शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग बाधितांचे दीडशे कोटी थकले, काम सुरू करू न देण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 03:21 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यांमध्ये संपादित करण्यात आलेल्या जमिनीची अद्यापही शंभर टक्के नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. एकीकडे या दोन्ही तालुक्यांमध्ये चौपदरीकरणाच्या कामाला ठेकेदारांनी प्रारंभ केला आहे.

महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यांमध्ये संपादित करण्यात आलेल्या जमिनीची अद्यापही शंभर टक्के नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. एकीकडे या दोन्ही तालुक्यांमध्ये चौपदरीकरणाच्या कामाला ठेकेदारांनी प्रारंभ केला आहे. मात्र, दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांना दीडशे कोटी रुपये देणे आहे. नुकसानभरपाईची ही सर्व रक्कम मिळाल्याखेरीज आमच्या जमिनी, घरे ताब्यात देणार नाही आणि ठेकेदारांना कामदेखील करू देणार नाही, अशी भूमिका महाडनजीकच्या करंजखोल येथील प्रकल्पगस्तांनी घेतली आहे. केवळ ही भूमिका घेऊनच हे प्रकल्पग्रस्त थांबले नाहीत, तर या गावात जमिनी आणि घरे ताब्यात घेण्यासाठी आलेल्या ठेकेदाराला या ग्रमस्थांनी परतदेखील पाठविले आहे.करंजखोल या गावातील अरुण शंकर महाडिक, शांताराम महादेव तांबडे, मनोहर महाडिक, गणेश दगडू तांबडे, उत्तम केरू तांबडे, रघुनाथ दगडू तांबडे, सुधीर तांबडे, पांडूरंग काशिराम पोटसुरे यांच्या जमिनी आणि घरे संपादित करण्यात आलेल्या आहेत. मात्र, या आणि त्यांच्यासारख्या अनेक प्रकल्पग्रस्तांना अद्यापही त्यांच्या जागा जमिनींचा त्याचप्रमाणे घरांचा मोबदला मिळालेला नाही.महामार्गाचे काम करणाºया ठेकेदार कंपनीने कामाला प्रारंभ केल्यानंतर, या जागांचा आणि घरांचे सपाटीकरण करण्यासाठी ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी या ग्रामस्थांना घरे खाली करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मात्र, नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नसल्यामुळे राहण्याची पर्यायी व्यवस्था कशी करायची? हा प्रश्न असल्याने आधी नुकसानभरपाई द्या, नंतरच आमच्या जमिनींचा ताबा घ्या, अशी भूमिका घेत या ग्रामस्थांनीठेकेदार कंपनीला परत पाठविले. मात्र, निधी जर वेळेवर उपलब्ध झाला नाही, तर करंजखोल प्रमाणेच अन्य ठिकाणी देखील कंपनीला कामकरण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे.- महाडच्या प्रांताधिकाºयांशी संपर्क साधला असता, देणी देण्यासाठी आलेला निधी संपला असून, आणखी दीडशे कोटी रूपयांची आवश्यकता आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतरच या प्रकल्पग्रस्तांना मोबदला अदा करणे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Raigadरायगड