शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आंबोली धरणावर पर्यटकांची तुफान गर्दी

By admin | Updated: July 25, 2016 03:04 IST

मुरु ड शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आंबोली धरण असून, या धरणावर वर्षा सहलीसाठी पर्यटकांची तुफान गर्दी पाहावयास मिळत आहे.

नांदगाव/ आगरदांडा : मुरु ड शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आंबोली धरण असून, या धरणावर वर्षा सहलीसाठी पर्यटकांची तुफान गर्दी पाहावयास मिळत आहे. सुमारे २९ कोटी रु पये खर्च करून पिण्याच्या पाण्याकरिता व सिंचन उपयोगासाठी हे धरण बांधण्यात आले. सुमारे पाच किलोमीटर क्षेत्रात धरणाच्या पाण्याची व्याप्ती आहे. या धरणाचे ओव्हरप्लो पाणी चौकोनी हौदात पडून मग ते पाणी वाहून जाते. याच ठिकाणी पर्यटक मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटत आहेत.यंदा मुरु ड तालुक्यात २४०० मिलीमीटर एवढा पाऊस पडल्याने नद्या, नाले व असणारी धरणे ओसंडून वाहत आहेत. ओव्हरफ्लो पाण्याचा पर्यटक मनमुराद आनंद घेत असून महिला, पुरु ष व बच्चेकंपनी यात सहभागी झालेले दिसून येते. परिसर खूप मोठा असल्याने पर्यटक स्वत:सोबत भोजन बनवण्याचे साहित्य आणून जेवण सुद्धा या भागात बनवत असल्याचे पाहावयास मिळत आहे, तर काही पर्यटक पार्सल भोजन आणताना दिसत होते. धरण्याच्या या पाण्यात खूप मौजमजा करीत असून, आता हळूहळू या भागात छोटी छोटी दुकाने थाटलेली पाहावयास मिळत आहेत. भाजलेले कणीस तसेच तत्सम पदार्थ सुद्धा मिळत आहेत. मुंबई, नाशिक, कल्याण, बोरीवली, ठाणे व स्थनिक नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. हे धरण खार-आंबोली ग्रामपंचायतअंतर्गत येत असून, ग्रामपंचायत सरपंच मनोज क्र माने म्हणाले की, हे धरण जलसंपदा विभागाच्या ताब्यात असून पर्यटकांना ते कोणतीही सुरक्षितता पुरवीत नाही. या धरणाचा परिसर ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिला, तर आम्ही सुरक्षारक्षक तसेच धरण परिसरातील स्वछता, चेंजिंग रूम सेवा तातडीने पुरवू. वाहनतळासाठी जागा देऊन पर्यटकांना सुविधा देऊ, असे सांगून तशी मागणी सुद्धा जलसंपदा विभागाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या धरणावर प्रचंड गर्दी पाहावयास मिळत असून, शनिवार व रविवार या दोन दिवसांत हजारो पर्यटक पाहावयास मिळत आहेत. (वार्ताहर)