शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

दोन एकरी तलाव झाला गुंठ्यांचा, भराव करून अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 02:40 IST

भराव करून अतिक्रमण : खैरणे गावातील प्रकार; महसूलसह वनविभागाकडून कारवाईस टाळाटाळ

पनवेल : पनवेल तालुक्यातील खैरणे गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या तलावावर अतिक्रमण करण्यात आले आहे. जागा हडप करण्यासाठी तलावात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करण्यात आला आहे. सुमारे दोन एकर जागेवर विस्तारलेला तलाव भरावामुळे आता अवघ्या काही गुंठे जागेत सीमित झाला आहे.

दोन वर्षांपासून खैरणे ग्रामपंचायत यासंदर्भात महसूल व वन विभागासोबत पत्रव्यवहार करत आहे. मात्र, कारवाईचे पत्र काढून तारीख, वेळ निश्चित करूनही कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीच्या हद्दीत जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे इंचइंच जमिनीची विक्री केली जात आहे. येथील तलावातही मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करण्यात आला असून ही जागा विकण्याचा काहींचा डाव आहे.

तालुक्यातील खैरणे गावात ग्रामपंचायतीने १९७० च्या दशकांत तलाव बांधला होता. पाणीटंचाईने त्रस्त खैरणे गावाला तलावाचा एकमेव आधार आहे. ग्रामस्थ दैनंदिन वापरासाठी तलावातील पाणी वापरतात. परिसरातील गुरेही याच पाण्यावर आपली तहान भागवतात.तळोजा एमआयडीसीत असलेल्या तलावाभोवती अतिक्रमण करून तलाव बुजविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सुरुवातीला तलावाभोवती घरे बांधण्यात आली. सुमारे दोन एकर जमिनीवर असलेला हा तलाव रोजगार हमी योजनेतून बांधण्यात आल्याची नोंद ग्रामपंचायत दफ्तरी आहे. गावातील नागरिकांनी या अतिक्रमणाला वेळोवेळी विरोध केला, मात्र सत्तेच्या पुढे ग्रामस्थांचे काही चालले नाही. तीन वर्षांपूर्वी या तलावात थेट मातीचा भराव करू जागा हडप करण्याच्या उद्देशाने अतिक्रमण करण्यात आले. गावच्या सरपंच सोनाली प्रमोद माळी यांनी तलावातील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. ही जमीन वनविभागाची असल्यामुळे वनविभागाकडे पाठपुरावा करण्यात आला.आमदार बाळाराम पाटील यांनी विधानपरिषदेत हा विषय उपस्थित केल्यानंतर संबंधित तलावाची जमीन वनविभागाच्या मालकीची नसल्याचे उत्तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्यानंतर ग्रामपंचायतीने तहसील कार्यालयाशी पाठपुरावा सुरू केला. २०१८ मध्ये अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून पोलिसांना पत्र पाठवून बंदोबस्ताची मागणी केली. मात्र, कारवाई झालीच नाही. तलावाची जागा वनविभागाची नसल्याचे सिद्ध होऊन अतिक्रमणावर कारवाईची तारीख ठरविली जाते. मात्र, प्रत्यक्षात कारवाई होत नसल्यामुळे सरपंच सोनाली माळी यांनी कोकण आयुक्तांकडे या प्रकाराची तक्रार केली. त्यानंतर जागे झालेल्या प्रांत कार्यालयाने तहसील कार्यालयाला दिलेल्या आदेशानंतर तहसीलदार अमित सानप यांनी ६ जून रोजी अतिक्रमण हटविण्यासंदर्भात तयारी केली. तळोजा पोलिसांकडून बंदोबस्त मागविण्यात आला. मात्र, कारवाईच्या ठिकाणी तहसीलदार अमित सानप उपस्थित नसल्याने कारवाई पुन्हा एकदा स्थगित केली.सार्वजनिक मालकीच्या तलावातील अतिक्रमण काढण्यासाठी वेळ, तारीख निश्चित केली जाते. मात्र, कारवाई होत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. एकीकडे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन पाण्याचे स्रोत जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, पनवेल तालुक्यातील खैरणे गावात तलाव बुजवण्याचा चंगच बांधला आहे. शासनाचेही संबंधितांवर कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे.- प्रल्हाद म्हात्रे, सदस्य,खैरणे ग्रामपंचायततलाव परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावली आहेत. त्या संदर्भात वनविभागाने निर्णय घेणे अपेक्षित आहे. या ठिकाणी कोणतेही अतिक्रमण होऊ देणार नाही. शिवाय वनविभागाच्या परवानगीशिवाय येथील झाडेही तोडता येणार नाहीत. या ठिकाणी अवैधरीत्या भराव करण्यात येत असल्यास पाहणी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.- अमित सानप,तहसीलदार, पनवेल 

टॅग्स :panvelपनवेलRaigadरायगड