शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

महामार्गावर वाहतूक निर्बंध

By admin | Updated: August 28, 2016 04:07 IST

गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यास युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. दरवर्षी लाखो गणेशभक्त कोकणात जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग करतात. महाराष्ट्राचे आराध्य

- जयंत धुळप, अलिबाग

गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यास युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. दरवर्षी लाखो गणेशभक्त कोकणात जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग करतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायांच्या आगमनाकरिता कोकणात जाणाऱ्या सुमारे १० लाख चाकरमानी गणेशभक्तांच्या निर्विघ्न प्रवासाकरिता यंदाही गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परिवहन आयुक्तांच्या निर्णयानुसार अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. वाहतूक निर्बंध व अजवड वाहनांना बंदी असली, तरी दूध, पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल, आॅक्सिजन व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना बंदी लागू होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. १६ टनपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना बंदी१ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ५ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजन असलेल्या अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील. ६ ते १४ सप्टेंबर २०१६ या कालावधीत महामार्गावर सकाळी ८ ते रात्री ८ या काळात अवजड वाहने, ट्रेलर, ट्रकला बंदी राहील.गणेश विसर्जनाकरीताही अवजड वाहतूक बंदपाच दिवसांचे गणपती व गौरी विसर्जन व सात दिवसांचे गणपती विसर्जन या निमित्त ९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १२ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत रेतीचे ट्रक, ट्रेलर, तसेच अवजड वाहने ज्या वाहनांची वजन क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा वाहनांची पूर्णत: बंद राहील.अनंत चतुर्दशीलाही वाहतूक बंदअनंत चतुर्दशी गणपती विसर्जनानिमित्त १५ सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते १६ सप्टेंबर रात्री आठ वाजेपर्यंतच्या कालावधीत वाळू व रेतीच्या वाहतुकीस व अवजड वाहने ज्या वाहनांची वजन क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.वाळू व रेती वाहू वाहनांना बंदी१ सप्टेंबर २०१६ मध्यरात्री १२ वाजल्यापासून १६ सप्टेंबर २०१६ रात्री १२ वाजेपर्यंत वाळू व रेतीच्या वाहतुकीस पूर्णत: बंदी करण्यात आली आहे.मालास विलंब, परिणामी औद्योगिक क्षेत्राचे नुकसानअवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम, तर रायगड जिल्ह्यातील महाड, रोहा, रसायनी, पनवेल आणि विळेभागाड औद्योगिक वसाहतींमध्ये कच्चामाल पोहोचण्यास व तयार माल बाजारपेठेत पोहोचण्यास विलंब होऊन कारखानदारांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात नाराजीचा सूर आहे. रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रे, तसेच आरसीएफ, जेएसडब्ल्यू, रिलायन्स, उत्तम आदी उद्योगांच्या निमित्ताने दररोज सुमारे २० हजार वाहनांची वर्दळ बंद राहील. सुमारे ५० हजार वाहने कोकणात जाणार५ सप्टेंबर रोजी गणेश आगमन होणार असून, गेल्या पाच वर्षींच्या परिवहन विभागाच्या नोंदीनुसार गणेश आमगमनाच्या आधीच्या पाच दिवसांत सुमारे दोन हजार एसटी बसेस, दोन हजार खासगी बसेस, तर अन्य सुमारे ४० हजार खासगी वाहने अशा एकूण सुमारे ५० हजार वाहने कोकणात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना बंदी करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे गणेशभक्तांनी स्वागत केले आहे.