शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

भाऊसाहेब राऊत विद्यालयाला २५ वर्षांनंतर तारांचे कुंपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:39 IST

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आदिजन विद्या प्रसारक मंडळाच्या भाऊसाहेब राऊत विद्यालयाला सुमारे २५ वर्षे कुंपणाची भिंत नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत होती.

- कांता हाबळेनेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आदिजन विद्या प्रसारक मंडळाच्या भाऊसाहेब राऊत विद्यालयाला सुमारे २५ वर्षे कुंपणाची भिंत नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत होती. चिंचवली ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापनाच्या वादात ही संरक्षक भिंत रखडली असल्याचे समोर आले होते. अखेर पालक आणि ग्रामस्थांच्या तक्र ारीनंतर यावर तोडगा काढत शाळेला तारेचे कंपाउंड घातल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.कर्जत-कल्याण या राज्यमार्गाला लागून कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत भाऊसाहेब राऊत विद्यालय आहे. ही शाळा अनेक वर्षे संरक्षक भिंतीअभावी चर्चेत होती. १९८१ मध्ये या शाळेची स्थापना झाली आहे. शाळेच्या स्थापनेपासून २५ वर्षे शाळेला कुठल्याही प्रकारची संरक्षक भिंत नव्हती. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. येथे शिशू वर्गापासून बारावीपर्यंत सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा व्यवस्थापनाकडून कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नव्हती.शाळेच्या समोर कर्जत-कल्याण राज्यमार्ग असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरूच असते. शाळा सुटण्याच्या वेळी सर्व विद्यार्थी या राज्यमार्गावर येत असल्याने वेगाने कार, ट्रक ये-जा करत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा प्रशासनाने या शाळेला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या संदर्भात पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्र ारी केल्या होत्या, तसेच माध्यमांतून या संदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्या होता.चिंचवली ग्रामपंचायतीने सहकार्य केल्याने शाळा व्यवस्थापनाला हे तारेचे कंपाउंड घालता आले. गेली अनेक वर्षे शाळेला संरक्षक भिंत नसल्याने विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. पालक आणि ग्रामस्थांच्या तक्र ारीनंतर शाळेला तारेचे कंपाउंड घालण्यात आले आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा बचाव होण्यास मदत होणार आहे.- किशोर गायकवाड, ग्रामस्थ, डिकसळशाळेला कंपाउंड नसल्याने मुलांच्या जीवाला धोका संभवत होता. अनेक वेळा आम्ही शाळेकडे संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी केली होती. अखेर शाळेने तारेचे कंपाउंड घातले आहे, त्यामुळे धोका टळला असल्याने शाळेचे आभार.- हरिश्चंद्र वाघमारे, पालक

टॅग्स :Raigadरायगड