शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनातून ग्रामीण विकासाला चालना

By admin | Updated: March 17, 2016 02:28 IST

आर्थिक समृद्धीचे नवे दालन म्हणून पर्यटन उद्योग हा सक्षम रोजगार निर्मितीचा स्रोत ठरत आहे. आज जगभरात पर्यटन व्यवसायाची भरभराट वेगाने होत आहे.

- दत्ता म्हात्रे,  पेणआर्थिक समृद्धीचे नवे दालन म्हणून पर्यटन उद्योग हा सक्षम रोजगार निर्मितीचा स्रोत ठरत आहे. आज जगभरात पर्यटन व्यवसायाची भरभराट वेगाने होत आहे. केंद्र व राज्य सरकार आता या व्यवसायाकडे उद्योग म्हणून पाहत असतात. राज्य सरकार पर्यटन क्षेत्राच्या विकासावर भर देण्याचे नवे धोरण निश्चित करू पाहत आहे. पुढील दशकभरात पर्यटनक्षेत्राचा विकासाचा रोडमॅप तयार करताना महाराष्ट्र राज्य पर्यटन क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टातून रोजगार निर्मिती व ग्रामीण विकासाला चालना मिळणार असून पर्यटनपूरक सेवा-सुविधांबरोबर कृषिपूरक पर्यटनाकडे लक्ष केंद्रित होणार आहे. पर्यटन उद्योगात बळीराजाच्या आर्थिक उन्नतीची नवी दिशा येत्या दशकभरात पहावयास मिळणार आहे.पुढील वर्ष २०१७ ‘व्हिजीट महाराष्ट्र इयर’म्हणून साजरे करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्राची संस्कृती, गडकोट किल्ले, कोकणचे विस्तीर्ण समुद्रकिनारे, कोकणची वैभवशाली निसर्गसंपदा माहिती व्हावी. त्यातून पर्यटकांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटन धोरण २०१६ जाहीर केले आहे. या धोरणाच्या अनुषंगाने पर्यटनस्थळाचा विकास व यासाठी खाजगी गुंतवणूक सुविधांवर भर देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात विशेषत: कोकण किनारपट्टीवर निसर्ग सौंदर्याचा नजराणा आहे. प्राकृ तिक सौंदर्याला आधुनिक सोयी-सुविधांचा टच दिल्यास गोव्याच्या धर्तीवर पर्यटन उद्योगातून आर्थिक विकासाचा मापदंड निर्माण होणार आहे. यामध्ये वन्यजीवांचे संरक्षण उपजत वनसंपदेला धक्का न लावता स्थानिक रोजगार निर्मिती करण्याची क्षमता निसर्ग पर्यटनामध्ये आहे. राज्य सरकारने नव्या पर्यटन धोरणात विशेष पर्यटन विकास अभ्यासक्रमासाठी तसेच गाइड प्र्रशिक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीला १२ हजार ५०० रुपये शिष्यवृत्ती व ५ हजार रुपये आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे. नव्या पर्यटन धोरणामध्ये सरकारने धार्मिक पर्यटन, निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटनाकडे खास लक्ष दिलेले आहे. कृषी पर्यटनामुळे शेती व शेतकरी वर्गाच्या रोजगार निर्मितीवर अधिक भर दिला जाणार आहे. सध्या नागरी वस्तीतील मध्यम व उच्च मध्यमवर्ग कृषी पर्यटनाकडे जाण्याचा कल वाढला आहे. कोकण निसर्ग संपदा, फळबागा व शेतीने समृद्ध आहे. या अनुषंगाने कोकणात पर्यटनाच्या वाढ विस्ताराच्या सुलभ सोयी निर्माण करण्यावर राज्य शासनाने अधिक भर देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील वैशिष्ट्येजिल्ह्यात एकूण १ लाख १३ हजार हेक्टर भातलागवड क्षेत्र आहे. फळबाग लागवडक्षेत्र ५१ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. कोकणच्या ७२० चौ.कि. मी. सागरी किनारपट्टी क्षेत्रांपैकी २४० चौ.कि.मी. रायगडची समुद्र किनारपट्टी आहे. २८ जलसिंचन प्रकल्पामधून ओलिताखालील क्षेत्रही मोठे आहे. रोजगाराच्या संधीनव्या पर्यटन धोरणात राज्यात सरकारचे ३० हजार कोटीची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य आहेत, यातून १० लाखांच्या रोजगारांच्या संधी निमीतीचे उद्दिष्ट आहे. १५ पैकी पनवेल, उरण वगळता १३ तालुक्यांमध्ये कृषी पर्यटन बहरण्याच्या संधी आहेत. राज्य सरकार कृ षीक्षेत्राकडे देणार लक्ष राज्य सरकारने महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ४८ अभयारण्ये, सहा राष्ट्रीय उद्याने, चार राखीव संवर्धन क्षेत्र, ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्र, या पर्यटन क्षेत्राबरोबर, खाड्यांच्या पात्रात येणारे परदेशी पक्षी यांचाही समावेश आहे. राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार दरवर्षी वन्यजीव क्षेत्राला १० लाख पर्यटक भेट देतात. याचबरोबरीने कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष दिल्यास हिरव्यागार वनराईबरोबर बहरलेल्या हिरव्या शिवारात पक्ष्यांचे थवे येणार ही पक्षिमित्रांसाठी पर्वणी आहे. त्यामुळे वन्यजीव क्षेत्र पर्यटन, धार्मिक स्थळे, गडकोट-किल्ले पर्यटन, समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सोबतीने कृषी शिवारातील पर्यटन विकासास चालना दिल्यास शेतकऱ्यांच्या रोजगार निर्मितीत अधिक भर पडेल.