शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

५०० कुटुंबांवर बेकारीची कुऱ्हाड

By admin | Updated: October 19, 2015 01:26 IST

मांडवा बंदर येथे खाजगी करणातून सुरु करण्यात येणाऱ्या कुल कार सेवेमुळे स्थानिकांचा रोजगार बुडून सुमारे ५०० कुटुंबांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

आविष्कार देसाई, अलिबागमांडवा बंदर येथे खाजगी करणातून सुरु करण्यात येणाऱ्या कुल कार सेवेमुळे स्थानिकांचा रोजगार बुडून सुमारे ५०० कुटुंबांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. स्थानिकांवर अन्याय करणाऱ्या सरकार विरोधात दंड थोपटल्या शिवाय पर्याय नसल्याने रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे, अशी माहिती मांडवा बंदर बचाव संर्घष समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर यांनी लोकमतशी बोलताना दिली.रविवारी या खाजगी सेवेचा शुभारंभ होणार होता. मात्र तो होऊ शकला नाही. यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागणे ही आमचा रोजगार बुडविणाऱ्यांची हार असल्याचे भोईर यांनी सांगितले. ग्रामिण भागाला देशाच्या आर्थिक राजधानीला जोडण्याचे महत्वपूर्ण काम मांडवा बंदर करते. याच परिसरात बलाढ्य उद्योजक, सेलिब्रिटज् यांचे अलिशान बंगले आहेत.अलिबाग सारख्या छोट्या शहराचे अर्थकारण बदलण्यास मांडवा आणि रेवस बंदराचा मोठा वाटा आहे.मुंबईतून समुद्र मार्गे अलिबागला येणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून मांडवा बंदराचे नव्याने विस्तारीकरण करण्यात आल्यानंतर यामध्ये वेगाने वाढ होत आहे. रेवस बंदरमार्गे येणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. अलिबाग, नागाव, आक्षी, किहीम, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन येथील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी येणारे पर्यटक समुद्रमार्गेच अलिबागला येणे पसंत करतात. अलिबागमधून इतर पर्यटन स्थळांकडे जाण्यासाठी चांगली कन्केटीव्हीटी असल्याने हा मार्ग सुखकर आणि जलद म्हणून ओळखला जातो.गेल्या २० वर्षापासून विक्रम-मिनीडोर रिक्षा बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेसाठी येथे हजर असतात. मांडवा आणि रेवस परिसरामध्ये सुमारे ५०० विक्रम-मिनीडोर चालक मालक आहेत.पर्यटन व्यवसायात वाढ होण्यासाठी पर्यटकांना जास्तीत जास्त उच्च दर्जांच्या सेवा देणे गरजेचे आहे. यासाठी मेरीटाईम बोर्डाने निवादा मागवून खाजगी करणातून मांडवा बंदरावर येणाऱ्यांसाठी कुलकार सेवा देण्याचे ठरविले आहे. लि बिल्स कन्व्हेनियन्ट हॉटेल्स् अ‍ॅण्ड रिसॉर्ट लि.ही सेवा सुरु करणार असल्याने स्थानिक विक्रीम-मिनीडोर रिक्षा चालक-मालकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. रोजगार हरपल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार असल्याने आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचे मांडवा बंदर बचाव संर्घष समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर यांनी सांगितले.>> स्थानिकांसाठी शेवटपर्यंत संघर्ष करणार असल्याचे मांडवा बंदर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर म्हणाले. याबाबत मेरीटाईम बोर्डाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. स्थानिकांच्या प्रश्नावर शेकाप, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टीने आंदोलनाला पाठींबा दर्शविला असल्याचेही भोईर यांनी सांगितले. स्थानिकांचा रोजगार बुडणार नाही यांची काळजी सरकारने घेणे गरजेचे आहे. निविदा काढताना परस्पर निविदा काढण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. मात्र, प्रशासन आणि सरकारी पातळीवर मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले.