शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शेखार्डी हद्दीत अज्ञात बोटींचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:43 IST

पोलीस प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी : गावकऱ्यांमध्ये कुतूहल, भीतीचे वातावरण

संतोष सापते 

श्रीवर्धन : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरीकिनारा अतिशय संवेदनशील मानला जातो. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेखार्डी गावाच्या हद्दीत अचानक अज्ञात बोटींचा संचार झाला, त्यामुळे ही बाब गावकऱ्यांसाठी कुतूहल व भीतीची ठरली.

रविवारी पावसामुळे शेखार्डी गावातील विद्युतपुरवठा काही काळासाठी खंडित झाला, त्यामुळे गावातील आरिफ करबेळकर गावच्या मुख्य रस्त्यावर भ्रमणध्वनी वरून विद्युतपुरवठा पूर्ववत होण्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी पोहोचले. त्या वेळी टेकडीवरून गावच्या हद्दीत अज्ञात बोटींचे दिवे चमकत असल्याचे दिसून आले. बोटी गावच्या हद्दीत आल्याचे अनेक ग्रामस्थांनी टेकडी वरून व किनाºयावरून बघितले त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात कुतूहल व भीतीचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार १ आॅगस्टपर्यंत पाण्यात उतरण्यासाठी निर्बंध घातले असताना समुद्रातील वास्तव्य करत असलेल्या बोटी कुठल्या आहेत? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला आहे.या बोटी रायगड जिल्ह्यातील नाहीत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही बोटींना परवानगी देण्यात आलेली नाही अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.शेखार्डी ते आदगाव गावाच्या जवळपास वास्तव्य केलेल्या बोटी कोणत्या हेतूने संचार करत होत्या हा मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार मध्यरात्री गावाच्या हद्दीच्या जवळ वास्तव्य करणाºया बोटी मच्छीमारसाठी आल्या असतील तर त्याचा विपरित परिणाम आमच्या व्यवसाय व रोजगारावर होऊ शकतो. त्यामुळे या बोटींची सत्यता समजणे अनिवार्य आहे. स्थानिक ग्रामस्थानी ‘लोकमत’शी बोलताना सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक व प्रभावी शासकीय धोरणांची गरज असल्याचे सांगितले.रविवारी दुपारी नेव्हीची बोट शेखार्डीच्या किनाºयावर येऊन गेली. समुद्रकिनारी थांबलेल्या बोटींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. आम्हाला मच्छीमारीची बंदी असताना समुद्रात आलेल्या बोटींविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. या बोटी मच्छीमारीसाठी आल्या असतील तर त्याचा विपरित परिणाम आमच्या व्यवसायावर होऊ शकतो.- इनयात सोंडे, मच्छीमार व्यावसायिक, शेखार्डीबोटींविषयी कुणीही माहिती दिली नाही; परंतु या बाबीची सत्यता तत्काळ तपासली जाईल, योग्य ती कारवाई केली जाईल.- बाळकृष्ण जाधव,पोलीस निरीक्षक, श्रीवर्धनरविवारी रात्री शेखार्डी गावाच्या हद्दीत काही बोटी थांबल्याचे निदर्शनास आले. मी व माझ्यासोबत गावातील अनेक लोकांनी त्या बोटी बघितल्या जवळपास २० वाव पाण्यामध्ये त्या बोटी असाव्यात. दूरवरून त्या बोटी कुठल्या आहेत, हे मात्र समजू शकले नाही.- आरिफ करबेलकर,मच्छीमार व्यावसायिक, शेखार्डीरायगड जिल्ह्यातील बोटींना सांकेतिक चिन्ह म्हणून लाल रंगाचा पट्टा असतो; परंतु रविवारी शेखार्डीच्या समुद्र परिसरात बोटी दूरवर असल्यामुळे काहीच समजू शकले नाही; परंतु त्यांचे वास्तव्य होते हे मात्र निश्चित.- दानिश फणसबकर, ग्रामस्थ, शेखार्डीआम्ही सदैव सागरीसुरक्षेच्या बाबतीत सजग आहोत, पोलीस खाते व नेव्ही यांना मदत करण्यात तत्पर आहोत. आम्हाला सागरीसुरक्षा संघटनेच्या सभासदत्वाचे कार्ड मिळाल्यास निश्चितच त्याचा आम्ही सागरीसुरक्षेसाठी वापर करू, आमच्या गावातील चार ते पाच लोकांना कार्ड मिळाले आहे त्यालासुद्धा अनेक वर्षे झाली आहेत.- तोफिक शेखदरे, ग्रामस्थ, शेखार्डी

टॅग्स :Raigadरायगड