शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

पनवेलमध्ये सभापतींचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 02:59 IST

पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधाºयांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून प्रशासनाला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबले आहे. स्वच्छतादूत म्हणून भाऊ कदम यांची निवड करताना विश्वासात घेतले नाही

कळंबोली : पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधाºयांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून प्रशासनाला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबले आहे. स्वच्छतादूत म्हणून भाऊ कदम यांची निवड करताना विश्वासात घेतले नाही. त्याचबरोबर सभापतींना बसण्याकरिता केबिन नाही, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि महापालिकेच्या नवीन इमारतीच्या जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन केले. मात्र प्रशासनाने संदर्भासहित स्पष्टीकरण देत सर्व आरोप खोडून काढल्याने आंदोलनाची हवाच निघून गेली.पनवेल महानगरपालिका नव्याने निर्माण झाली असल्याने काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अपुरी जागा ही सुध्दा मोठी अडचण ठरू लागली आहे. नवीन प्रशासकीय इमारतीत पदाधिकाºयांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन सात केबिन तयार असून उर्वरित तीन सभापतींना उपायुक्त, सहायक आयुक्त आणि लेखाधिकाºयांची केबिन खाली करून देण्याची तयारी दर्शवली आहे.निवडणुकीच्या प्रक्रि येत मोठ्या प्रमाणात कालावधी खर्च पडला त्याचबरोबर मोठे काम असल्याने त्याकरिता मर्यादा आली, म्हणून केबिनच्या कामाला काही प्रमाणात विलंब लागला. परंतु त्याकरिता कमीत कमी सहा महिन्याची मुदत आवश्यक असल्याचा मुद्दा उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी उपस्थित केला. मात्र सत्ताधारी पक्षाच्या सभापतींनी सोमवारी नवीन इमारतीच्या तळमजल्यावर ठिय्या मांडला.त्यामध्ये प्रकाश बिनेदार, विद्या गायकवाड, दर्शना भोईर. डॉ. अरुण भगत, अ‍ॅड. मनोज भुजबळ, विकास घरत यांचा समावेश होता. सभापतींची निवड होवून एक महिना उलटला तरी दालन मिळाले नसल्याचे प्रकाश बिनेदार यांनी सांगितले. आम्हाला प्रशासन विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला.महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त जमीर लेंगरेकर, संध्या बावनकुळे, शहर अभियंता संजय कटेकर, डॉ. भगवान खाडे यांनी सभापतींना वरती येण्याची विनंती केली. त्याचबरोबर नवीन चार आणि अधिकाºयांची तीन अशी दालने उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला.उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी मिटिंग हॉलमध्ये बसून आपले कामकाज करण्याची तयारी दर्शवली. परंतु आम्हाला आश्वासन देवूनही नवीन दालने का उपलब्ध करूनदिली नाहीत हा मुद्दा सभापतींनी लावून धरला. सर्व नगरसेवक माऊंटअबू या ठिकाणी अभ्यास दौºयावर चालले असल्याने आता तूर्तास तरी दालनाबाबत अशी भूमिका घ्यायला नको होती, ही खंत लेंगरेकर आणि बावनकुळे यांनी व्यक्त केली.