शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

काळ नदीत होतेय प्रदूषण

By admin | Updated: April 21, 2017 00:18 IST

तालुक्यात जलस्रोत असणाऱ्या महत्त्वाच्या काळ नदीमध्ये गेली काही वर्षे प्रदूषण वाढत असल्याचे दिसत आहे. या नदीत माणगाव व गोरेगाव

माणगाव : तालुक्यात जलस्रोत असणाऱ्या महत्त्वाच्या काळ नदीमध्ये गेली काही वर्षे प्रदूषण वाढत असल्याचे दिसत आहे. या नदीत माणगाव व गोरेगाव येथे मासेमारी करणारे मासे व कोळंबी पकडण्यासाठी स्फोटक व पीक फवारणी औषधांचा वापर करीत असल्याने नदीत प्रदूषण वाढले आहे. यांच्या वापरामुळे नदीतील मासे व सर्व प्रकारचे जीव संपुष्टात येत आहेत.काळ नदी गोरेगाव ही खाडीला जोडून असल्याने या ठिकाणी चांगल्या प्रकारचे गोड्या पाण्यातील मासे व मोठी कोळंबी मिळते. हे पकडण्यासाठी पाग किंवा जाळे वापरून पकडल्यास कोणतेही प्रदूषण व अन्य जीव मरत नाही. ही मासेमारीची प्रक्रि या वेळखाऊ असल्याने झटपट मासे पकडण्यासाठी तसेच येथे माशांना चांगली बाजारपेठ आहे. यामुळे येथील मासे पकडून विक्री करणारे व्यावसायिक झटपट मासे पकडण्यासाठी स्फोटक जिलेटिन काड्या व अमोनिया कॅम्पचा वापर तर कोळंबी पकडण्यासाठी फवारणी औषधाचा वापर होतो. प्रामुख्याने सायफर मिथेलीन केमिकल असणारे औषध वापरले जाते. या औषध व स्फोटकामुळे प्रदूषण तर होतेच, परंतु नदीतील सर्व जीवजंतू यामुळे नष्ट होतात, यामुळे यांचा वापर थांबला पाहिजे.बाजारपेठेत सहज फवारणी औषधे उपलब्ध होतात तर स्फोटके ही दगड फोडण्यासाठी कॉरी येथे मिळतात. या सर्व गोष्टी बाजारात सहज उपलब्ध होतात, यावर निर्बंध नसल्याने या औषध व स्फोटकांचा वापर करून मासेमारी कमी वेळात मोठ्या प्रमाणात करता येते. मात्र या गोष्टींची भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे.