शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हजारो एकर भातशेतीचे नुकसान

By admin | Updated: November 4, 2015 00:53 IST

गेले दोन दिवस समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे खाडीच्या भोवतालचे शेतीच्या संरक्षणासाठी बांधलेले बांध खार बंदिस्ती फुटून अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले

उरण : गेले दोन दिवस समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे खाडीच्या भोवतालचे शेतीच्या संरक्षणासाठी बांधलेले बांध खार बंदिस्ती फुटून अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून दोन दिवस समुद्राला मोठी भरती आहे. या दिवशीच बांध फुटून शेकडो एकर जमिनीत खाडीचे पाणी घुसले आहे. काही ठिकाणी शेतात कापलेली भाताची कणस पाण्यामुळे वाहून गेली तर काही भिजल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.उरण तालुक्यातील बेलोंडाखार, खोपटे खाडी, दादरपाडा मोठीजुई, हरिश्चंद्र कोटा, चिखली भोम तसेच पनवेल तालुक्यातील केळवणे गावाजवळील खार बंदिस्ती या मोठ्या उधाणामुळे फुटली आहे. या खार बंदिस्तीची देखभाल करण्याची जबाबदारी ही खारलँण्ड विभाग आणि सिडकोकडे आहे. मात्र गेल्या काही वर्षात खारलँण्ड विभागाने उरण भागात कोणत्याही प्रकारची दुरुस्तीची कामे केली नसल्यामुळे खार बंदिस्ती आणि उघाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या भरतीने सुद्धा या उघड्या आणि खार बंदिस्ती फुटून भरतीचे खारे पाणी शेतीत घुसते. खारे पाणी एकदा का शेतीत घुसले तर त्या शेतीत किमान चार वर्षे तरी पीक घेता येत नाही.काही ठिकाणी शेतकरी स्वत:च खार बंदिस्तीच्या दुरुस्तीची कामे करून खाडी किनाऱ्यावर मोठ्या मेहनतीने शेती करत आहेत. मात्र नुकत्याच आलेल्या भरतीमुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली आहे.उरण पश्चिम विभागाची शेती बहुतांश सिडकोने संपादित केली असल्याने त्याची जबाबदारी सिडकोकडे येते. सिडकोने या भागात काही ठिकाणी खाडी किनारी उघाड्यांवर स्वयंचलित दरवाजे (प्लॅफ) बसविले आहेत. हे दरवाजे भरतीच्यावेळी आपोआप बंद होतात त्यामुळे भरतीचे पाणी नागरी भागात किंवा शेतीत घुसत नाही. मात्र गेल्या काही वर्षात हे फ्लॅफ खाडीच्या पाण्यानेकुजले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी या फ्लॅफमधून पाणी नागरी वस्तीत किंवा शेतीत येते.आॅगस्ट -२0१५ मध्ये उरण आणि पनवेल विभागातील खार बंदिस्तीच्या कामाबद्दल उरणचे आ. मनोहर भोईर यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या सोबत बैठक घेऊन ओएनजीसी, सिडको आणि जेएनपीटी या कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडातून १५ किलोमीटरचे बंधारे बांधण्यास सांगितले होते आणि या कंपन्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आमदार मनोहर भोईर यांनी सांगितले होते. मात्र त्या कामाबाबत कार्यवाही झाली नाही. (वार्ताहर)कोजागिरी पौर्णिमेच्या दरम्यान सुमारे ५.७ मीटर एवढी मोठी भरती आली होती. यामुळे अनेक ठिकाणी उघाड्यांच्या आणि बांधांच्या वरून हे पाणी शेतीत शिरले आहे. या शेतीचे तहसील आणि कृषी विभागाला पंचनामे करण्यास सांगितले आहेत. ज्या ठिकाणी बांध बंदिस्ती फुटली आहे तेथे रोजगार हमी योजनेअंतर्गत दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. - ए.एस.भारती, अभियंता, पेण खारलॅण्डखारलँण्ड विभाग आणि सिडकोच्या हलगर्जीपणामुळे दरवर्षी हे प्रकार घडतात. या विभागांनी खार बंदिस्ती दुरुस्तीची कामे वेळेवर हाती घेणे जरुरीचे आहे. तसेच अधिकाऱ्यांनी नुसते कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्षात काम करणे गरजेचे आहे. - वैजनाथ ठाकूर, सदस्य, जिल्हा परिषद जासई