शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

हजारो एकर भातशेतीचे नुकसान

By admin | Updated: November 4, 2015 00:53 IST

गेले दोन दिवस समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे खाडीच्या भोवतालचे शेतीच्या संरक्षणासाठी बांधलेले बांध खार बंदिस्ती फुटून अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले

उरण : गेले दोन दिवस समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे खाडीच्या भोवतालचे शेतीच्या संरक्षणासाठी बांधलेले बांध खार बंदिस्ती फुटून अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून दोन दिवस समुद्राला मोठी भरती आहे. या दिवशीच बांध फुटून शेकडो एकर जमिनीत खाडीचे पाणी घुसले आहे. काही ठिकाणी शेतात कापलेली भाताची कणस पाण्यामुळे वाहून गेली तर काही भिजल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.उरण तालुक्यातील बेलोंडाखार, खोपटे खाडी, दादरपाडा मोठीजुई, हरिश्चंद्र कोटा, चिखली भोम तसेच पनवेल तालुक्यातील केळवणे गावाजवळील खार बंदिस्ती या मोठ्या उधाणामुळे फुटली आहे. या खार बंदिस्तीची देखभाल करण्याची जबाबदारी ही खारलँण्ड विभाग आणि सिडकोकडे आहे. मात्र गेल्या काही वर्षात खारलँण्ड विभागाने उरण भागात कोणत्याही प्रकारची दुरुस्तीची कामे केली नसल्यामुळे खार बंदिस्ती आणि उघाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या भरतीने सुद्धा या उघड्या आणि खार बंदिस्ती फुटून भरतीचे खारे पाणी शेतीत घुसते. खारे पाणी एकदा का शेतीत घुसले तर त्या शेतीत किमान चार वर्षे तरी पीक घेता येत नाही.काही ठिकाणी शेतकरी स्वत:च खार बंदिस्तीच्या दुरुस्तीची कामे करून खाडी किनाऱ्यावर मोठ्या मेहनतीने शेती करत आहेत. मात्र नुकत्याच आलेल्या भरतीमुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली आहे.उरण पश्चिम विभागाची शेती बहुतांश सिडकोने संपादित केली असल्याने त्याची जबाबदारी सिडकोकडे येते. सिडकोने या भागात काही ठिकाणी खाडी किनारी उघाड्यांवर स्वयंचलित दरवाजे (प्लॅफ) बसविले आहेत. हे दरवाजे भरतीच्यावेळी आपोआप बंद होतात त्यामुळे भरतीचे पाणी नागरी भागात किंवा शेतीत घुसत नाही. मात्र गेल्या काही वर्षात हे फ्लॅफ खाडीच्या पाण्यानेकुजले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी या फ्लॅफमधून पाणी नागरी वस्तीत किंवा शेतीत येते.आॅगस्ट -२0१५ मध्ये उरण आणि पनवेल विभागातील खार बंदिस्तीच्या कामाबद्दल उरणचे आ. मनोहर भोईर यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या सोबत बैठक घेऊन ओएनजीसी, सिडको आणि जेएनपीटी या कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडातून १५ किलोमीटरचे बंधारे बांधण्यास सांगितले होते आणि या कंपन्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आमदार मनोहर भोईर यांनी सांगितले होते. मात्र त्या कामाबाबत कार्यवाही झाली नाही. (वार्ताहर)कोजागिरी पौर्णिमेच्या दरम्यान सुमारे ५.७ मीटर एवढी मोठी भरती आली होती. यामुळे अनेक ठिकाणी उघाड्यांच्या आणि बांधांच्या वरून हे पाणी शेतीत शिरले आहे. या शेतीचे तहसील आणि कृषी विभागाला पंचनामे करण्यास सांगितले आहेत. ज्या ठिकाणी बांध बंदिस्ती फुटली आहे तेथे रोजगार हमी योजनेअंतर्गत दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. - ए.एस.भारती, अभियंता, पेण खारलॅण्डखारलँण्ड विभाग आणि सिडकोच्या हलगर्जीपणामुळे दरवर्षी हे प्रकार घडतात. या विभागांनी खार बंदिस्ती दुरुस्तीची कामे वेळेवर हाती घेणे जरुरीचे आहे. तसेच अधिकाऱ्यांनी नुसते कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्षात काम करणे गरजेचे आहे. - वैजनाथ ठाकूर, सदस्य, जिल्हा परिषद जासई