शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

भरतीचे पाणी आले रस्त्यावर, बाजार समितीजवळील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 02:30 IST

समुद्राला आलेल्या भरतीमुळे मंगळवारी एपीएमसी व वाशी परिसरातील नाले तुडुंब भरले. मसाला मार्केटजवळ भरतीचे पाणी रोडवर आल्यामुळे खळबळ उडाली होती.

नवी मुंबई :  समुद्राला आलेल्या भरतीमुळे मंगळवारी एपीएमसी व वाशी परिसरातील नाले तुडुंब भरले. मसाला मार्केटजवळ भरतीचे पाणी रोडवर आल्यामुळे खळबळ उडाली होती. भरतीचे पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या होल्डिंग पाँडची साफसफाई केली जात नसल्यामुळे व इतर कारणांमुळे पाणी शहरात येऊ लागले असून योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.               नवी मुंबई नियोजनबद्ध शहर असल्याचे बोलले जाते. परंतु शहराचे नियोजन चुकत असल्याचे सद्य:स्थितीमध्ये निदर्शनास येऊ लागले आहे. मंगळवारी समुद्राला भरती आल्यामुळे खाडीतील पाणी नाल्यांमधून वाशी, एपीएमसी ते कोपरीपर्यंत गेले होते. नाले तुडुंब भरून बाजार समितीजवळ पाणी रोडवर आले होते. यापूर्वी सीबीडीमध्ये भरतीचे पाणी पालिका मुख्यालयापर्यंत आले होते. जवळपास तीन फूट पाणी रोडवर साचले होते. वाशी सेक्टर १७ मध्येही काही वर्षांपूर्वी भरतीचे पाणी शिरले होते. नवी मुंबई खाडीकिनारी वसलेले शहर आहे. सिडकोने प्रत्येक नोडमध्ये होल्डिंग पाँड तयार केले आहेत. शहरातील पाावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची व्यवस्थित साफसफाई केली जात नाही. नाल्यांमध्ये गाळ साचला आहे. होल्डिंग पाँडची व नाल्यांची साफसफाई केली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अवैधरीत्या मातीच्या भरावामुळे भरतीचे पाणी उरण-पनवेल रस्त्यावर उरण :  सिडको, जेएनपीटीने केलेल्या अवैधरीत्या मातीच्या भरावामुळे मंगळवारी ( ३०) समुद्राच्या भरतीचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने बोकडवीरा गावानजीक असलेला उरण-पनवेल मार्गावरील सुमारे एक किलोमीटर रस्ता पाण्याखाली गेला होता.  उरण परिसरात जेएनपीटी, सिडकोने विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर दगडमातीचे भराव केले आहेत. प्रचंड प्रमाणावर अनधिकृतपणे करण्यात आलेल्या भरावामुळे मात्र, गावोगावी असलेल्या नैसर्गिक नाले, गटारे बुजून गेली आहेत. यामुळे दरवर्षी समुद्राच्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या उधाणाच्या भरतीमुळे समुद्राचे पाणी थेट काही गावागावांत शिरू लागले आहे. मंगळवारी (३०) तर समुद्राच्या भरतीचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने बोकडवीरा गावानजीक असलेला उरण-पनवेल मार्गावरील सुमारे एक किलोमीटर रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे रस्त्यावरील सिडकोच्या द्रोणागिरी कार्यालयासमोरही समुद्राचे पाणी जमा झाले होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होईपर्यंत वाहनांची गती मंदावली होती.अवैधरीत्या मातीच्या भरावामुळे  अशा प्रकारे समुद्र भरतीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते.      

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड