शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

भाऊसाहेब राऊत विद्यालयाला २५ वर्षांनंतर तारांचे कुंपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:39 IST

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आदिजन विद्या प्रसारक मंडळाच्या भाऊसाहेब राऊत विद्यालयाला सुमारे २५ वर्षे कुंपणाची भिंत नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत होती.

- कांता हाबळेनेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आदिजन विद्या प्रसारक मंडळाच्या भाऊसाहेब राऊत विद्यालयाला सुमारे २५ वर्षे कुंपणाची भिंत नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत होती. चिंचवली ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापनाच्या वादात ही संरक्षक भिंत रखडली असल्याचे समोर आले होते. अखेर पालक आणि ग्रामस्थांच्या तक्र ारीनंतर यावर तोडगा काढत शाळेला तारेचे कंपाउंड घातल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.कर्जत-कल्याण या राज्यमार्गाला लागून कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत भाऊसाहेब राऊत विद्यालय आहे. ही शाळा अनेक वर्षे संरक्षक भिंतीअभावी चर्चेत होती. १९८१ मध्ये या शाळेची स्थापना झाली आहे. शाळेच्या स्थापनेपासून २५ वर्षे शाळेला कुठल्याही प्रकारची संरक्षक भिंत नव्हती. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. येथे शिशू वर्गापासून बारावीपर्यंत सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा व्यवस्थापनाकडून कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नव्हती.शाळेच्या समोर कर्जत-कल्याण राज्यमार्ग असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरूच असते. शाळा सुटण्याच्या वेळी सर्व विद्यार्थी या राज्यमार्गावर येत असल्याने वेगाने कार, ट्रक ये-जा करत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा प्रशासनाने या शाळेला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या संदर्भात पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्र ारी केल्या होत्या, तसेच माध्यमांतून या संदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्या होता.चिंचवली ग्रामपंचायतीने सहकार्य केल्याने शाळा व्यवस्थापनाला हे तारेचे कंपाउंड घालता आले. गेली अनेक वर्षे शाळेला संरक्षक भिंत नसल्याने विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. पालक आणि ग्रामस्थांच्या तक्र ारीनंतर शाळेला तारेचे कंपाउंड घालण्यात आले आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा बचाव होण्यास मदत होणार आहे.- किशोर गायकवाड, ग्रामस्थ, डिकसळशाळेला कंपाउंड नसल्याने मुलांच्या जीवाला धोका संभवत होता. अनेक वेळा आम्ही शाळेकडे संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी केली होती. अखेर शाळेने तारेचे कंपाउंड घातले आहे, त्यामुळे धोका टळला असल्याने शाळेचे आभार.- हरिश्चंद्र वाघमारे, पालक

टॅग्स :Raigadरायगड