन मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्याची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे आहे. वयाच्या १८ व्या वर्षी योजनेत सहभागी झालेले लाभार्थी तब्बल ४२ वर्षांनंतर पेन्शन घेण्यास पात्र होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची माहिती देण्यासाठी राजस्व सभागृहात शुक्र वारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. केंद्र सरकारने १५ फेब्रुवारीपासून असंघटित क्षेत्रात काम करणाºया कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना सुरू केली आहे. कोणतीही पेन्शन योजना लागू नसलेले कामगार या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यांची ग्रामपंचायतस्तरावर नावनोंदणी करावी व गरजू कामगारांना या योजनेत सहभागी करून घ्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक हे या योजनेचे नोडल अधिकारी आहेत. तर या योजनेत कामगारांना सहभागी करून घेण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर ४ मार्च रोजी शिबिराचे आयोजन करून असंघटित कामगारांची नोंदणी करावी असे सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी आदी उपस्थित होते.हे कामगार घेऊ शकतात लाभया योजनेचा लाभ घरात काम करणारे कामगार, दुकानातील कामगार, ड्रायव्हर, प्लंबर, मिड डे मील वर्कर, रिक्षा चालवणारे, वीटभट्टीवर काम करणारे कामगार, कारखान्यातील कामगार, शेतमजूर असंघटित शेतातील कामगारांसोबत शासकीय यंत्रणेसोबत काम करणारे काही प्रवर्ग यात अंगणवाडी सेविकांचे मदतनीस, ग्रामपंचायतीमधील कंत्राटी कामगार, महिला बचतगटाच्या सदस्य असलेल्या महिला यादेखील लाभ घेऊ शकतात.५०-५० टक्के हप्तायोजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे महिन्याचे उत्पन्न हे १५ हजार रु पयांपेक्षा कमी असावे, लाभार्थी जितका हप्ता भरणार आहे, तेवढाच हप्ता केंद्र सरकारही देणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या लाभार्थ्याचे वय १८ आहे तर त्याला हप्ता असेल ५५ रु पये म्हणजेच केंद्र सरकारही ५५ रु पये भरणार आहे.लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ११० रु पये जमा होतील. वयाच्या ६० वर्षांनंतर त्याला तीन हजार रुपये एवढी पेन्शन सुरू होईल. लाभार्थ्याचा मृत्यू झाला तरीही त्याच्या कुटुंबीयांना ५० टक्के फॅमिली पेन्शन सुरू राहणार.