शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

भरतीचे पाणी आले रस्त्यावर, बाजार समितीजवळील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 02:30 IST

समुद्राला आलेल्या भरतीमुळे मंगळवारी एपीएमसी व वाशी परिसरातील नाले तुडुंब भरले. मसाला मार्केटजवळ भरतीचे पाणी रोडवर आल्यामुळे खळबळ उडाली होती.

नवी मुंबई :  समुद्राला आलेल्या भरतीमुळे मंगळवारी एपीएमसी व वाशी परिसरातील नाले तुडुंब भरले. मसाला मार्केटजवळ भरतीचे पाणी रोडवर आल्यामुळे खळबळ उडाली होती. भरतीचे पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या होल्डिंग पाँडची साफसफाई केली जात नसल्यामुळे व इतर कारणांमुळे पाणी शहरात येऊ लागले असून योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.               नवी मुंबई नियोजनबद्ध शहर असल्याचे बोलले जाते. परंतु शहराचे नियोजन चुकत असल्याचे सद्य:स्थितीमध्ये निदर्शनास येऊ लागले आहे. मंगळवारी समुद्राला भरती आल्यामुळे खाडीतील पाणी नाल्यांमधून वाशी, एपीएमसी ते कोपरीपर्यंत गेले होते. नाले तुडुंब भरून बाजार समितीजवळ पाणी रोडवर आले होते. यापूर्वी सीबीडीमध्ये भरतीचे पाणी पालिका मुख्यालयापर्यंत आले होते. जवळपास तीन फूट पाणी रोडवर साचले होते. वाशी सेक्टर १७ मध्येही काही वर्षांपूर्वी भरतीचे पाणी शिरले होते. नवी मुंबई खाडीकिनारी वसलेले शहर आहे. सिडकोने प्रत्येक नोडमध्ये होल्डिंग पाँड तयार केले आहेत. शहरातील पाावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची व्यवस्थित साफसफाई केली जात नाही. नाल्यांमध्ये गाळ साचला आहे. होल्डिंग पाँडची व नाल्यांची साफसफाई केली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अवैधरीत्या मातीच्या भरावामुळे भरतीचे पाणी उरण-पनवेल रस्त्यावर उरण :  सिडको, जेएनपीटीने केलेल्या अवैधरीत्या मातीच्या भरावामुळे मंगळवारी ( ३०) समुद्राच्या भरतीचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने बोकडवीरा गावानजीक असलेला उरण-पनवेल मार्गावरील सुमारे एक किलोमीटर रस्ता पाण्याखाली गेला होता.  उरण परिसरात जेएनपीटी, सिडकोने विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर दगडमातीचे भराव केले आहेत. प्रचंड प्रमाणावर अनधिकृतपणे करण्यात आलेल्या भरावामुळे मात्र, गावोगावी असलेल्या नैसर्गिक नाले, गटारे बुजून गेली आहेत. यामुळे दरवर्षी समुद्राच्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या उधाणाच्या भरतीमुळे समुद्राचे पाणी थेट काही गावागावांत शिरू लागले आहे. मंगळवारी (३०) तर समुद्राच्या भरतीचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने बोकडवीरा गावानजीक असलेला उरण-पनवेल मार्गावरील सुमारे एक किलोमीटर रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे रस्त्यावरील सिडकोच्या द्रोणागिरी कार्यालयासमोरही समुद्राचे पाणी जमा झाले होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होईपर्यंत वाहनांची गती मंदावली होती.अवैधरीत्या मातीच्या भरावामुळे  अशा प्रकारे समुद्र भरतीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते.      

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड