शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मदतकार्य करताना एनडीआरएफच्या जवानाच्या पायाची दोन बोटे तुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 05:20 IST

श्रीवर्धन येथे मदतकार्य करताना झाला अपघात । श्रीवर्धन-मुंबई असा उभारला ग्रीन कॉरिडॉर

आविष्कार देसाई ।अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये हाहाकार उडवत प्रचंड नुकसान केले आहे. श्रीवर्धन तालुक्यामध्ये आपत्तीनंतरच्या कामांना गती देण्यात आली आहे. शनिवारी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे इंद्रजीत सिंह चव्हाण हे काम करताना जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या पायाची दोन बोटे तुटली आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये त्यांनी आपत्तीपश्चात मदतकार्याला वेगाने सुरुवात केली आहे.शनिवारी सकाळी आपत्ती दलामार्फत श्रीवर्धन तालुक्यात मदतकार्य सुरू होते. यातील जवान इंद्रजीत सिंह चव्हाण हे मदतकार्य करत असताना त्यांना अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या उजव्या पायाची दोन बोटे तुटून पडली. त्यांना तातडीने श्रीवर्धनच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तातडीने मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु श्रीवर्धन ते मुंबई हे अंतर तब्बल १८८ किमीचे होते. त्यासाठी किमान सहा तास लागणार होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी तातडीने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याच्या सूचना केल्या. यासाठी रायगड पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला. चव्हाण यांच्या रुग्णवाहिकेसोबत एक पोलीस वाहन पायलेटिंगकरिता दिले. रुग्णालयापर्यंत वेळेत पोहोचणे त्यांना शक्य झाले, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांनी दिली.नागोठणे ते मुंबई-ब्रीच कॅण्डी रुग्णालयश्रीवर्धन येथून चव्हाण यांना नागोठणेपर्यंत आणले. त्यानंतर नागोठणे ते मुंबई-ब्रीच कॅण्डी रुग्णालय असा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. त्यामुळे १०० किमीचे अंतर फक्त सव्वा तासात पार करणे शक्य झाले. एरवी हेच अंतर पार करण्यासाठी किमान तीन ते सव्वातीन तासांचा अवधी लागतो.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग