शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

मानव विकास कार्यक्रम अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:45 IST

मानव विकास कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील सुधागड-पाली या तालुक्याची निवड करण्यात आली आहे. तालुक्यामध्ये गरोदर माता आणि लहान मुलांच्या आरोग्याची

आविष्कार देसाई अलिबाग : मानव विकास कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील सुधागड-पाली या तालुक्याची निवड करण्यात आली आहे. तालुक्यामध्ये गरोदर माता आणि लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या शिबिरामध्ये सरकारी तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने चांगलीच अडचण निर्माण होत आहे. वेळ निभावून नेण्यासाठी लगतच्या तालुक्यातील तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्याची वेळ आयोजकांवर येते.तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे मानव विकास कार्यक्रमातून खरोखरच सुधागड तालुक्यातील मानवाचा विकास साधला जाणार का, हा मोठा प्रश्न आहे.यातून मार्ग काढण्यासाठी आता आरोग्य प्रशासन रायगड मेडिकल असोसिएशनची मदत घेणार आहे. याबाबत असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुढील शिबिरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील, असे मानण्यास काहीच हरकत नाही.मानवाच्या बळकटीकरणासाठी मानव विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागड-पाली तालुक्याची निवड करण्यात आली आहे.तालुक्यातील पाली आणि जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील गरोदर मातांसह लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य शिबिर पार पडली आहेत.२०१६-१७ आणि २०१७-१८ या कालावधीत मानव विकास कार्यक्रमासाठी ४९ लाख २८ हजार रुपयांचे अनुदान सरकारने देऊ केले होते. एकूण ६१ शिबिरांसाठी १० लाख ८४ हजार ५६ रुपये खर्च करण्यात आला आहे. एक हजार ८३५ गरोदर मांताच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. ७५६ गरोदर मातांना बुडीत मजुरीसाठी २६ लाख ७६ हजार रुपये देण्यात आले आहेत. शिबिरामध्ये एक हजार ४७७ बालकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सॅम/मॅम श्रेणीतील १४८ बालके आढळली.यातील गंभीर बाब म्हणजे ज्या गरोदर माता, स्तनदा माता यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी पाली आणि जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नाहीत. त्याचप्रमाणे लहान मुलांच्याही तज्ज्ञ डॉक्टरांचीही वानवा आहे.मानव विकास कार्यक्रमामध्ये ज्या सुधागड-पाली तालुक्याची निवड केली आहे. त्या अंतर्गत येणाऱ्या पाली आणि जांभुळपाडा या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टरच नसणे हे गंभीर आहे.शिबिर यशस्वी करण्यासाठी तेथील आरोग्यप्रमुखांना लगतच्या तालुक्यातील तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करावे लागते; परंतु हाताच्या बोटावर मोजणारेच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सरकारी सेवेत आहेत.यातील दुसरी गंभीर बाब म्हणजे अलिबाग या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असणाºया जिल्हा सरकारी रुग्णालयात लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टरच नाहीत. त्यामुळे मानव विकास कार्यक्रमातून खरोखरच मानवाचा विकास साधला जाणार का? हा प्रश्न आहे.