शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

मेंदडी आदिवासीवाडी तहानलेली; बंद बोअरवेल, विहीर आटल्याने पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 23:01 IST

दोन वर्षांपासून टंचाईची समस्या

गणेश प्रभाळेदिघी : रोजगारनिर्मितीसाठी पर्यटनाच्या जोडीला औद्योगिकीकरणाची भर पडत आहे. पर्यटनाने गजबजलेले सुविधापूर्ण शहर अशी म्हसळा तालुक्याची ओळख आहे. मात्र, पुणे-दिघी महामार्गालगत असणाऱ्या या तालुक्यातील मेंदडी आदिवासीवाडीला गेली दोन वर्षे शासनाच्या अनास्थेपायी पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. विकसित तालुका म्हणून ओळख पुढे येत असली तरी विकासापासून येथील नागरिक कोसो दूर आहेत.

दिघी-पुणे निर्मिती होत असलेल्या मार्गावर हे गाव आहे. एकीकडे झपाट्याने म्हसळा परिसरातील सुविधांयुक्त शहरांची होत असलेली उभारणी बहुचर्चित आहे. या ठिकाणापासून म्हसळा-दिघी मार्गावर एक किलोमीटरच्या अंतरावर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मेंदडी आदिवासीवाडीवर साधारण ८० कुटुंबांतील ३४० लोक राहतात. पाण्याची सुविधा सर्वत्र होत असतानाही मेंदडी आदिवासीवाडीवर अद्यापही पाणी आले नाही. परिणामी, येथील आदिवासी पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. त्यांच्या या मागणीकडे अद्यापपर्यंत फारसे कोणीही लक्ष दिले नाही. दरम्यान, आदिवासींसाठी सरकारने स्वतंत्र विभाग सुरू केला असताना प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत सरकारच्या काहीच सुविधा पोहोचत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणात दूरदृष्टी ठेवून विविध विकासकामे करण्यात आली. आजही येथील जनतेला ते वरदान ठरत आहेत. तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील प्रशासनाकडून लाखो रुपयांच्या योजना राबवण्यात आल्या. मात्र, या आदिवासीवाडी शेजारी एक धरण असून, या धरणाचे पाणी आदिवासी बांधवाना मिळत नाही. वेळोवेळी पाणी योजनेची मागणी होऊनसुद्धा येथील नागरिक पाण्यावाचून तहानलेले आहेत.

येथील सार्वजनिक विहीर पूर्णपणे कोरडी असून स्वदेश फाउंडेशनमार्फत बांधण्यात आलेली बोअरवेल बंद अवस्थेत आहे. दुसरी कोणतीच नळयोजना नसल्याने सध्या या गावात पाणी नाही, त्यामुळे ग्रामस्थ रानातील झºयातून पाणी आणून पितात. अशाने येथील पाणीप्रश्न कायमस्वरूपी दूर करणे प्रशासनाला आव्हानात्मक आहे. राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासनाच्या तत्परतेचा अभाव अशा कारणांमुळे मेंदडी आदिवासीवाडीवरील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे स्वप्न आजही अपूर्ण आहे. यामुळे आदिवासीवाडीत पाणीटंचाईची समस्या कायम आहे.गेल्या दीड वर्षापासून गावात पिण्यासाठी पाणी नाही. पाणीसमस्येमुळे ग्रामस्थांना वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो. त्यामुळे मजुरी बुडते. परिणामी, मेंदडी ग्रामपंचायतीकडून पाण्यासंबंधी ठराव घेऊन वरिष्ठांना सतत पत्र व्यवहार करून वाडीवर पाण्यासंबंधी मागणी केली होती. मात्र, अद्याप लक्ष दिलेच नाही. - जान्या धर्मा वाघमारे, माजी अध्यक्ष, आदिवासी समाज, मेंदडी

मेंदडी आदिवासीवाडीवरील पाण्याची समस्या असल्याने ग्रामस्थांनी केलेल्या बोअरवेल दुरुस्तीच्या मागणीनुसार वरिष्ठांना तत्काळ कळवण्यात आले आहे. यातून प्रशासनाने पाणीसमस्या कायमची मिटवण्यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करत आहोत. - राजश्री कांबळे, सरपंच, मेंदडी