शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

यंदाही मुंबई विभागात रायगड ठरला निकालात अव्वल; जिल्ह्याचा निकाल ९४.८३ टक्के

By राजेश भोस्तेकर | Updated: May 21, 2024 14:07 IST

यंदाही निकालात मुलींचाच डंका; रायगड जिल्ह्यात उच्च माध्यमिक विभागाने फेब्रुवारी महिन्यात बारावीची परीक्षा घेतली होती. 

लोकमत न्युज नेटवर्क

अलिबाग : रायगड जिल्हा हा मुंबई विभागात यंदाही उच्च माध्यमिक बारावीच्या परीक्षेत अव्वल ठरला आहे. रायगड विभागाचा निकाल हा ९४.८३ टक्के लागला आहे. गतवर्षी पेक्षा यंदा निकालात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही रायगडात मुलींचाच बोलबाला राहिला आहे. जिल्ह्यात ९२.७१ टक्के मुले तर ९७.०१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गतवेळी पेक्षा यंदा मुलांचा ५ तर मुलीचा ३.४२ टक्क्यांनी निकाल वाढला आहे. जिल्ह्यात म्हसळा तालुका हा निकालात अव्वल ठरला आहे. 

रायगड जिल्ह्यात उच्च माध्यमिक विभागाने फेब्रुवारी महिन्यात बारावीची परीक्षा घेतली होती. जिल्ह्यात पंधरा तालुक्यातील १४ हजार ९३६ मुले तर १४ हजार ५३२ मुली असे एकूण २९ हजार ४६८ विद्यार्थ्याची परीक्षेसाठी नोंद झाली होती. यापैकी १४ हजार ८६० मुले तर १४ हजार ४८६ मुली असे एकूण २९ हजार ३४६ विद्यार्थीनी बारावीची परीक्षा दिली होती. १३ हजार ७७८ मुले तर १४ हजार ५३ मुली असे एकूण २७ हजार ८३१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत मुलींची आणि मुलांची  निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. 

विज्ञान ९८.७४ टक्के निकाल

विज्ञान शाखेचे जिल्ह्यात ६ हजार ५०३ मुले, ६ हजार ६७१ मुली असे एकूण १३ हजार १२० विद्यार्थी यांची परीक्षेसाठी नोंद झाली होती. यापैकी ६ हजार ४९० मुले, ६ हजार ६०६ मुली असे एकूण १३ हजार ९६ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. ६ हजार ३८० मुले, ६ हजार ५५२ असे एकूण १२ हजार ९३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९८.७४ टक्के निकाल लागला आहे. 

कला शाखेचा ८५.७२ टक्के निकाल

कला शाखेचे जिल्ह्यात २ हजार ९६० मुले, २ हजार ६७८ मुली असे ५ हजार ६३८ विद्यार्थ्याची नोंद झाली होती. यापैकी २ हजार ९२० मुले, २ हजार ६५१ मुली असे एकूण ५ हजार ५७१ जण परीक्षेला बसले होते. २ हजार ३४८ मुले, २ हजार ४२८ मुली असे एकूण ४ हजार ७७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण कला शाखेचे ८५.७२ टक्के निकाल लागला आहे. 

वाणिज्य शाखेचा ९५.२२ टक्के निकाल

वाणिज्य शाखेत जिल्ह्यातील ५ हजार १२२ मुले, ५ हजार ६४ मुली असे एकूण १० हजार १८६ विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. यापैकी ५ हजार १०६ मुले, ५ हजार ५७ मुली असे १० हजार १६३ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. ४ हजार ७६६ मुले, ४ हजार ९१२ मुली असे एकूण ९ हजार ६७८ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून एकूण ९५. २२ टक्के वाणिज्य शाखेचा निकाल लागला आहे.

किमान कौशल्य शाखेचा ८७.११ टक्के निकाल

जिल्ह्यात किमान कौशल्य शाखेचे ३१६ मुले, १७३ मुली असे एकूण ४८९ विद्यार्थी परीक्षेसाठी नोंद केली होती. ३०९ मुले, १७२ मुली अशा एकूण ४८१ विद्यार्थ्यानी किमान कौशल्य ची परीक्षा दिली होती. यापैकी २५८ मुले, १६१ मुली असे ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८७.११ टक्के किमान कौशल्यचा निकाल लागला आहे.

तालुका निहाय टक्केवारी

पनवेल ९७.८२ %, उरण ९३.२२ %, कर्जत ९४.२० टक्के, खालापूर ९०.०३ %, सुधागड ८४.३८%, पेण ९०.९४%, अलिबाग ९३.३२%, मुरुड ९०.५२%, रोहा ९५.२२%, माणगाव ९८.२५%, तळा ९७.८६%, श्रीवर्धन ९५.९८%, म्हसळा ९८.६८%, महाड ९२.०३%, पोलादपूर ९०.३९%.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल