शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रायगड जिल्ह्यातील रुग्णांवर पनवेलच्या एमजीएममध्येच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:36 IST

आदिती तटकरे : अलिबाग, महाड, माणगावमध्ये संशयितांवर उपचार

आविष्कार देसाई।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कोरोनाबाधित तसेच अत्यावस्थ रुग्णांवर आता पनवेल येथील एमजीएम रुग्णालयातच उपचार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माणगाव या ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये कोरोना संशयित आणि कोरोनाचा कमी त्रास असणाऱ्या रुग्णांना ठेवण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

लॉकडाउननंतर कोकणामध्ये सुमारे सात लाख नागरिक आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रायगड जिल्ह्यामध्ये आले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लाखोंच्या संख्येने नागरिकांनी आपापले घर गाठले. बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात संसर्ग वाढला आहे. यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये कोविड-१९ रुग्णालये (डीसीएच), कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) आणि कोविड उपचार केंद्र (सीसीसी) अशा आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाधितांवर उपचार करताना आता वर्गीकरण करण्यात येणार आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्के झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पनवेल, एमजीएम यासह अन्य ठिकाणी रुग्णांना घरी सोडण्यात येत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये सापडणाºया रुग्णांवर विशेषत: ज्यांची प्रकृती अस्वस्थ आहे आणि ज्यांना कोरोना झाला आहे. त्यांच्यावर पनवेल, एमजीएम येथे उपचार करण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माणगाव या ठिकाणी फक्त कोरोना संशयितांनाच भरती करण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.कोरोनाबाधितांवर उपचार करताना जे कोणी आरोग्य कर्मचारी त्यांच्या संपर्कात येणार असतील, त्या सर्र्वांना पीपीई किट, हॅण्डग्लोव्हज्, मास्क अशा आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याबाबत आधीच सूचना दिलेल्या आहेत. याबाबत आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिल्याचेही तटकरे यांनी सांगितले.कर्मचाऱ्यांचा कामास नकारअलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयातील विलगीकरण कक्षातील दोन वॉर्डबॉयला कोरोनाची लागण झाल्याने अन्य कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. संरक्षण साधन दिल्यावरच काम करू, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा शल्यचिकित्सकडॉ. प्रमोद गवई यांनी कर्मचाºयांचे म्हणणे ऐकून घेतले; मात्र त्यानंतर थेट आयुक्तांच्या व्हीसीमध्ये निघून गेले. त्यांनीच पोलिसांना पाचारण केल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला. याबाबत डॉ. गवई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी व्हीसीमध्ये असल्याचे सांगितले.जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने आलेल्या नागरिकांमुळे धोका वाढण्याची शक्यता गृहीत धरून ४ हजार ६०० खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु याची आवश्यकता भासणार नाही, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला. बाहेरून आलेल्या बहुतांश नागरिकांनी आतापर्यंत१४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. १६ मेनंतर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये आलेल्यांवर विशेष लक्ष द्यावे लागणार असल्याने पुढील आठ दिवस जिल्ह्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.