शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी कायम

By admin | Updated: May 8, 2017 06:20 IST

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या दिवसेन्दिवस वाढतच आहे. वीकेंडसाठी कोकणात गेलेले चाकरमानी

लोकमत न्यूज नेटवर्कधाटाव : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या दिवसेन्दिवस वाढतच आहे. वीकेंडसाठी कोकणात गेलेले चाकरमानी रविवारी परतले. मात्र, महामार्गावरील अजवड वाहनांमुळे त्यांना कोंडीचा फटका बसला. यामुळे प्रवासी, तसेच चालक हैराण झाले. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कुर्म गतीने चाललेले बांधकाम व दैनंदिन घडणाऱ्या अपघातांमुळे महामार्गाचा प्रवास म्हणजे यमाच्या दरबारातील प्रवास ठरत आहे. त्यात भर म्हणून प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्या. पळस्पे ते महाड या दरम्यान असणारे छोटे-मोठे उद्योगधंदे यामुळे या भागात वर्षाच्या बाराही महिने अवजड वाहनांची सतत वाहतूक चालू असते. तर दरवर्षी गणेशोत्सव, दीपावली व होळी सणांबरोबरच मे महिन्यात साजरे होणारे विवाह सोहळे या समारंभाच्या वेळी प्रवासी वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्यास त्याचा फटका वाहतूककोंडीला बसत आहे.गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी विवाहाचे मुहूर्त मोठ्या प्रमाणावर असल्याने व काही विवाहाच्या तिथी विशिष्ट दिवसांना अधिक असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतूककोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर शनिवार, रविवार विवाह मुहूर्त अधिक असल्याने महामार्गावर जाणाऱ्या वऱ्हाडांनाही कोंडीचा फटका बसला. विवाहाचा मुहूर्त टळून गेला तरी अनेक वाहने वाहतूककोंडीत अडकून पडलेली दिसली. त्यामुळे वाहनचालक व प्रवासीवर्गाला विविध समस्यांचा सामना करावा लागला. काही ठिकाणी वऱ्हाडी मंडळी व नवरदेवांच्या गाड्याही वाहतूककोंडीत अडकल्याने विवाहमुहूर्त लांबणीवर पडल्याने एकच गोंधळ उडाला. ठिकठिकाणी अवजड वाहने, प्रवासी वाहने कोंडीत सापडल्याने मार्गक्रमण करणे कठीण होऊन गेले. रखरखत्या उन्हात कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांचीही दमछाक झाली होती.