शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

हेटवणे सिंचनातून तीन हजार एकरांवरील भात लागवड पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:50 IST

पेणच्या शेतकऱ्यांना दिलासा: रब्बी हंगामातील लागवडीच्या क्षेत्रात वाढ

पेण : हेटवणे धरण कालव्याच्या शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या सिंचनाच्या पाण्यावर आधारित भात लागवडीच्या ३००० एकर  क्षेत्रातील भातपीक लागवडीचे काम शेतकऱ्यांनी पूर्ण क्षमतेने करून दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. सध्या  पिकांना खतांची मात्रा देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात तब्बल १३०० एकराहून अधिक क्षेत्रावर​ भातपीक लागवड केल्याने या अगोदर असलेल्या १७०० एकर क्षेत्रात भर पडून उन्हाळी हंगामातील भात लागवडीच्या क्षेत्राने एकूण ३००० एकराचा टप्पा गाठला आहे.

सध्या पिकांच्या अनुकूल वाढीसाठी उपयुक्त असे पोषक वातावरण आहे. पडलेला अवकाळी पाऊस, भरपूर पाणी, ऊन व खतांची मात्रा मिळाल्याने पिके बहरली असून या परिसरात सर्वत्र हिरवागार निसर्ग परिसर अनुभवता​ येतो आहे. रब्बीच्या हंगामात भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारने भाताला प्रति क्विंटलला दिलेला १८८०/-रुपये हमीभाव व ७०० रुपये प्रति क्विंटलला बोनस मिळून  २५८०/-रुपये मिळणारी आधारभूत किंमत, याशिवाय भाताच्या पेंढ्यांची एक गुंडी  ६ ते ८ रुपयांस गुरांच्या वैरणीसाठी  दुग्ध व्यावसायिक खरेदी करत असल्याने या पेंढ्यातून एकरी खर्च केलेला उत्पादन खर्च निघत असल्याने उन्हाळ्यात भातशेती लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. याशिवाय गत वर्षात कोरोनाच्या उपद्रवामुळे बहुतेक शेतकरी शेतीकडे वळले. नफा असो वा तोटा, शेती पिकवायचीच हा श्रम साफल्याचा मंत्र अनुसरून शिवारात मोठी गर्दी पाहावयास मिळाली होती..

शेती उत्पादनासोबतीने भाजीपाला शेती, झेंडू, मोगरा, रताळी, हळद, कंदमुळे, वाल, पावटा, भुईमूग इत्यादी प्रकारची उत्पादने सध्या उन्हाळी हंगामात शेतकरी घेत आहेत. मुबलक पाणी, भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश, रात्रीचा गारवा, खते व कीटकनाशकांची मात्रा यामुळे नैसर्गिक अशा पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त वातावरणनिर्मिती होत असल्याने पिकांची जोमदारपणे वाढ होऊन शेतकऱ्यांच्या पदरात केलेल्या कष्टाचे फळ मिळून भरघोस उत्पन्नाची​ शाश्वत हमी असल्याने रब्बीच्या हंगामात शेतकरी शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहेत. केलेला खर्च व नफा यांचा योग्य ताळमेळ जुळत असल्याने   येथील शेतकरी बांधवांनी वर्षासाठी दोन वेळा  उत्पादन घेतले आहे. हा सिलसिला यापुढे असाच कायम राहील, असे येथील शेतकऱ्यांनी  सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड