शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

जन आरोग्य आयुष्मान भारत योजनेपासून आदिवासी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:36 IST

पैशाअभावी उपचार घेता येत नाहीत, परिणामी मृत्यूला सामोरे जावे लागते

कर्जत : तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. मात्र असे असताना येथील आदिवासी बांधव प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजनेपासून वंचित असल्याचे विदारक चित्र आहे. यामुळे आदिवासी बांधवांना मोठा गंभीर आजार झाल्यास त्यांना पैशाअभावी उपचार घेता येत नाहीत, परिणामी मृत्यूला सामोरे जावे लागते अशी चिंताजनक स्थिती आहे.आदिवासींचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती, शेतात मोलमजुरी, वीटभट्टीवर मोलमजुरी होय. आजच्या महागाईच्या काळात मोलमजुरी, काबाडकष्ट करणाऱ्या आदिवासी बांधवांची परिस्थिती मुळातच हलाखीची असते. त्यामुळे कुटुंबातील एखाद्याला गंभीर आजार जडल्यास रुग्णाकडे उपचारांसाठी पैसे नसतात. त्यांना खासगी रुग्णालयातील महागडे उपचार परवडत नाहीत. त्यामुळे प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजनेचा लाभ सर्व आदिवासी बांधवांना मिळाल्यास ही समस्या सुटू शकते. मात्र खेदाची बाब म्हणजे या आदिवासी बांधवांपैकी फक्त ३० टक्के आदिवासींनाच या योजनेचा लाभ मिळत असून ७० टक्के आदिवासी या योजनेपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. याचे कारण संबंधित अधिकाऱ्यांची उदासीनता, कागदपत्रांवरून अडवणूक केली जाते, असे आदिवासी कार्यकर्ते मनोहर पादीर यांचे म्हणणे आहे. तरी या सर्व गोष्टींची शासनाने गंभीर दखल घेऊन सर्व आदिवासी बांधवांपर्यंत हा लाभ का पोहोचत नाही याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्रांताधिकारी वैशाली परदेशी आणि कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा आदिवासी कार्यकर्ते मनोहर पादीर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रसंगी तालुका अध्यक्ष चाहू सराई, उपाध्यक्ष पुंडलिक उघडे, सचिव धर्मा निरगुडा, उपाध्यक्ष काळुराम वारघडा, खजिनदार पांडुरंग पुजारा, युवा अध्यक्ष प्रकाश बांगारे, गोविंद ठोंबरे आदी आदिवासी उपस्थित होते.