शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आधुनिक जीवनशैलीतही पारंपरिक कला जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:42 IST

उन्हाळ्यात आजही माठांना मागणी : बोटावर मोजण्याएवढेच कुं भार व्यावसायिक; नवीन पिढी शिक्षण, नोकरीच्या मागे

सिकंदर अनवारे ।लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : उन्हाच्या झळा जाणवू लागल्या की डोळ्यासमोर येतो तो मातीचा माठ. हे मातीचे माठ बनवणारे पारंपरिक व्यावसायिक आता फारच कमी शिल्लक राहिले आहेत. माणसाने आधुनिक जीवनशैली आत्मसात केली असली तरी पारंपरिक कला जोपासत आजही वयोवृद्ध माणसे माठ बनवण्यात गुंतले आहेत. माठ बनवण्याच्या कलेत आता केवळ जुनीच पिढी शिल्लक राहिली आहे. नवीन पिढी शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागली आहे. यामुळे आता केवळ बोटावर मोजण्याइतकेच कुं भारव्यावसायिक दिसून येत आहेत.

गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठाला ग्रामीण तसेच शहरी भागात ऐन उन्हाळ्यात मागणी असते. काळाच्या ओघात आधुनिक यंत्रे आली आणि पारंपरिक पद्धती मागे पडू लागल्या. त्याचप्रमाणे फ्रीजमुळे या मातीच्या माठांची मागणी घटली आहे. असे असले तरी ग्रामीण भागात आजही कुंभार समाजातील अनेकांनी आपली ही कला जपण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. ऐन उन्हाळ्यात या मातीच्या माठातील पाणी फायदेशीर असते. हे पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड ठेवण्याचे काम मातीच्या माठाद्वारे होते. आरोग्याला लाभदायक असलेल्या माठातील पाणी पिण्यासाठी आजदेखील अनेक घरात माठ आवर्जून आणला जातो. काळाच्या ओघात ही कला आता मागे पडू लागली आहे. याकरिता लागणारी माती जरी मोफत असली तरी अन्य साहित्य मात्र विकत घेऊनच माठ तयार करावे लागत आहेत.मातीच्या माठाची मागणी घटली आहे, यामुळे त्यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासारखी स्थिती राहिली नसल्याने या समाजातील नवी पिढी मात्र या व्यवसायातून बाहेर पडली आहे. नव्या पिढीने शिक्षण, नोकरी आणि अन्य व्यवसायाकडे पावले उचलली आहेत. यामुळे जुन्या पिढीतील वयोवृद्ध माणसेच आता माठ, मातीच्या चुली, घराची कौले बनवण्याची कामे करीत आहेत. महाड तालुक्यात महाड शहर, बिरवाडी, दासगाव आदी गावातून माठ बनवले जात होते. शहरातील हा व्यवसाय आता दिसेनासा झाला असून बिरवाडी येथील कुंभारवाडा येथे जवळपास ८० घरांमधून केवळ सात ते आठ घरांतूनच ही कला जपली जात असल्याचे येथील अनिता दगडू सावादकर यांनी सांगितले.दिवसा तयार होतातफक्त दहा मटकेच्महाड तसेच बिरवाडीमध्ये औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे जमिनी शिल्लक राहिलेल्या नाहीत.यामुळे अनेकांना मातीदेखील विकत घ्यावी लागत आहे. मातीपासून माठ बनवताना चाकाचा वापर केला जात नाही. ही मातीदेखील पायाने तुडवण्यास दोन तास जातात.च्मडक्याच्या आकाराच्या साच्यावर माती थापून त्याला हाताने आकार देत मडके बनवण्याची कला अवघड आहे. त्यानंतर हे कच्चे मडके भट्टीत टाकले जाते. यामध्ये अनेक वेळा नुकसानदेखील सहन करावे लागत असल्याचे बिरवाडी कुंभारवाडी येथील दगडू सावादकर यांनी सांगितले.च्कच्च्या मडक्याला तडे जाणे, भट्टीत फुटणे किंवा अवेळी पाऊस यामध्ये हे नुकसान होते. या प्रक्रियेला किमान दोन दिवस जातात. साच्यावर एक मडके बनवण्यास एक तास लागतो. दिवसाला दहा मडकी तयार होतात. 

आमची नवी पिढी या व्यवसायात शिल्लक राहिली नाही. मेहनत, खर्च अधिक असून मातीच्या माठाची मागणीदेखील कमी झाली आहे. माठ आणि चुली बनवताना आपली कला जपण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करतो.- अनिता दगडू सावादकर, कुंभार