शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

जलपर्णीमुळे उल्हास नदी दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:07 IST

तोडलेल्या फांद्या टाकल्या नदीत : नेरळ, दहिवली परिसरात अडकली जलपर्णी

नेरळ : कर्जत उल्हास नदीला सध्या जलपर्णीचा विळखा बसला आहे. दोन दिवसांपूर्वी ही जलपर्णी काढण्याचे काम कर्जत परिसरात हाती घेण्यात आले आहे. परंतु काढलेली जलपर्णी ही नदीपात्रातून काढून बाहेर न टाकता नदीपात्रातच टाकली जात असल्याने ही जलपर्णी नेरळ, शेलू, वांगणी परिसरात पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन नदीपात्रातील पाणी दूषित झाले असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

जिल्ह्णातील जवळजवळ सर्वच नद्यांमध्ये उन्हाळ्यात जलपर्णी वाढलेली दिसते. जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. डासांचा प्रादुर्भाव वाढतो यामुळे मग जलपर्णी काढण्यासाठी मोहीम राबवली जाते. अशीच मोहीम कर्जत परिसरात सुरू करण्यात आली आहे. नदीपात्रात काढून जलपर्णी ही नदीबाहेर न टाकता नदीच्या पाण्यात टाकली जात आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. उल्हास नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना अवलंबून आहेत, परंतु अनेक पाणी योजनांना फिल्टर प्लान्ट नसल्याने हे दूषित पाणी घरा-घरात जात असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ही जलपर्णी नेरळ, दहिवली, बिरदोले, शेलू, वांगणी येथील उल्हास नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत असल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे जलपर्णी लवकर काढण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

सांडपाणी नदीपात्रातच्शहराच्या सांडपाण्यातून वा रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेतजमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील, सांडपाण्यामुळे जलपर्णी वाढते. ही पोषक द्रव्ये पाण्यात मिसळणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत जलपर्णीची वाढ अनिर्बंधपणे होत राहते. याच पोषक द्रव्यांवर व इतर सेंद्रिय पदार्थांवर जीवाणूंचीही वाढ होत असते. अनेक रोगजंतू पाण्यात टिकून राहण्यात व त्यांची वाढ होण्यात या दूषित पदार्थांचा सहभाग असतो. त्यामुळे नदीपात्रात सांडपाणी सोडणेही तितकेच धोक्याचे आहे. कर्जत, नेरळ परिसरात तर अनेक बिल्डर, तसेच गावातील निघणारे सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते, परंतु यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने त्याचा त्रास अनेक गावातील नागरिकांना भोगावा लागत आहे. जोपर्यंत नदीपात्रात सांडपाणी सोडण्याचे कमी होत नाही तोपर्यंत जलपर्णी वाढण्याचे प्रमाण कमी होणार नाही. 

गेल्या अनेक दिवसांपासून कर्जत परिसरात काढलेली जलपर्णी उल्हास नदीपात्रात टाकण्यात येत आहे. दहिवली, नेरळ परिसरात ही जलपर्णी पाण्यात तरंगलेली दिसत आहे. त्यामुळे परिसरात पाणी दूषित झाले आहे, प्रशासनाने यावर लक्ष देऊन पाण्यात आलेली जलपर्णी काढून टाकावी आणि नदीपात्रात जलपर्णी टाकणाऱ्यांवर कारवाई करावी.- सावळाराम जाधव, माजी सरपंच, नेरळ