शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

भरतीचे पाणी आले रस्त्यावर, बाजार समितीजवळील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 02:30 IST

समुद्राला आलेल्या भरतीमुळे मंगळवारी एपीएमसी व वाशी परिसरातील नाले तुडुंब भरले. मसाला मार्केटजवळ भरतीचे पाणी रोडवर आल्यामुळे खळबळ उडाली होती.

नवी मुंबई :  समुद्राला आलेल्या भरतीमुळे मंगळवारी एपीएमसी व वाशी परिसरातील नाले तुडुंब भरले. मसाला मार्केटजवळ भरतीचे पाणी रोडवर आल्यामुळे खळबळ उडाली होती. भरतीचे पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या होल्डिंग पाँडची साफसफाई केली जात नसल्यामुळे व इतर कारणांमुळे पाणी शहरात येऊ लागले असून योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.               नवी मुंबई नियोजनबद्ध शहर असल्याचे बोलले जाते. परंतु शहराचे नियोजन चुकत असल्याचे सद्य:स्थितीमध्ये निदर्शनास येऊ लागले आहे. मंगळवारी समुद्राला भरती आल्यामुळे खाडीतील पाणी नाल्यांमधून वाशी, एपीएमसी ते कोपरीपर्यंत गेले होते. नाले तुडुंब भरून बाजार समितीजवळ पाणी रोडवर आले होते. यापूर्वी सीबीडीमध्ये भरतीचे पाणी पालिका मुख्यालयापर्यंत आले होते. जवळपास तीन फूट पाणी रोडवर साचले होते. वाशी सेक्टर १७ मध्येही काही वर्षांपूर्वी भरतीचे पाणी शिरले होते. नवी मुंबई खाडीकिनारी वसलेले शहर आहे. सिडकोने प्रत्येक नोडमध्ये होल्डिंग पाँड तयार केले आहेत. शहरातील पाावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची व्यवस्थित साफसफाई केली जात नाही. नाल्यांमध्ये गाळ साचला आहे. होल्डिंग पाँडची व नाल्यांची साफसफाई केली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अवैधरीत्या मातीच्या भरावामुळे भरतीचे पाणी उरण-पनवेल रस्त्यावर उरण :  सिडको, जेएनपीटीने केलेल्या अवैधरीत्या मातीच्या भरावामुळे मंगळवारी ( ३०) समुद्राच्या भरतीचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने बोकडवीरा गावानजीक असलेला उरण-पनवेल मार्गावरील सुमारे एक किलोमीटर रस्ता पाण्याखाली गेला होता.  उरण परिसरात जेएनपीटी, सिडकोने विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर दगडमातीचे भराव केले आहेत. प्रचंड प्रमाणावर अनधिकृतपणे करण्यात आलेल्या भरावामुळे मात्र, गावोगावी असलेल्या नैसर्गिक नाले, गटारे बुजून गेली आहेत. यामुळे दरवर्षी समुद्राच्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या उधाणाच्या भरतीमुळे समुद्राचे पाणी थेट काही गावागावांत शिरू लागले आहे. मंगळवारी (३०) तर समुद्राच्या भरतीचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने बोकडवीरा गावानजीक असलेला उरण-पनवेल मार्गावरील सुमारे एक किलोमीटर रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे रस्त्यावरील सिडकोच्या द्रोणागिरी कार्यालयासमोरही समुद्राचे पाणी जमा झाले होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होईपर्यंत वाहनांची गती मंदावली होती.अवैधरीत्या मातीच्या भरावामुळे  अशा प्रकारे समुद्र भरतीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते.      

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड