शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

महामार्गावरील वाहतूककोंडी सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 06:07 IST

महामार्गावर दररोज कोठे ना कोठे तरी अपघात होतच आहेत. सध्या सुरू असलेली लग्नसराई, सुट्टीचा काळ आणि कोकणातील पर्यटकांची गर्दी

सिकंदर अनवारे  दासगाव : महामार्गावर दररोज कोठे ना कोठे तरी अपघात होतच आहेत. सध्या सुरू असलेली लग्नसराई, सुट्टीचा काळ आणि कोकणातील पर्यटकांची गर्दी, यामुळे गेल्या महिन्याभरापासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी आणि अपघात सत्र सुरू आहे. शुक्र वारी मध्यरात्री दासगावजवळ तीन वाहनांच्या अपघातात जवळपास तीन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. याला बेशिस्त वाहनचालक जबाबदार असल्याचे दिसून आले आहे.कोकणातील चाकरमानी सध्या सुट्टीकरिता गावी येत आहेत. सुट्टीतील मजा अवलंबण्यासाठी परराज्यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणाचे सौंदर्य पाहण्यासाठी येत आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम आणि महामार्गावरील गर्दी यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अपघात मालिकाही कायम सुरू आहे. लवकर पोहोचण्याची घाई, ओव्हरटेक करण्याच्या नादात वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवत आहेत. रस्त्याचे सुरू असलेले काम पाहता, वाहनचालकांनी आपले वाहन एका लेनमध्ये चालवणे अपेक्षित आहे. मात्र, महिन्याभरात झालेले बहुतांश अपघात हे ओव्हरटेकच्या नादात झाल्याचे दिसून येत आहे.शुक्र वारी मध्यरात्री तीन वाहने एकमेकांवर आपटल्याने वाहनांचे नुकसान झालेच; पण महामार्ग जवळपास दोन तास ठप्प झालाहोता.दासगाव खिंडीतील चढावाच्या ठिकाणी एक अवजड वाहन कमी वेगात चालत असतानाच, मागून येणारा कंटेनर आणि पिकअप जिप या दोन वाहनांना भरधाव येणाऱ्या लक्झरी बसने जोरात धडक दिली. यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.दरम्यान बेशिस्तपणे वाहन चालवत एकेरी लेन सोडून पुढे जाणाºया वाहनांमुळेही महामार्गावर वाहन चालवणे कठीण होऊन बसत आहे. बेशिस्त चालकांवर पोलिसांनी कडक कारवाई करणे अपेक्षितआहे.मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी संथ गतीने सुरू आहे. त्यातच अनेक ठिकाणी साइडपट्टीला मातीचे ढीग पडले आहेत. तर काही ठिकाणी साइडपट्टीच शिल्लक राहिलेली नाही. या सर्व कारणांमुळे वाहतूककोंडी होत आहे. या महामार्गावर माणगाव, कोलाड, वडखळ, या ठिकाणी बाजारपेठ महामार्गाच्या कडेलाच वसली असल्याने कायम वाहतूककोंडी होत आहे.वडखळ आणि पनवेलमधील वाहतूककोंडी टाळण्याकरिता अनेक जण पालीमार्गे मुंबईचा पर्याय निवडत होते. मात्र, या मार्गाचेही काम सुरू केल्याने या मार्गाकडेदेखील प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.टोलनाक्यावर कर्मचारी तैनात कशाला?महामार्ग वाहतूक पोलीस विभागाकडे आधीच पोलीस कर्मचारी अपुरे असताना, महाडसह इतर विभागातील महामार्ग पोलीस कर्मचारी खालापूर टोलनाक्यावर नेऊन का बसवले जात आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोकणात जाणारी वाढलेली वाहनसंख्या आणि महामार्गावर होणारे अपघात, वाहतूककोंडी यामुळे या ठिकाणी अधिक पोलीस कर्मचारी गरजेचे असतानाही खालापूर टोलनाक्यावर पोलीस तैनात केले जात असल्याने महामार्ग वाहतूक पोलीस विभागाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.