शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

भात पेरण्या अडचणीत

By admin | Updated: June 18, 2017 02:11 IST

: जिल्ह्यात ८ जून रोजी दाखल झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, भात पेरणीला सुरुवात करण्यात आली होती. भाताची रोपेही उगवली. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्ह्यात ८ जून रोजी दाखल झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, भात पेरणीला सुरुवात करण्यात आली होती. भाताची रोपेही उगवली. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. मृग नक्षत्रावर आलेल्या पावसामुळे नदी-नाले, तळी, विहिरी आणि पांटबंधारे तलाव भरतील आणि जिल्ह्यातील उन्हाळी पाणीटंचाई संपुष्टात येईल, ही आशादेखील फोल ठरली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ९१ गावे आणि ३०७ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असून, तीन टँकर्सच्या माध्यमातून येथे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जिल्ह्यातील भात लागवडीखालील एकूण १ लाख २३ हजार हेक्टर खरिपातील क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या १० टक्के म्हणजे सुमारे १० हजार हेक्टरवर जिल्ह्यात भाताच्या पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. जिल्ह्यात ८० टक्के पेरण्या पूर्ण होऊन भात रोपांची उगवणदेखील चांगली झाली; परंतु आता पावसाने दडी मारल्याने, केवळ पावसाच्या पाण्यावर अबलंबून असणाऱ्या भात पेरण्या तप्त उन्हाने करपून जाऊ लागल्या आहेत. २१ जून ते ५ जुलै दमदार पावसाचे भाकीत२१ जून २०१७ रोजी आर्द्रा नक्षत्रावर येणारा पाऊस हा दमदार आणि शेतीला पूरक असाच राहणार असून, तो ५ जुलैपर्यंत चांगल्या प्रकारे पडेल, असे पर्जन्य भाकीत पेण येथील सूक्ष्म आयुर्वेदतज्ज्ञ, ज्येष्ठ ज्योतिषी तथा सूर्य-चंद्र-नक्षत्र अभ्यासक डॉ. संजय टिळक यांनी व्यक्त केले आहे.पहिल्या टप्प्यातील पाऊस जमिनीतच मुरलागतवर्षी १६ जून २०१७पर्यंत एकूण ८४२.१० मि.मी. (सरासरी ५२.६३मि.मी.) पाऊस झाला होता. तोच पाऊस यंदा १६ जून २०१७ रोजीपर्यंत ४०३७ मि.मी.(सरासरी २५२मि.मी.) म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत पाचपट होऊनदेखील पाण्याचे दुर्भीक्ष संपू शकले नाही. याचे कारण यंदाच्या उन्हाळ््यात वाढलेले विक्रमी तापमान. भिरा येथे ४६ डी.से. अधिकतम तापमानाची नोंद झाली होती. या विक्रमी तापमानामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे यंदा पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस पूर्णपणे जमिनीत जिरल्याने जलदुर्भीक्ष कमी होऊ शकले नाही, असा निष्कर्ष पोलादपूर येथील एस. एम. कॉलेजचे प्राचार्य व भूगोलतज्ज्ञ डॉ. समीर बुटाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.भात पेरण्या वाचवायच्या कशा? येत्या २१ जून रोजी ‘म्हैस’ या आपल्या वाहनावरून येणाऱ्या आर्द्रा नक्षत्रावरील पाऊस चांगल्या प्रकारे होणार, असा आशावाद शेतकऱ्यांना आहे; परंतु तोपर्यंत भात पेरण्या वाचवायच्या कशा? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.तप्त कातळावर पाऊस पडल्याने भूस्खलनाचा धोका विक्रमी तापमानामुळे सह्याद्रीमधील डोंगरकडे व खडक अधिक प्रमाणात तप्त झाले. त्यावर पाऊस पडला तर त्या कातळांच्या वरील डोंगरावरून वाहात आलेले पावसाचे पाणी या कातळावर आले आणि हे कातळ काही ठिकाणी फुटून भूस्खलन (लॅण्डस्लाइड) झाल्याचेही दिसून येत असल्याचा आणखी एक निष्कर्ष डॉ. बुटाला यांनी स्पष्ट केला आहे.सामूहिक रोपवाटपाचा शेतकऱ्यांना सल्लाभाताच्या पेरण्या करपून गेल्या, तर पुन्हा भात पेरण्या कराव्या लागून पहिले बियाणे फुकट जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी हळव्या निम गरव्या भात जातींचा वापर करावा. ज्यांच्याकडे विहिरी-ओढ्यांचे पाणी उपलब्ध आहे. त्यांनी रोपवाटप करावेत. शक्य तेथे शेतकऱ्यांनी सामूहिक रोपवाटप करावे. विहिरी, नदी-नाले यांमधील पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करावे, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.