शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

मानव विकास कार्यक्रम अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:45 IST

मानव विकास कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील सुधागड-पाली या तालुक्याची निवड करण्यात आली आहे. तालुक्यामध्ये गरोदर माता आणि लहान मुलांच्या आरोग्याची

आविष्कार देसाई अलिबाग : मानव विकास कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील सुधागड-पाली या तालुक्याची निवड करण्यात आली आहे. तालुक्यामध्ये गरोदर माता आणि लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या शिबिरामध्ये सरकारी तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने चांगलीच अडचण निर्माण होत आहे. वेळ निभावून नेण्यासाठी लगतच्या तालुक्यातील तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्याची वेळ आयोजकांवर येते.तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे मानव विकास कार्यक्रमातून खरोखरच सुधागड तालुक्यातील मानवाचा विकास साधला जाणार का, हा मोठा प्रश्न आहे.यातून मार्ग काढण्यासाठी आता आरोग्य प्रशासन रायगड मेडिकल असोसिएशनची मदत घेणार आहे. याबाबत असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुढील शिबिरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील, असे मानण्यास काहीच हरकत नाही.मानवाच्या बळकटीकरणासाठी मानव विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागड-पाली तालुक्याची निवड करण्यात आली आहे.तालुक्यातील पाली आणि जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील गरोदर मातांसह लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य शिबिर पार पडली आहेत.२०१६-१७ आणि २०१७-१८ या कालावधीत मानव विकास कार्यक्रमासाठी ४९ लाख २८ हजार रुपयांचे अनुदान सरकारने देऊ केले होते. एकूण ६१ शिबिरांसाठी १० लाख ८४ हजार ५६ रुपये खर्च करण्यात आला आहे. एक हजार ८३५ गरोदर मांताच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. ७५६ गरोदर मातांना बुडीत मजुरीसाठी २६ लाख ७६ हजार रुपये देण्यात आले आहेत. शिबिरामध्ये एक हजार ४७७ बालकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सॅम/मॅम श्रेणीतील १४८ बालके आढळली.यातील गंभीर बाब म्हणजे ज्या गरोदर माता, स्तनदा माता यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी पाली आणि जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नाहीत. त्याचप्रमाणे लहान मुलांच्याही तज्ज्ञ डॉक्टरांचीही वानवा आहे.मानव विकास कार्यक्रमामध्ये ज्या सुधागड-पाली तालुक्याची निवड केली आहे. त्या अंतर्गत येणाऱ्या पाली आणि जांभुळपाडा या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टरच नसणे हे गंभीर आहे.शिबिर यशस्वी करण्यासाठी तेथील आरोग्यप्रमुखांना लगतच्या तालुक्यातील तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करावे लागते; परंतु हाताच्या बोटावर मोजणारेच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सरकारी सेवेत आहेत.यातील दुसरी गंभीर बाब म्हणजे अलिबाग या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असणाºया जिल्हा सरकारी रुग्णालयात लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टरच नाहीत. त्यामुळे मानव विकास कार्यक्रमातून खरोखरच मानवाचा विकास साधला जाणार का? हा प्रश्न आहे.