शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

मत्स्य व्यवसाय आयुक्तांमुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:04 IST

आयुक्तांच्या या मनमानी कारभारामुळे  मच्छीमार नेते, मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे तक्रार करून न्यायाची मागणी केली आहे. 

मधुकर ठाकूर उरण : केंद्र सरकारच्या बजेटमध्ये मच्छीमारांसाठी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक तरतुदीची शिफारस करण्यात आलेली नाही. राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यास निधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यमान मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी तरतूद अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे वर्षभरात राज्यातील एकही मच्छीमाराला आर्थिक लाभ मिळणार नसल्याने लाखो मच्छीमारांवर वर्षभरात उपासमारीचे संकट कोसळणार आहे. आयुक्तांच्या या मनमानी कारभारामुळे  मच्छीमार नेते, मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे तक्रार करून न्यायाची मागणी केली आहे. 

आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांसाठी आर्थिक बजेटमध्ये काही योजनांसाठी शिफारशी लागू करण्याच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील मच्छीमार आणि मच्छीमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांची भेट घेऊन विनंती केली होती. मात्र आयुक्तांनी उडवाउडवीची उत्तरे देत मच्छिमारांना हुसकावून लावल्याचा आरोप संतप्त झालेल्या मच्छिमारांकडून करण्यात येत आहे. आयुक्त जुमानत नसल्याने मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांची मंत्र्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. मात्र त्यानंतरही आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. 

दरवर्षी मच्छीमारांच्या विविध योजनांसाठी काही कोटींच्या निधींची तरतूदही केली जाते. निधीच्या मंजुरीसाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून विविध योजनांची शिफारस केली जाते. यानंतर बजेटमध्ये आर्थिक निधीची तरतूद केली जाते. तसेच, केंद्र, राज्य सरकारकडून प्रामुख्याने एनसीडीसी, डिझेल परताव्याच्या योजना राबविल्या जातात. 

एनसीडीसी योजनेअंतर्गत मच्छीमारांसाठी बोट बांधणीसाठी ४८ ते ६० लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जावर मच्छीमारांना ३० टक्के सबसिडी दिली जाते. एनसीडीसी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या राज्यातील सुमारे ४०० मच्छीमारांनी कर्जाची रक्कम मिळणार, या आशेवर बोटी बांधण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी बॅंका, खासगी वित्तपुरवठा करणाऱ्या वित्त संस्थांकडून कर्ज काढले आहे.

मात्र २०१० पासूून एनसीडीसीमार्फत देण्यात येणाऱ्या  कर्जाची रक्कम मिळालेली नाही. तसेच मागील बजेटमध्ये तत्कालीन मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी ५८ कोटींची तरतूद केली होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे डिझेल परताव्याची कोट्यवधी रुपयांची रक्कमही हाती लागलेली नाही. पारंपरिक पर्सनेट आणि खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी मत्स्य व्यवसाय विभागाने काही निर्बंध घातले आहेत. मात्र यामुळे राज्यातील मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाबरोबरच ही अडचण आल्याने पुढे काय  होणार ही चिंता त्यांना सतावत आहे. 

टॅग्स :uran-acउरणFishermanमच्छीमार