शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘होस्टेल तेथे उपोषण’

By admin | Updated: September 1, 2015 04:40 IST

आपल्या वसतिगृहातील सोयी-सुविधा आपल्याला मिळण्याकरिता २१ आॅगस्टला पेण येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयात, शासनाच्या वसतिगृहात राहणाऱ्या

जयंत धुळप, अलिबागआपल्या वसतिगृहातील सोयी-सुविधा आपल्याला मिळण्याकरिता २१ आॅगस्टला पेण येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयात, शासनाच्या वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी मुलांनी स्वत:ला व कर्मचाऱ्यांना कोंडून घेण्याचे आंदोलन केले होते. त्यावेळी आदिवासी मुलांवर दाखल केलेले फौजदारी स्वरुपाचे गुन्हे मागे घ्यावेत अशा मागणीचे निवेदन आदिवासी प्रकल्प अधिकारी, जिल्हाधिकारी यांना दिले होते. याबाबत कार्यवाही न करता, गुन्हेही मागे घेतले नाहीत. हे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी रायगड, ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्यातील शासकीय आदिवासी वसतिगृहांतील मुलांनी सोमवारपासून ‘जेथे होस्टेल तेथे उपोषण’ हे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाची माहिती आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह कृती समितीचे सुनील तोटावाड, अजय तुंबडा व योगेश खाडे यांनी दिली आहे. २१ आॅगस्टला आंदोलनावेळी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह पनवेल व कोळवाडी वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर झालेल्या फौजदारी कार्यवाहीच्या अनुषंगाने पेण येथील प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांची बदली करावी तसेच पोलीस तक्रार मागे घ्यावी अशी आमची मागणी असल्याचे तोटावाड यांनी सांगितले. अपर आयुक्त ठाणे अंतर्गत येणाऱ्या ८७ वसतिगृहांपैकी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण, या प्रकल्पाअंतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह पनवेल येथील विद्यार्थ्यांनी, ठाणे अपर आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व वसतिगृहांसाठी व स्वत:ला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरणासाठी वारंवार आदिवासी विकास विभागाच्या प्रत्येक कार्यालयात लोकशाही मार्गाने पत्रव्यवहार करुन मोर्चा, आंदोलने, अर्ज, विनंत्या केल्या होत्या. पेण प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांना पत्रव्यवहार करुनही त्यांनी समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या नाही. या संदर्भात विद्यार्थी त्यांच्याकडे भेट घेण्याकरिता गेले असता प्रकल्प अधिकारी यांनी तेथेही विद्यार्थ्यांस भेटण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांनी २१ आॅगस्टला पनवेल, पेणसह कर्जत व प्रकल्पातील इतर ३५० च्या आसपास विद्यार्थी हे कार्यालयात कोंडून घेणाऱ्यात समाविष्ट होते. १०० पेक्षा जास्त विद्यार्थी हे प्रकल्पाच्या समोर रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. परंतु प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांचा विचार न करता ज्या नऊ विद्यार्थ्यांनी शासनस्तरावर माहिती अधिकारात माहिती मागितली होती त्यांच्यावर पूर्ववैमनस्य व आकसबुध्दीने पुढे करत ३०९ विद्यार्थ्यांवर बनावट गुन्हे दाखल केल्याचे निवेदनात नमूद आहे.