शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

दोन एकरांत १० टन कलिंगडे

By admin | Updated: March 10, 2017 03:37 IST

तालुक्यातील भातपीक शेतीतील नाव असलेले राजनाला कालवा परिसरातील शेतकरी विनय वेखंडे यांनी आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न कलिंगड शेतीतून घडविला आहे.

- विजय मांडे,  कर्जततालुक्यातील भातपीक शेतीतील नाव असलेले राजनाला कालवा परिसरातील शेतकरी विनय वेखंडे यांनी आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न कलिंगड शेतीतून घडविला आहे. त्यांनी आपल्या दोन एकर शेतीतून चक्क १० टन कलिंगडे पिकविली आणि तिप्पट नफा कमविला आहे.कर्जतच्या पूर्व भागातील विकासाचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या राजनाला कालव्याच्या पाण्याने अनेकांना घडविले आहे. भाताचे विक्र मी उत्पादन घेणारे शेकडो शेतकरी कर्जत तालुक्यात आहेत. त्यातील वदप येथील विनय वेखंडे हे एक मोठे नाव. वर्षानुवर्षे भाताचे पीक घेणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना राजनाला कालवा बंद झाला आणि वेगळा विचार करायला भाग पाडले. अनेक शेतकऱ्यांनी राजनाला कालव्याचे पाणी बंद असल्याने भाजीपाला, कडधान्य यांची म्हणजे कमी पाण्यावर होणारी शेती केली. वेखंडे यांनी आपल्या शेतीपैकी पाच एकर जमिनीवर मागील तीन वर्षे भाजीपाला शेती केली. त्यात नफा झाला, पण समाधानकारक शेती करता येत नसल्याने २०१६ च्या सुरु वातीला कलिंगडाचे पीक काही भागात घेण्याचा लहानसा प्रयत्न केला. मात्र यावर्षी आधुनिक पद्धतीने कलिंगडाचे पीक घेण्यासाठी आॅक्टोबर २०१६ मध्ये नियोजन केले. ९० दिवसांच्या कलिंगडाचे पीक घेण्यासाठी १५ डिसेंबर रोजी वेखंडे यांनी वाफ्यांवर रोपे लावून घेतली. दोन एकर शेतीसाठी ७० हजार खर्च आला आहे. दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल १० टन कलिंगडाचे उत्पादन वेखंडे यांनी मिळविले आहे. कर्जतच्या बाजारात तर कधी पनवेलच्या बाजारात वेखंडे यांच्या गावठी कलिंगडांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले. त्याचे कारण म्हणजे चार किलोपासून पुढे वजन असलेली कलिंगडे वेखंडे यांच्या शेतात लावली होती. मुख्य म्हणजे यावर्षीचा महाशिवरात्री महोत्सवात त्यांनी मोठ्या प्रमाणात कलिंगडाची विक्र ी केली असून झालेल्या खर्चाच्या तिप्पट नफा मिळविला आहे. वेखंडे यांच्या कलिंगडाचे १० टनाहून अधिक उत्पादनाची चर्चा असून असंख्य शेतकरी कलिंगडाचे पीक पाहण्यासाठी वदप गावातील शेताला भेट देत आहेत.शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन केल्याने आणि आधुनिक पद्धत स्वीकारत असताना योग्य नियोजन केल्याने चांगले पीक आले. दोन एकरमध्ये १० टन कलिंगडाचे उत्पन्न आल्याने नफा झाला आहे.-विनय वेखंडे, शेतकरी