शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

शेखार्डी हद्दीत अज्ञात बोटींचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:43 IST

पोलीस प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी : गावकऱ्यांमध्ये कुतूहल, भीतीचे वातावरण

संतोष सापते 

श्रीवर्धन : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरीकिनारा अतिशय संवेदनशील मानला जातो. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेखार्डी गावाच्या हद्दीत अचानक अज्ञात बोटींचा संचार झाला, त्यामुळे ही बाब गावकऱ्यांसाठी कुतूहल व भीतीची ठरली.

रविवारी पावसामुळे शेखार्डी गावातील विद्युतपुरवठा काही काळासाठी खंडित झाला, त्यामुळे गावातील आरिफ करबेळकर गावच्या मुख्य रस्त्यावर भ्रमणध्वनी वरून विद्युतपुरवठा पूर्ववत होण्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी पोहोचले. त्या वेळी टेकडीवरून गावच्या हद्दीत अज्ञात बोटींचे दिवे चमकत असल्याचे दिसून आले. बोटी गावच्या हद्दीत आल्याचे अनेक ग्रामस्थांनी टेकडी वरून व किनाºयावरून बघितले त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात कुतूहल व भीतीचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार १ आॅगस्टपर्यंत पाण्यात उतरण्यासाठी निर्बंध घातले असताना समुद्रातील वास्तव्य करत असलेल्या बोटी कुठल्या आहेत? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला आहे.या बोटी रायगड जिल्ह्यातील नाहीत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही बोटींना परवानगी देण्यात आलेली नाही अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.शेखार्डी ते आदगाव गावाच्या जवळपास वास्तव्य केलेल्या बोटी कोणत्या हेतूने संचार करत होत्या हा मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार मध्यरात्री गावाच्या हद्दीच्या जवळ वास्तव्य करणाºया बोटी मच्छीमारसाठी आल्या असतील तर त्याचा विपरित परिणाम आमच्या व्यवसाय व रोजगारावर होऊ शकतो. त्यामुळे या बोटींची सत्यता समजणे अनिवार्य आहे. स्थानिक ग्रामस्थानी ‘लोकमत’शी बोलताना सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक व प्रभावी शासकीय धोरणांची गरज असल्याचे सांगितले.रविवारी दुपारी नेव्हीची बोट शेखार्डीच्या किनाºयावर येऊन गेली. समुद्रकिनारी थांबलेल्या बोटींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. आम्हाला मच्छीमारीची बंदी असताना समुद्रात आलेल्या बोटींविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. या बोटी मच्छीमारीसाठी आल्या असतील तर त्याचा विपरित परिणाम आमच्या व्यवसायावर होऊ शकतो.- इनयात सोंडे, मच्छीमार व्यावसायिक, शेखार्डीबोटींविषयी कुणीही माहिती दिली नाही; परंतु या बाबीची सत्यता तत्काळ तपासली जाईल, योग्य ती कारवाई केली जाईल.- बाळकृष्ण जाधव,पोलीस निरीक्षक, श्रीवर्धनरविवारी रात्री शेखार्डी गावाच्या हद्दीत काही बोटी थांबल्याचे निदर्शनास आले. मी व माझ्यासोबत गावातील अनेक लोकांनी त्या बोटी बघितल्या जवळपास २० वाव पाण्यामध्ये त्या बोटी असाव्यात. दूरवरून त्या बोटी कुठल्या आहेत, हे मात्र समजू शकले नाही.- आरिफ करबेलकर,मच्छीमार व्यावसायिक, शेखार्डीरायगड जिल्ह्यातील बोटींना सांकेतिक चिन्ह म्हणून लाल रंगाचा पट्टा असतो; परंतु रविवारी शेखार्डीच्या समुद्र परिसरात बोटी दूरवर असल्यामुळे काहीच समजू शकले नाही; परंतु त्यांचे वास्तव्य होते हे मात्र निश्चित.- दानिश फणसबकर, ग्रामस्थ, शेखार्डीआम्ही सदैव सागरीसुरक्षेच्या बाबतीत सजग आहोत, पोलीस खाते व नेव्ही यांना मदत करण्यात तत्पर आहोत. आम्हाला सागरीसुरक्षा संघटनेच्या सभासदत्वाचे कार्ड मिळाल्यास निश्चितच त्याचा आम्ही सागरीसुरक्षेसाठी वापर करू, आमच्या गावातील चार ते पाच लोकांना कार्ड मिळाले आहे त्यालासुद्धा अनेक वर्षे झाली आहेत.- तोफिक शेखदरे, ग्रामस्थ, शेखार्डी

टॅग्स :Raigadरायगड