शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

वेळेच्या नियोजनात तीन तालुके फेल

By admin | Updated: March 10, 2017 03:39 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांना निर्धारित वेळेत पूर्ण करता येणार नाही.

- आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांना निर्धारित वेळेत पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्यावाचून प्रशासनासमोर पर्यायच नसल्याचे समोर आले आहे. ध्येयाचा पाठलाग करताना सुधागड, रोहे, माणगाव, पनवेल, खालापूर, मुरुड तालुक्यांची दमछाक होणार असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. स्वच्छ भारत अभियानाची डेडलाइन हुकू नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. ताज्या आकडेवारीनुसार वैयक्तिक शौचालयांमध्ये रायगड जिल्ह्याचा पंधरावा क्रमांक लागतो, तर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात सातवा क्रमांक लागतो. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा दोन्ही बाबतीमध्ये अग्रेसर राहिला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्वच्छ भारत अभियान मार्च २०१९पर्यंत राबविले जाणार असल्याने अद्यापही जिल्ह्याला स्पर्धेत टिकून राहण्याची संधी आहे. मात्र, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, नागरिकांना झोकून देऊन काम करावे लागणार आहे.- रायगड जिल्ह्याला ६१ हजार ५४० वैयक्तिक शौचालयाची निर्मिती करायची आहे. तळा, महाड, उरण, श्रीवर्धन, पोलादपूर, म्हसळा तालुक्यांतील वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.- अलिबाग तालुक्याला दिवसाला ७९ शौचालय बांधावी लागणार आहेत, तर पेण तालुक्याला ७७ आणि कर्जत तालुक्याला ९७ शौचालयांची उभारणी करावी लागणार आहे. या तीन तालुक्यांना निर्धारित वेळेत काम पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे वेळ वाढवून घेण्याची तयारी त्यांनी केली आहे.- स्वच्छ भारत अभियानाचा आलेख गेल्या सहा महिन्यांत वाढला आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्वांनाच फैलावर घेतल्याने सुमारे ४० हजार शौचालये या कालावधीत बांधून झाली आहेत, असे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नियोजित वेळेत अभियान पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. - अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांची अतिशय खराब कामगिरी आहे. त्यांना अनुक्रमे नऊ हजार ४२४, नऊ हजार २९७, आणि ११ हजार ६६० शौचालयांची उभारणी करायची आहे. - सुधागड (४२३४), रोहे (६७३१), माणगाव (७६१६), पनवेल (७९८०), खालापूर (३६५१) आणि मुरुड तालुक्याला १८४७ शौचालयांचे उद्दिष्ट गाठायचे आहे. - या तालुक्यांचे काम समाधानकारक नाही.