शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

श्रीवर्धनमधील कुडगाव ग्रामपंचायतीतील दोन सरपंच, तीन ग्रामसेवकांवर दोषारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 23:51 IST

शिस्तभंगाची कारवाई : आठ वर्षांतील १५ टक्के अनुदान मागासवर्गीयांसाठी खर्च न करता बेहिशोब खर्चाचा ठपका

अलिबाग : श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले तब्बल आठ वर्षांतील हे १५ टक्के अनुदान मागासवर्गीयांकरिता प्रत्यक्षात खर्च न करता, बेहिशोब खर्च केल्याप्रकरणी २००९ ते २०१७ या आठ वर्षांच्या कालावधीतील तत्कालीन सरपंच नागूबाई गोपिनाथ वाघमारे, सरपंच दगडू महादेव काविणकर आणि ग्रामसेवक एस. एस. श्रीवर्धनकर, अभिषेक मकू व आय. पी. सोनावणे यांच्या विरुद्ध दोषारोप ठेवले आहेत, तर तिन्ही ग्रामसेवकांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नावर मिळणारे १५ टक्के अनुदान त्याच ग्रामपंचायत क्षेत्रातील मागास अनुसूचित जाती-जमातीच्या समाज घटकांच्या गरजा भागवण्याकरिता खर्च करणे संबंधित ग्रामपंचायतीला बंधनकारक असते. मात्र, कुडगाव ग्रामपंचायतीमधील बौद्ध व रोहिदास समाजाला अनुसूचित जाती व जमातीसाठी ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नावर असणारे १५ टक्के अनुदान गेली आठ वर्षे मिळाले नसल्याबाबतची तक्रार कुडगावमधील ग्रामस्थ नीलेश मोहन पवार यांनी केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने श्रीवर्धन पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. १५ टक्के अनुदान कुडगाव ग्रामपंचायतीस २००९-१० ते २०१६-१७ या आठ वर्षांच्या कालावधीत दरवर्षी मिळाले आहे, ते खर्चदेखील झाले आहेत. मात्र, कुडगाव ग्रामपंचायतीमधील बौद्ध व रोहिदास समाजाला अनुसूचित जाती व जमातीच्या समाज घटकांना त्यांचा कोणत्याही प्रकारे लाभ मिळाला नसल्याचे समोर आले आहे.

२००९-१० ते २०१६-१७ या आठ वर्षांच्या कालावधीत मागासवर्गीयांवर केलेल्या १५ टक्के अनुदानाच्या खर्चाबाबत प्रत्यक्ष दप्तर व आवश्यक दस्तावेजांची पडताळणी केल्यावर रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी सात दोषारोप, शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करताना नमूद केले आहेत. मागासवर्गीय लाभार्थींचे मागणी अर्ज घेतले नाहीत. मासिक सभेपुढे १५ टक्के खर्च करण्याबाबत ठराव पारित नाहीत, कॅशबुकात १५ टक्के खर्च दुकानदाराच्या नावे अदा आहे; परंतु संबंधित लाभार्थ्यांना साहित्य वा वस्तू वाटप केल्याबाबत पोहोच नाही, निविदा प्रक्रिया राबविलेली नाही, साठा रजिस्टरला साहित्य वा वस्तू प्राप्त झाल्याबाबत नोंद नाही, १५ टक्के रजिस्टरला मोघम स्वरूपात वाटप केलेले असून साहित्य वा वस्तूची नोंद नाही असे सात दोषारोप आहेत.

टॅग्स :Raigadरायगड