शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पनवेलमध्ये सभापतींचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 02:59 IST

पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधाºयांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून प्रशासनाला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबले आहे. स्वच्छतादूत म्हणून भाऊ कदम यांची निवड करताना विश्वासात घेतले नाही

कळंबोली : पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधाºयांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून प्रशासनाला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबले आहे. स्वच्छतादूत म्हणून भाऊ कदम यांची निवड करताना विश्वासात घेतले नाही. त्याचबरोबर सभापतींना बसण्याकरिता केबिन नाही, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि महापालिकेच्या नवीन इमारतीच्या जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन केले. मात्र प्रशासनाने संदर्भासहित स्पष्टीकरण देत सर्व आरोप खोडून काढल्याने आंदोलनाची हवाच निघून गेली.पनवेल महानगरपालिका नव्याने निर्माण झाली असल्याने काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अपुरी जागा ही सुध्दा मोठी अडचण ठरू लागली आहे. नवीन प्रशासकीय इमारतीत पदाधिकाºयांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन सात केबिन तयार असून उर्वरित तीन सभापतींना उपायुक्त, सहायक आयुक्त आणि लेखाधिकाºयांची केबिन खाली करून देण्याची तयारी दर्शवली आहे.निवडणुकीच्या प्रक्रि येत मोठ्या प्रमाणात कालावधी खर्च पडला त्याचबरोबर मोठे काम असल्याने त्याकरिता मर्यादा आली, म्हणून केबिनच्या कामाला काही प्रमाणात विलंब लागला. परंतु त्याकरिता कमीत कमी सहा महिन्याची मुदत आवश्यक असल्याचा मुद्दा उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी उपस्थित केला. मात्र सत्ताधारी पक्षाच्या सभापतींनी सोमवारी नवीन इमारतीच्या तळमजल्यावर ठिय्या मांडला.त्यामध्ये प्रकाश बिनेदार, विद्या गायकवाड, दर्शना भोईर. डॉ. अरुण भगत, अ‍ॅड. मनोज भुजबळ, विकास घरत यांचा समावेश होता. सभापतींची निवड होवून एक महिना उलटला तरी दालन मिळाले नसल्याचे प्रकाश बिनेदार यांनी सांगितले. आम्हाला प्रशासन विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला.महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त जमीर लेंगरेकर, संध्या बावनकुळे, शहर अभियंता संजय कटेकर, डॉ. भगवान खाडे यांनी सभापतींना वरती येण्याची विनंती केली. त्याचबरोबर नवीन चार आणि अधिकाºयांची तीन अशी दालने उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला.उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी मिटिंग हॉलमध्ये बसून आपले कामकाज करण्याची तयारी दर्शवली. परंतु आम्हाला आश्वासन देवूनही नवीन दालने का उपलब्ध करूनदिली नाहीत हा मुद्दा सभापतींनी लावून धरला. सर्व नगरसेवक माऊंटअबू या ठिकाणी अभ्यास दौºयावर चालले असल्याने आता तूर्तास तरी दालनाबाबत अशी भूमिका घ्यायला नको होती, ही खंत लेंगरेकर आणि बावनकुळे यांनी व्यक्त केली.