शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

जन आरोग्य आयुष्मान भारत योजनेपासून आदिवासी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:36 IST

पैशाअभावी उपचार घेता येत नाहीत, परिणामी मृत्यूला सामोरे जावे लागते

कर्जत : तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. मात्र असे असताना येथील आदिवासी बांधव प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजनेपासून वंचित असल्याचे विदारक चित्र आहे. यामुळे आदिवासी बांधवांना मोठा गंभीर आजार झाल्यास त्यांना पैशाअभावी उपचार घेता येत नाहीत, परिणामी मृत्यूला सामोरे जावे लागते अशी चिंताजनक स्थिती आहे.आदिवासींचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती, शेतात मोलमजुरी, वीटभट्टीवर मोलमजुरी होय. आजच्या महागाईच्या काळात मोलमजुरी, काबाडकष्ट करणाऱ्या आदिवासी बांधवांची परिस्थिती मुळातच हलाखीची असते. त्यामुळे कुटुंबातील एखाद्याला गंभीर आजार जडल्यास रुग्णाकडे उपचारांसाठी पैसे नसतात. त्यांना खासगी रुग्णालयातील महागडे उपचार परवडत नाहीत. त्यामुळे प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजनेचा लाभ सर्व आदिवासी बांधवांना मिळाल्यास ही समस्या सुटू शकते. मात्र खेदाची बाब म्हणजे या आदिवासी बांधवांपैकी फक्त ३० टक्के आदिवासींनाच या योजनेचा लाभ मिळत असून ७० टक्के आदिवासी या योजनेपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. याचे कारण संबंधित अधिकाऱ्यांची उदासीनता, कागदपत्रांवरून अडवणूक केली जाते, असे आदिवासी कार्यकर्ते मनोहर पादीर यांचे म्हणणे आहे. तरी या सर्व गोष्टींची शासनाने गंभीर दखल घेऊन सर्व आदिवासी बांधवांपर्यंत हा लाभ का पोहोचत नाही याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्रांताधिकारी वैशाली परदेशी आणि कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा आदिवासी कार्यकर्ते मनोहर पादीर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रसंगी तालुका अध्यक्ष चाहू सराई, उपाध्यक्ष पुंडलिक उघडे, सचिव धर्मा निरगुडा, उपाध्यक्ष काळुराम वारघडा, खजिनदार पांडुरंग पुजारा, युवा अध्यक्ष प्रकाश बांगारे, गोविंद ठोंबरे आदी आदिवासी उपस्थित होते.