शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
2
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

बचतगटाच्या माध्यमातून कापडी पिशव्यांचा उद्योग, पर्यावरण -हास रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 3:42 AM

प्लास्टिकचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला हानी पोहोचून निर्सगाला संकटात लोटण्याचे काम सध्या सुरू आहे; परंतु वेळ आली की, निर्सग आपल्यावर काहीच घेत नाही.

- आविष्कार देसाई ।अलिबाग : प्लास्टिकचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला हानी पोहोचून निर्सगाला संकटात लोटण्याचे काम सध्या सुरू आहे; परंतु वेळ आली की, निर्सग आपल्यावर काहीच घेत नाही. आपत्ती, भूकंप, त्सुनामी, वादळ, ज्वालामुखी अशा विविध माध्यमांतून तो मानवाला त्याची परतफेड करत असतो, हे रोखायचे कसे? या विचारात असतानाच एका मैत्रिणीने कापडी पिशव्या माझ्या पुढ्यात ठेवल्या आणि बस्स... उपाय सुचला, असे फॅशन डिझायनर असलेल्या अलिबागमधील प्रार्थना नागवेकर यांनी सांगितले.ड्रेस डिझायनिंगचा व्यवसाय करायचा सोडून कापडी पिशव्या बनवण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. प्लास्टिकला रोखायचे असेल, तर त्याला कापडी पिशवी हाच पर्याय असल्याचे त्यांना उमगले. त्यांनी प्रार्थना जेएलजी या नावाने महिलांचा बचतगट स्थापन केला.अलिबाग येथे त्यांनी सुरू केलेल्या छोटेखानी कारखान्यामध्ये १४ महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. त्या महिलांना स्वाभिमानाने जगण्याला व्यासपीठ दिले आहे. स्वत:चा कोणताच आर्थिक स्रोत नसणाºया या महिला आता महिन्याला पाच हजार रुपये कमवतात. ड्रेस डिझायनर म्हणून त्यांना या क्षेत्रामध्ये बक्कळ पैसा कमावता आला असता. मात्र, पैसा हे एकच ध्येय न ठेवता राष्ट्रहितासाठी प्लास्टिकला हद्दपार करण्याचा त्यांचा प्रयत्न वाखणण्या सारखाच असल्याचे दिसून येते.प्रार्थना यांची मैत्रीण अर्पणा पाटील यांनी त्यांच्यासमोर अचानकपणे एके दिवशी कापडी पिशव्या समोर ठेवल्या. त्यानंतर त्यांनी या माध्यमातूनच प्लास्टिकला पर्याय देण्याची तयारी सुरू केली. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते निर्सगाला आणि पर्यायाने मानवालाही घातक आहे. आपल्या लहानपणी दळण आणण्यासाठी आई कापडी पिशवीच देत होती. त्या वेळी सर्रासपणे आपण कापडी पिशव्यांचाच वापर करायचो, असे प्रार्थना यांनी सांगितले.विविध आकाराच्या, रंगाच्या, चैन लावलेल्या, हॅण्डल असलेल्या कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यावर भर दिला. दीड रुपयांपासून ते साडेचार रुपयांपर्यंत पिशव्या उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. महिन्याला पाच हजार पिशव्या बनवल्या जातात; परंतु हा आकडा ज्या वेगाने मार्केटमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या येतात त्यापेक्षा किती, तरी कमी आहे. जनजागृतीच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर निश्चितच कमी करता येण्यासारखा असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रहितासाठी प्लास्टिक वापरणार नाही, याची खुणगाठ प्रत्येकाने आपल्या मनाशी बांधल्यास निसर्गाच्या प्रकोपापासून आपण वाचू शकतो.

टॅग्स :Raigadरायगड