शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

यंदाही मुंबई विभागात रायगड ठरला निकालात अव्वल; जिल्ह्याचा निकाल ९४.८३ टक्के

By राजेश भोस्तेकर | Updated: May 21, 2024 14:07 IST

यंदाही निकालात मुलींचाच डंका; रायगड जिल्ह्यात उच्च माध्यमिक विभागाने फेब्रुवारी महिन्यात बारावीची परीक्षा घेतली होती. 

लोकमत न्युज नेटवर्क

अलिबाग : रायगड जिल्हा हा मुंबई विभागात यंदाही उच्च माध्यमिक बारावीच्या परीक्षेत अव्वल ठरला आहे. रायगड विभागाचा निकाल हा ९४.८३ टक्के लागला आहे. गतवर्षी पेक्षा यंदा निकालात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही रायगडात मुलींचाच बोलबाला राहिला आहे. जिल्ह्यात ९२.७१ टक्के मुले तर ९७.०१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गतवेळी पेक्षा यंदा मुलांचा ५ तर मुलीचा ३.४२ टक्क्यांनी निकाल वाढला आहे. जिल्ह्यात म्हसळा तालुका हा निकालात अव्वल ठरला आहे. 

रायगड जिल्ह्यात उच्च माध्यमिक विभागाने फेब्रुवारी महिन्यात बारावीची परीक्षा घेतली होती. जिल्ह्यात पंधरा तालुक्यातील १४ हजार ९३६ मुले तर १४ हजार ५३२ मुली असे एकूण २९ हजार ४६८ विद्यार्थ्याची परीक्षेसाठी नोंद झाली होती. यापैकी १४ हजार ८६० मुले तर १४ हजार ४८६ मुली असे एकूण २९ हजार ३४६ विद्यार्थीनी बारावीची परीक्षा दिली होती. १३ हजार ७७८ मुले तर १४ हजार ५३ मुली असे एकूण २७ हजार ८३१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत मुलींची आणि मुलांची  निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. 

विज्ञान ९८.७४ टक्के निकाल

विज्ञान शाखेचे जिल्ह्यात ६ हजार ५०३ मुले, ६ हजार ६७१ मुली असे एकूण १३ हजार १२० विद्यार्थी यांची परीक्षेसाठी नोंद झाली होती. यापैकी ६ हजार ४९० मुले, ६ हजार ६०६ मुली असे एकूण १३ हजार ९६ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. ६ हजार ३८० मुले, ६ हजार ५५२ असे एकूण १२ हजार ९३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९८.७४ टक्के निकाल लागला आहे. 

कला शाखेचा ८५.७२ टक्के निकाल

कला शाखेचे जिल्ह्यात २ हजार ९६० मुले, २ हजार ६७८ मुली असे ५ हजार ६३८ विद्यार्थ्याची नोंद झाली होती. यापैकी २ हजार ९२० मुले, २ हजार ६५१ मुली असे एकूण ५ हजार ५७१ जण परीक्षेला बसले होते. २ हजार ३४८ मुले, २ हजार ४२८ मुली असे एकूण ४ हजार ७७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण कला शाखेचे ८५.७२ टक्के निकाल लागला आहे. 

वाणिज्य शाखेचा ९५.२२ टक्के निकाल

वाणिज्य शाखेत जिल्ह्यातील ५ हजार १२२ मुले, ५ हजार ६४ मुली असे एकूण १० हजार १८६ विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. यापैकी ५ हजार १०६ मुले, ५ हजार ५७ मुली असे १० हजार १६३ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. ४ हजार ७६६ मुले, ४ हजार ९१२ मुली असे एकूण ९ हजार ६७८ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून एकूण ९५. २२ टक्के वाणिज्य शाखेचा निकाल लागला आहे.

किमान कौशल्य शाखेचा ८७.११ टक्के निकाल

जिल्ह्यात किमान कौशल्य शाखेचे ३१६ मुले, १७३ मुली असे एकूण ४८९ विद्यार्थी परीक्षेसाठी नोंद केली होती. ३०९ मुले, १७२ मुली अशा एकूण ४८१ विद्यार्थ्यानी किमान कौशल्य ची परीक्षा दिली होती. यापैकी २५८ मुले, १६१ मुली असे ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८७.११ टक्के किमान कौशल्यचा निकाल लागला आहे.

तालुका निहाय टक्केवारी

पनवेल ९७.८२ %, उरण ९३.२२ %, कर्जत ९४.२० टक्के, खालापूर ९०.०३ %, सुधागड ८४.३८%, पेण ९०.९४%, अलिबाग ९३.३२%, मुरुड ९०.५२%, रोहा ९५.२२%, माणगाव ९८.२५%, तळा ९७.८६%, श्रीवर्धन ९५.९८%, म्हसळा ९८.६८%, महाड ९२.०३%, पोलादपूर ९०.३९%.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल