शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

महामार्गावरील वाहतूककोंडी सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 06:07 IST

महामार्गावर दररोज कोठे ना कोठे तरी अपघात होतच आहेत. सध्या सुरू असलेली लग्नसराई, सुट्टीचा काळ आणि कोकणातील पर्यटकांची गर्दी

सिकंदर अनवारे  दासगाव : महामार्गावर दररोज कोठे ना कोठे तरी अपघात होतच आहेत. सध्या सुरू असलेली लग्नसराई, सुट्टीचा काळ आणि कोकणातील पर्यटकांची गर्दी, यामुळे गेल्या महिन्याभरापासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी आणि अपघात सत्र सुरू आहे. शुक्र वारी मध्यरात्री दासगावजवळ तीन वाहनांच्या अपघातात जवळपास तीन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. याला बेशिस्त वाहनचालक जबाबदार असल्याचे दिसून आले आहे.कोकणातील चाकरमानी सध्या सुट्टीकरिता गावी येत आहेत. सुट्टीतील मजा अवलंबण्यासाठी परराज्यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणाचे सौंदर्य पाहण्यासाठी येत आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम आणि महामार्गावरील गर्दी यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अपघात मालिकाही कायम सुरू आहे. लवकर पोहोचण्याची घाई, ओव्हरटेक करण्याच्या नादात वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवत आहेत. रस्त्याचे सुरू असलेले काम पाहता, वाहनचालकांनी आपले वाहन एका लेनमध्ये चालवणे अपेक्षित आहे. मात्र, महिन्याभरात झालेले बहुतांश अपघात हे ओव्हरटेकच्या नादात झाल्याचे दिसून येत आहे.शुक्र वारी मध्यरात्री तीन वाहने एकमेकांवर आपटल्याने वाहनांचे नुकसान झालेच; पण महामार्ग जवळपास दोन तास ठप्प झालाहोता.दासगाव खिंडीतील चढावाच्या ठिकाणी एक अवजड वाहन कमी वेगात चालत असतानाच, मागून येणारा कंटेनर आणि पिकअप जिप या दोन वाहनांना भरधाव येणाऱ्या लक्झरी बसने जोरात धडक दिली. यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.दरम्यान बेशिस्तपणे वाहन चालवत एकेरी लेन सोडून पुढे जाणाºया वाहनांमुळेही महामार्गावर वाहन चालवणे कठीण होऊन बसत आहे. बेशिस्त चालकांवर पोलिसांनी कडक कारवाई करणे अपेक्षितआहे.मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी संथ गतीने सुरू आहे. त्यातच अनेक ठिकाणी साइडपट्टीला मातीचे ढीग पडले आहेत. तर काही ठिकाणी साइडपट्टीच शिल्लक राहिलेली नाही. या सर्व कारणांमुळे वाहतूककोंडी होत आहे. या महामार्गावर माणगाव, कोलाड, वडखळ, या ठिकाणी बाजारपेठ महामार्गाच्या कडेलाच वसली असल्याने कायम वाहतूककोंडी होत आहे.वडखळ आणि पनवेलमधील वाहतूककोंडी टाळण्याकरिता अनेक जण पालीमार्गे मुंबईचा पर्याय निवडत होते. मात्र, या मार्गाचेही काम सुरू केल्याने या मार्गाकडेदेखील प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.टोलनाक्यावर कर्मचारी तैनात कशाला?महामार्ग वाहतूक पोलीस विभागाकडे आधीच पोलीस कर्मचारी अपुरे असताना, महाडसह इतर विभागातील महामार्ग पोलीस कर्मचारी खालापूर टोलनाक्यावर नेऊन का बसवले जात आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोकणात जाणारी वाढलेली वाहनसंख्या आणि महामार्गावर होणारे अपघात, वाहतूककोंडी यामुळे या ठिकाणी अधिक पोलीस कर्मचारी गरजेचे असतानाही खालापूर टोलनाक्यावर पोलीस तैनात केले जात असल्याने महामार्ग वाहतूक पोलीस विभागाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.