शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

जिल्ह्यातील असंघटित कामगारांची नोंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:48 IST

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा मिळणार लाभ

अलिबाग : जिल्ह्यातील ५० हजार असंघटित कामगारांची नोंद करून त्यांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. ५ मार्चपूर्वी जिल्ह्यातील २२ हजार असंघटित कामगारांची नोंद करण्याचे लक्ष्यही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेतील पेन्शन योजनेचा लाभ वयाच्या ६० व्या वर्षापासून सुरू होऊन लाभार्थ्याच्या मृत्यूपर्यंत पेन्शन मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्याची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे आहे. वयाच्या १८ व्या वर्षी योजनेत सहभागी झालेले लाभार्थी तब्बल ४२ वर्षांनंतर पेन्शन घेण्यास पात्र होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची माहिती देण्यासाठी राजस्व सभागृहात शुक्र वारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. केंद्र सरकारने १५ फेब्रुवारीपासून असंघटित क्षेत्रात काम करणाºया कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना सुरू केली आहे. कोणतीही पेन्शन योजना लागू नसलेले कामगार या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यांची ग्रामपंचायतस्तरावर नावनोंदणी करावी व गरजू कामगारांना या योजनेत सहभागी करून घ्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक हे या योजनेचे नोडल अधिकारी आहेत. तर या योजनेत कामगारांना सहभागी करून घेण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर ४ मार्च रोजी शिबिराचे आयोजन करून असंघटित कामगारांची नोंदणी करावी असे सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी आदी उपस्थित होते.हे कामगार घेऊ शकतात लाभया योजनेचा लाभ घरात काम करणारे कामगार, दुकानातील कामगार, ड्रायव्हर, प्लंबर, मिड डे मील वर्कर, रिक्षा चालवणारे, वीटभट्टीवर काम करणारे कामगार, कारखान्यातील कामगार, शेतमजूर असंघटित शेतातील कामगारांसोबत शासकीय यंत्रणेसोबत काम करणारे काही प्रवर्ग यात अंगणवाडी सेविकांचे मदतनीस, ग्रामपंचायतीमधील कंत्राटी कामगार, महिला बचतगटाच्या सदस्य असलेल्या महिला यादेखील लाभ घेऊ शकतात.५०-५० टक्के हप्तायोजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे महिन्याचे उत्पन्न हे १५ हजार रु पयांपेक्षा कमी असावे, लाभार्थी जितका हप्ता भरणार आहे, तेवढाच हप्ता केंद्र सरकारही देणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या लाभार्थ्याचे वय १८ आहे तर त्याला हप्ता असेल ५५ रु पये म्हणजेच केंद्र सरकारही ५५ रु पये भरणार आहे.लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ११० रु पये जमा होतील. वयाच्या ६० वर्षांनंतर त्याला तीन हजार रुपये एवढी पेन्शन सुरू होईल. लाभार्थ्याचा मृत्यू झाला तरीही त्याच्या कुटुंबीयांना ५० टक्के फॅमिली पेन्शन सुरू राहणार.