शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

भातशेती नसलेल्या भागात दोन वळण बंधारे

By admin | Updated: July 16, 2017 02:52 IST

तालुक्यात पाथरज या महसुली गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून, तेथील डोंगरपाडा गावाच्या शिवारात एकाच भागात दोन वळण बंधारे

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यात पाथरज या महसुली गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून, तेथील डोंगरपाडा गावाच्या शिवारात एकाच भागात दोन वळण बंधारे बांधले गेले आहेत. बंधाऱ्यांच्या खालील भागात फार मोठे जमीन क्षेत्र नाही. त्यामुळे कृषी विभागाचे जलयुक्त शिवार अभियान ठेकेदारासाठी की शेतकऱ्यांसाठी राबवित आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या दोन्ही वळण बंधाऱ्यांवर कृषी विभागाने दहा लाख रुपये खर्च केले आहेत. त्याच वेळी त्या वळण बंधाऱ्याचे काम करताना सिमेंट बांधकाम होत असताना पाण्याचा वापर फार कमी प्रमाणात केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात तेथील सिमेंट वळण बंधारे नादुरुस्त होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.पाथरज या महसुली गावाच्या परिसरात डोंगरपाडा गाव असून, तेथे जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामधून डोंगरपाडा येथील आश्रमशाळेच्या मागे दोन वळण बंधारे कृषी विभागाने बांधले आहेत. त्या ठिकाणी वरच्या भागात मोठ्या प्रमाणात भाताचे शेत आहे, तर सिमेंट वळण बंधारे बांधण्यात आलेल्या ठिकाणी फार कमी प्रमाणात शेतजमीन आहे. अशा वेळी वळण बंधाऱ्यांचा उपयोग किती प्रमाणात होईल, हा प्रश्न आहे. जलसंधारण नियमानुसार पाच लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या वळण बंधाऱ्याच्या पाण्याचा फायदा किमान पाच हेक्टर जमिनीला झाला पाहिजे. मात्र, त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात भाताची शेती नाही. त्यामुळे दोन वळण बंधारे बांधण्याचा उद्देश काय? असा प्रश्न डोंगरपाडा गावातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. कृषी विभागाच्या खोपोली येथील कृषी अधिकाऱ्यांनी कामे मंजूर केली, त्या वेळी त्यांनी वळण बंधाऱ्यांच्या खाली असलेल्या जमीन क्षेत्राची माहिती देताना ती खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने दहा लाख रुपयांचा केलेला खर्च हा ठेकेदाराला खूश करण्यासाठी केला असल्याचा आरोप होत आहे. वळण बंधाऱ्यांच्या खालील भागात मोठ्या प्रमाणात माळरान आणि लहान वृक्ष असलेली झाडी आहे. अशा वेळी त्या ठिकाणी १० लाख खर्चून किमान १० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल का? याची खात्री कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे. त्याच वेळी त्या वळण बंधाऱ्याचे काम करताना सिमेंट बांधकाम होत असताना पाण्याचा वापर फार कमी प्रमाणात केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात तेथील सिमेंट वळण बंधारे नादुरुस्त होण्याची शक्यता आहे.कृषी विभागाने तांत्रिक मान्यता घेऊन या दोन्ही वळण बंधाऱ्यांची कामे मंजूर केली आहेत. त्याच वेळी कामे होत असताना कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी १२ तास उभे राहू शकत नाहीत. मात्र, त्या सर्व कामांच्या देखभाल आणि दुरु स्तीसाठी काही निधी सुरक्षा अनामत म्हणून राखून ठेवला आहे. त्यामुळे तूटफूट झाल्यास ती कामे पुन्हा करून घेता येतील. - महादेव काळापाड, कृषी पर्यवेक्षक