शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

भातशेती नसलेल्या भागात दोन वळण बंधारे

By admin | Updated: July 16, 2017 02:52 IST

तालुक्यात पाथरज या महसुली गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून, तेथील डोंगरपाडा गावाच्या शिवारात एकाच भागात दोन वळण बंधारे

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यात पाथरज या महसुली गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून, तेथील डोंगरपाडा गावाच्या शिवारात एकाच भागात दोन वळण बंधारे बांधले गेले आहेत. बंधाऱ्यांच्या खालील भागात फार मोठे जमीन क्षेत्र नाही. त्यामुळे कृषी विभागाचे जलयुक्त शिवार अभियान ठेकेदारासाठी की शेतकऱ्यांसाठी राबवित आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या दोन्ही वळण बंधाऱ्यांवर कृषी विभागाने दहा लाख रुपये खर्च केले आहेत. त्याच वेळी त्या वळण बंधाऱ्याचे काम करताना सिमेंट बांधकाम होत असताना पाण्याचा वापर फार कमी प्रमाणात केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात तेथील सिमेंट वळण बंधारे नादुरुस्त होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.पाथरज या महसुली गावाच्या परिसरात डोंगरपाडा गाव असून, तेथे जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामधून डोंगरपाडा येथील आश्रमशाळेच्या मागे दोन वळण बंधारे कृषी विभागाने बांधले आहेत. त्या ठिकाणी वरच्या भागात मोठ्या प्रमाणात भाताचे शेत आहे, तर सिमेंट वळण बंधारे बांधण्यात आलेल्या ठिकाणी फार कमी प्रमाणात शेतजमीन आहे. अशा वेळी वळण बंधाऱ्यांचा उपयोग किती प्रमाणात होईल, हा प्रश्न आहे. जलसंधारण नियमानुसार पाच लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या वळण बंधाऱ्याच्या पाण्याचा फायदा किमान पाच हेक्टर जमिनीला झाला पाहिजे. मात्र, त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात भाताची शेती नाही. त्यामुळे दोन वळण बंधारे बांधण्याचा उद्देश काय? असा प्रश्न डोंगरपाडा गावातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. कृषी विभागाच्या खोपोली येथील कृषी अधिकाऱ्यांनी कामे मंजूर केली, त्या वेळी त्यांनी वळण बंधाऱ्यांच्या खाली असलेल्या जमीन क्षेत्राची माहिती देताना ती खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने दहा लाख रुपयांचा केलेला खर्च हा ठेकेदाराला खूश करण्यासाठी केला असल्याचा आरोप होत आहे. वळण बंधाऱ्यांच्या खालील भागात मोठ्या प्रमाणात माळरान आणि लहान वृक्ष असलेली झाडी आहे. अशा वेळी त्या ठिकाणी १० लाख खर्चून किमान १० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल का? याची खात्री कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे. त्याच वेळी त्या वळण बंधाऱ्याचे काम करताना सिमेंट बांधकाम होत असताना पाण्याचा वापर फार कमी प्रमाणात केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात तेथील सिमेंट वळण बंधारे नादुरुस्त होण्याची शक्यता आहे.कृषी विभागाने तांत्रिक मान्यता घेऊन या दोन्ही वळण बंधाऱ्यांची कामे मंजूर केली आहेत. त्याच वेळी कामे होत असताना कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी १२ तास उभे राहू शकत नाहीत. मात्र, त्या सर्व कामांच्या देखभाल आणि दुरु स्तीसाठी काही निधी सुरक्षा अनामत म्हणून राखून ठेवला आहे. त्यामुळे तूटफूट झाल्यास ती कामे पुन्हा करून घेता येतील. - महादेव काळापाड, कृषी पर्यवेक्षक