शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

हेटवणे सिंचनातून तीन हजार एकरांवरील भात लागवड पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:50 IST

पेणच्या शेतकऱ्यांना दिलासा: रब्बी हंगामातील लागवडीच्या क्षेत्रात वाढ

पेण : हेटवणे धरण कालव्याच्या शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या सिंचनाच्या पाण्यावर आधारित भात लागवडीच्या ३००० एकर  क्षेत्रातील भातपीक लागवडीचे काम शेतकऱ्यांनी पूर्ण क्षमतेने करून दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. सध्या  पिकांना खतांची मात्रा देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात तब्बल १३०० एकराहून अधिक क्षेत्रावर​ भातपीक लागवड केल्याने या अगोदर असलेल्या १७०० एकर क्षेत्रात भर पडून उन्हाळी हंगामातील भात लागवडीच्या क्षेत्राने एकूण ३००० एकराचा टप्पा गाठला आहे.

सध्या पिकांच्या अनुकूल वाढीसाठी उपयुक्त असे पोषक वातावरण आहे. पडलेला अवकाळी पाऊस, भरपूर पाणी, ऊन व खतांची मात्रा मिळाल्याने पिके बहरली असून या परिसरात सर्वत्र हिरवागार निसर्ग परिसर अनुभवता​ येतो आहे. रब्बीच्या हंगामात भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारने भाताला प्रति क्विंटलला दिलेला १८८०/-रुपये हमीभाव व ७०० रुपये प्रति क्विंटलला बोनस मिळून  २५८०/-रुपये मिळणारी आधारभूत किंमत, याशिवाय भाताच्या पेंढ्यांची एक गुंडी  ६ ते ८ रुपयांस गुरांच्या वैरणीसाठी  दुग्ध व्यावसायिक खरेदी करत असल्याने या पेंढ्यातून एकरी खर्च केलेला उत्पादन खर्च निघत असल्याने उन्हाळ्यात भातशेती लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. याशिवाय गत वर्षात कोरोनाच्या उपद्रवामुळे बहुतेक शेतकरी शेतीकडे वळले. नफा असो वा तोटा, शेती पिकवायचीच हा श्रम साफल्याचा मंत्र अनुसरून शिवारात मोठी गर्दी पाहावयास मिळाली होती..

शेती उत्पादनासोबतीने भाजीपाला शेती, झेंडू, मोगरा, रताळी, हळद, कंदमुळे, वाल, पावटा, भुईमूग इत्यादी प्रकारची उत्पादने सध्या उन्हाळी हंगामात शेतकरी घेत आहेत. मुबलक पाणी, भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश, रात्रीचा गारवा, खते व कीटकनाशकांची मात्रा यामुळे नैसर्गिक अशा पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त वातावरणनिर्मिती होत असल्याने पिकांची जोमदारपणे वाढ होऊन शेतकऱ्यांच्या पदरात केलेल्या कष्टाचे फळ मिळून भरघोस उत्पन्नाची​ शाश्वत हमी असल्याने रब्बीच्या हंगामात शेतकरी शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहेत. केलेला खर्च व नफा यांचा योग्य ताळमेळ जुळत असल्याने   येथील शेतकरी बांधवांनी वर्षासाठी दोन वेळा  उत्पादन घेतले आहे. हा सिलसिला यापुढे असाच कायम राहील, असे येथील शेतकऱ्यांनी  सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड