शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
4
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
5
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
6
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
7
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
8
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
9
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
10
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
11
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
12
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
13
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
14
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
15
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
16
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
17
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
18
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
19
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
20
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल

महामार्गावर वाहतूक निर्बंध

By admin | Updated: August 28, 2016 04:07 IST

गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यास युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. दरवर्षी लाखो गणेशभक्त कोकणात जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग करतात. महाराष्ट्राचे आराध्य

- जयंत धुळप, अलिबाग

गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यास युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. दरवर्षी लाखो गणेशभक्त कोकणात जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग करतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायांच्या आगमनाकरिता कोकणात जाणाऱ्या सुमारे १० लाख चाकरमानी गणेशभक्तांच्या निर्विघ्न प्रवासाकरिता यंदाही गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परिवहन आयुक्तांच्या निर्णयानुसार अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. वाहतूक निर्बंध व अजवड वाहनांना बंदी असली, तरी दूध, पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल, आॅक्सिजन व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना बंदी लागू होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. १६ टनपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना बंदी१ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ५ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजन असलेल्या अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील. ६ ते १४ सप्टेंबर २०१६ या कालावधीत महामार्गावर सकाळी ८ ते रात्री ८ या काळात अवजड वाहने, ट्रेलर, ट्रकला बंदी राहील.गणेश विसर्जनाकरीताही अवजड वाहतूक बंदपाच दिवसांचे गणपती व गौरी विसर्जन व सात दिवसांचे गणपती विसर्जन या निमित्त ९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १२ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत रेतीचे ट्रक, ट्रेलर, तसेच अवजड वाहने ज्या वाहनांची वजन क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा वाहनांची पूर्णत: बंद राहील.अनंत चतुर्दशीलाही वाहतूक बंदअनंत चतुर्दशी गणपती विसर्जनानिमित्त १५ सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते १६ सप्टेंबर रात्री आठ वाजेपर्यंतच्या कालावधीत वाळू व रेतीच्या वाहतुकीस व अवजड वाहने ज्या वाहनांची वजन क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.वाळू व रेती वाहू वाहनांना बंदी१ सप्टेंबर २०१६ मध्यरात्री १२ वाजल्यापासून १६ सप्टेंबर २०१६ रात्री १२ वाजेपर्यंत वाळू व रेतीच्या वाहतुकीस पूर्णत: बंदी करण्यात आली आहे.मालास विलंब, परिणामी औद्योगिक क्षेत्राचे नुकसानअवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम, तर रायगड जिल्ह्यातील महाड, रोहा, रसायनी, पनवेल आणि विळेभागाड औद्योगिक वसाहतींमध्ये कच्चामाल पोहोचण्यास व तयार माल बाजारपेठेत पोहोचण्यास विलंब होऊन कारखानदारांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात नाराजीचा सूर आहे. रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रे, तसेच आरसीएफ, जेएसडब्ल्यू, रिलायन्स, उत्तम आदी उद्योगांच्या निमित्ताने दररोज सुमारे २० हजार वाहनांची वर्दळ बंद राहील. सुमारे ५० हजार वाहने कोकणात जाणार५ सप्टेंबर रोजी गणेश आगमन होणार असून, गेल्या पाच वर्षींच्या परिवहन विभागाच्या नोंदीनुसार गणेश आमगमनाच्या आधीच्या पाच दिवसांत सुमारे दोन हजार एसटी बसेस, दोन हजार खासगी बसेस, तर अन्य सुमारे ४० हजार खासगी वाहने अशा एकूण सुमारे ५० हजार वाहने कोकणात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना बंदी करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे गणेशभक्तांनी स्वागत केले आहे.