शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मदतकार्य करताना एनडीआरएफच्या जवानाच्या पायाची दोन बोटे तुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 05:20 IST

श्रीवर्धन येथे मदतकार्य करताना झाला अपघात । श्रीवर्धन-मुंबई असा उभारला ग्रीन कॉरिडॉर

आविष्कार देसाई ।अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये हाहाकार उडवत प्रचंड नुकसान केले आहे. श्रीवर्धन तालुक्यामध्ये आपत्तीनंतरच्या कामांना गती देण्यात आली आहे. शनिवारी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे इंद्रजीत सिंह चव्हाण हे काम करताना जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या पायाची दोन बोटे तुटली आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये त्यांनी आपत्तीपश्चात मदतकार्याला वेगाने सुरुवात केली आहे.शनिवारी सकाळी आपत्ती दलामार्फत श्रीवर्धन तालुक्यात मदतकार्य सुरू होते. यातील जवान इंद्रजीत सिंह चव्हाण हे मदतकार्य करत असताना त्यांना अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या उजव्या पायाची दोन बोटे तुटून पडली. त्यांना तातडीने श्रीवर्धनच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तातडीने मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु श्रीवर्धन ते मुंबई हे अंतर तब्बल १८८ किमीचे होते. त्यासाठी किमान सहा तास लागणार होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी तातडीने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याच्या सूचना केल्या. यासाठी रायगड पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला. चव्हाण यांच्या रुग्णवाहिकेसोबत एक पोलीस वाहन पायलेटिंगकरिता दिले. रुग्णालयापर्यंत वेळेत पोहोचणे त्यांना शक्य झाले, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांनी दिली.नागोठणे ते मुंबई-ब्रीच कॅण्डी रुग्णालयश्रीवर्धन येथून चव्हाण यांना नागोठणेपर्यंत आणले. त्यानंतर नागोठणे ते मुंबई-ब्रीच कॅण्डी रुग्णालय असा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. त्यामुळे १०० किमीचे अंतर फक्त सव्वा तासात पार करणे शक्य झाले. एरवी हेच अंतर पार करण्यासाठी किमान तीन ते सव्वातीन तासांचा अवधी लागतो.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग