शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दोन एकरांत १० टन कलिंगडे

By admin | Updated: March 10, 2017 03:37 IST

तालुक्यातील भातपीक शेतीतील नाव असलेले राजनाला कालवा परिसरातील शेतकरी विनय वेखंडे यांनी आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न कलिंगड शेतीतून घडविला आहे.

- विजय मांडे,  कर्जततालुक्यातील भातपीक शेतीतील नाव असलेले राजनाला कालवा परिसरातील शेतकरी विनय वेखंडे यांनी आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न कलिंगड शेतीतून घडविला आहे. त्यांनी आपल्या दोन एकर शेतीतून चक्क १० टन कलिंगडे पिकविली आणि तिप्पट नफा कमविला आहे.कर्जतच्या पूर्व भागातील विकासाचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या राजनाला कालव्याच्या पाण्याने अनेकांना घडविले आहे. भाताचे विक्र मी उत्पादन घेणारे शेकडो शेतकरी कर्जत तालुक्यात आहेत. त्यातील वदप येथील विनय वेखंडे हे एक मोठे नाव. वर्षानुवर्षे भाताचे पीक घेणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना राजनाला कालवा बंद झाला आणि वेगळा विचार करायला भाग पाडले. अनेक शेतकऱ्यांनी राजनाला कालव्याचे पाणी बंद असल्याने भाजीपाला, कडधान्य यांची म्हणजे कमी पाण्यावर होणारी शेती केली. वेखंडे यांनी आपल्या शेतीपैकी पाच एकर जमिनीवर मागील तीन वर्षे भाजीपाला शेती केली. त्यात नफा झाला, पण समाधानकारक शेती करता येत नसल्याने २०१६ च्या सुरु वातीला कलिंगडाचे पीक काही भागात घेण्याचा लहानसा प्रयत्न केला. मात्र यावर्षी आधुनिक पद्धतीने कलिंगडाचे पीक घेण्यासाठी आॅक्टोबर २०१६ मध्ये नियोजन केले. ९० दिवसांच्या कलिंगडाचे पीक घेण्यासाठी १५ डिसेंबर रोजी वेखंडे यांनी वाफ्यांवर रोपे लावून घेतली. दोन एकर शेतीसाठी ७० हजार खर्च आला आहे. दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल १० टन कलिंगडाचे उत्पादन वेखंडे यांनी मिळविले आहे. कर्जतच्या बाजारात तर कधी पनवेलच्या बाजारात वेखंडे यांच्या गावठी कलिंगडांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले. त्याचे कारण म्हणजे चार किलोपासून पुढे वजन असलेली कलिंगडे वेखंडे यांच्या शेतात लावली होती. मुख्य म्हणजे यावर्षीचा महाशिवरात्री महोत्सवात त्यांनी मोठ्या प्रमाणात कलिंगडाची विक्र ी केली असून झालेल्या खर्चाच्या तिप्पट नफा मिळविला आहे. वेखंडे यांच्या कलिंगडाचे १० टनाहून अधिक उत्पादनाची चर्चा असून असंख्य शेतकरी कलिंगडाचे पीक पाहण्यासाठी वदप गावातील शेताला भेट देत आहेत.शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन केल्याने आणि आधुनिक पद्धत स्वीकारत असताना योग्य नियोजन केल्याने चांगले पीक आले. दोन एकरमध्ये १० टन कलिंगडाचे उत्पन्न आल्याने नफा झाला आहे.-विनय वेखंडे, शेतकरी