शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हातपाटी वाळू व्यवसाय बंद

By admin | Updated: October 12, 2015 04:52 IST

वर्षभर बंद असलेल्या हातपाटी वाळू व्यवसायाला दोन महिन्यांपूर्वी परवानगी दिली आहे. मात्र खणीकरणाचा शेवटचा महिना सप्टेंबर असल्याने या हातपाटी वाळू व्यवसायाला एकच महिन्याची

दासगांव : वर्षभर बंद असलेल्या हातपाटी वाळू व्यवसायाला दोन महिन्यांपूर्वी परवानगी दिली आहे. मात्र खणीकरणाचा शेवटचा महिना सप्टेंबर असल्याने या हातपाटी वाळू व्यवसायाला एकच महिन्याची उपसा करण्यास परवानगी मिळाली होती. त्या उपशाची मुदतही शनिवारी (१० आॅक्टोबर) रात्री १२ वाजता संपल्याने वाळू व्यावसायिक व यावर अवलंबून असणारे मजूर तसेच बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने सुरू असलेला महाड तालुक्यातील सावित्री खाडीतील हातपाटी वाळू व्यवसाय गेले वर्षभर संपूर्णपणे बंद होता. मात्र शासनाचा बुडत असलेला महसूल व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचा विचार करीत अखेर शासनाने हातपाटी वाळू व्यवसायावरून बंदी उठवली व उपसा करण्यास परवानगी दिली. मात्र परवानगीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर परवानगीसाठी लागणाऱ्या या व्यवसायाला संबंधित अनेक कार्यालयांतील परवानग्या (नाहरकत दाखले) दिल्यानंतरच वाळू उपसा करण्यासाठी रीतसर रॉयल्टी उपसा परवाना देण्यात आला. मात्र गौनखणीकरणाचा वर्षाचा शेवटचा महिना सप्टेंबर असल्याने या वाळू उपशाला फक्त एकच महिन्याची परवानगी मिळाली होती. या परवानगीच्या काळातदेखील गणेशोत्सव आल्यामुळे जवळपास १७ दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने मुदतवाढ करून देण्यात आली होती. मात्र त्याची ही मुदत शनिवारी रात्री संपल्याने हातपाटी वाळू व्यवसाय सध्या पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारे बांधकाम व्यावसायिक पुन्हा अडणीत आले आहेत. हातपाटी वाळू व्यवसायाला शासनाकडून परवानगी असली तरी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या परवानगीसाठी कागदपत्रांची पूर्तता होत नाही तोपर्यंत नवीन उपसा परवाना मिळत नाही. नवीन परवान्याच्या नियमानुसार महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड, मुंबई यांनी इन्लॅन्ड व्हसल अ‍ॅक्ट १९१७ नुसार बोटी रजिस्टर करण्यास सांगितल्याने पुन्हा वाळू व्यवसाय अडचणीत आला आहे.वर्षभर बंदीच्या काळात ज्या बांधकाम व्यावसायिकांनी चोरटी वाळू घेऊन बांधकाम पूर्ण केले २४ महाड तालुक्यातील बांधकाम व्यावसायिकांना ५० लाख ७६ हजार ८२२ रुपये दंड महाड तहसीलदारांनी ठोठावल्याने सध्या बंद झालेल्या या वाळूमुळे महाड तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक मोठ्या चिंतेत आहेत. तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेले मजूरही हवालदिल झाले आहेत. (वार्ताहर)