शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

शेताच्या बांधावर लागणार वृक्ष आणि मिळणार रोजगारही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 02:51 IST

वृक्षलागवड करून पर्यावरणाचे संवर्धन साधताना ग्रामीण भागातील अल्पभूधारक, शेतकºयांना, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ही योजना नुकतीच १२ एप्रिल रोजी शासन निर्णय जारी करून लागू केली आहे.

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) शेतकऱ्यांच्या शेतावर सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षलागवड होणार असून, या रोपांचे देखभाल संगोपन केल्याबद्दल शेतकºयांना आर्थिक मोबदलाही दिला जाणार आहे. वृक्षलागवड करून पर्यावरणाचे संवर्धन साधताना ग्रामीण भागातील अल्पभूधारक, शेतकºयांना, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ही योजना नुकतीच १२ एप्रिल रोजी शासन निर्णय जारी करून लागू केली आहे.सामाजिक वनीकरण विभागामार्फत ही योजना राबविली जाणार आहे. मग्रारोहयोजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर किंवा शेतकºयांच्या शेतजमिनीवर ही वृक्षलागवड होणार आहे. ही योजना शेतकºयांच्या वैयक्तिक लाभाची योजना आहे. याआधी कृषी व पदूम विभागांमार्फत अशाप्रकारे मान्यता देण्यात आली होती.आता सामाजिक वनीकरण विभागामार्फतही अशाप्रकारे वृक्षलागवड करता येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, स्त्रीकर्ता असलेली कुटुंबे, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी, तसेच लहान व सीमांतभूधारक शेतकरी यांच्या जमिनीवरील कामांना प्राधान्य द्यावे, असेही या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.मग्रारोहयोसाठी जॉबधारक असलेले आणि वर नमूद केलेल्या सर्व घटकांतील कोणीही व्यक्ती लाभ घेण्यास पात्र आहे. इच्छुक लाभार्थ्यांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. ग्रामपंचायतीने तो अर्ज शिफारस करून वनविभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेस हस्तांतरित करावा. मग्रारोहयोच्या कार्यपद्धतीप्रमाणे ग्रामपंचायत व ग्रामसभा यांच्या सहकार्याने कोणाला किती लाभ घेता येईल, याबाबत ग्रामसभेत निर्णय घ्यावा लागेल.एखाद्या गावात असलेला शेतकºयांचा गटही या प्रकल्पात सहभागी होऊ शकेल; परंतु तो स्वतंत्र प्रकल्प समजण्यात येईल. अशाप्रकारे निवडलेल्या लाभार्थ्यांच्या यादीस जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीची मंजुरी घ्यावी लागेल.लाभार्थ्यांना आपल्या शेतात १ जून ते ३० नोव्हेंबरपर्यंत वृक्षलागवड करावी लागेल. हे लाभार्थी हे मग्रारोहयोचे जॉब कार्डधारक असल्याने वृक्षांचे सवर्धन व जोपासना करणे, ही लाभार्थ्यांची जबाबदारी राहील. दुसºया व तिसºया वर्षी बागायत वृक्ष पिकांच्या बाबतीत जे लाभार्थी कमीत कमी ९० टक्के व कोरडवाहू वृक्ष पिकांच्या बाबतीत ७५ टक्के झाडे जिवंत ठेवतील, अशाच लाभार्थ्यांना दुसºया व तिसºया वर्षाचे अनुदान देय असेल.लाभार्थ्यांना रोपे नजीकच्या भागात उपलब्ध करून देण्याबाबत प्रांताधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समिती निर्णय घेईल. या समितीचे सदस्य सचिव वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण हे असतील. लाभार्थ्याला त्याच्या पसंतीने रोपे कलमांची निवड करता येणार आहे. या योजनेत लाभार्थ्याने संपूर्ण वृक्षलागवड कार्यक्र मासाठी पूर्वहंगामी मशागत कामे, खड्डे खोदणे, वृक्षांची लागवड करणे, पाणी देणे, कीटकनाशके/औषध फवारणी, झाडांचे संरक्षण करणे, ही कामे स्वत: अथवा जॉबधारक मजुरांकडून करून घ्यावयाची आहेत. इतर जॉबधारकही ही कामे करू शकतात व त्यांना नरेगाची मजुरी मिळू शकते. मजुरीची रक्कम पोस्टामार्फत अथवा बँकेमार्फत दिली जाईल. लाभार्थ्याने अर्जासोबत जातीचा दाखला, दारितद्र्य रेषेखालील दाखला इ. तहसीलदारांकडून प्राप्त करून घेऊन जोडणे आवश्यक आहे. ग्राम रोजगार नोंदवहीत व ग्राम मालमत्ता नोंदवहीत सर्व प्रकारच्या नोंदी घेणे, आवश्यक आहे.वृक्षलागवडीसाठी लागणारी रोपे, कलमे लाभार्थी सामाजिक वनीकरण शाखेच्या सल्ल्याने स्वत: खरेदी करतील, त्याचा खर्च सामाजिक वनीकरण विभागाने प्रमाणित केल्यावर रोपांची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. सदर वृक्षलागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभाग तांत्रिक व अन्यप्रकारचे मार्गदर्शन लाभार्थ्यांना करेल.या योजनेचा शेतकºयांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेती