शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

आदेश देऊनही वर्षभरात समस्यांवर कार्यवाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:03 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : हजारो आदिवासींचा समावेश

अलिबाग : केंद्र शासनाचा भारतीय वन कायदा २०१९ चा मसुदा रद्द करणे आणि कोकण विभागीय महसूल आयुक्तांनी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या निवारणार्थ दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी न केल्याने श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्ह्यातील तीन हजार आदिवासींनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्र्चा काढला.

श्रमजीवी संघटनेचे कार्याध्यक्ष केशव नानकर, उप कार्याध्यक्षा स्नेहा दुबे-पंडित, राज्य सरचिटणीस बाळाराम भोईर, रायगड जिल्हाध्यक्ष अशोक पवार, जिल्हा सरचिटणीस संजय गुरव आदीच्या नेतृत्वाखाली येथील क्रीडाभुवन मैदानावरून रानभाज्यांच्या टोपल्या व पालखीसह निघालेला मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. हिराकोट तलावाजवळ पोलिसांनी मोर्चा अडविला. त्यानंतर त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. या वेळी ठाणे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, दशरथ भालके, जिल्हा महिला प्रमुख योगिता दुर्गे आदी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाबाबत विचार मांडले.जिल्ह्यातील पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, सुधागड या तालुक्यात आदिवासी, कातकरी व ठाकूर कुटुंबे असून श्रमजीवी संघटना या आदिवासी कातकरी, ठाकूर, महिला, युवा व इतर मागासवर्गीयांसाठी कार्यरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा शासनाच्या राज्य आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्यात आदिवासी बांधवांच्या या विविध समस्यांबाबत चर्चा झाली. त्यानंतर कोकण विभागीय महसूल आयुक्तांनी संघटना पदाधिकारी व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊ न रायगड जिल्हा प्रशासनास लेखी आदेश दिले. त्या आदेशांचा अनेकदा पाठपुरावा करूनही वर्षभरात कोणतेही काम करण्यात आलेले नाही. या विषयांसंदर्भात १९ डिसेंबर २०१८ रोजी बैठक आयोजित करण्यासाठी दिलेल्या पत्रानंतर आजपर्यंत यावर बैठकही घेतलेली नसल्याचे शिष्टमंडळाने रायगडचे प्रभारी जिल्हाधिकारी भरत शितोळे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.नऊ मागण्यांचे निवेदनभारतीय वन कायदा (सुधारणा) २०१९ चा केंद्र सरकारच्या मसुद्यातील आदिवासींचा हक्क डावलणाºया जाचक अटी तत्काळ रद्द करण्यात याव्यात, मसुद्यात वन अधिकाऱ्यांना दिलेले अमर्यादित अधिकार रद्द करावे, वनांचे खासगीकरण करून भांडवलदार कंपन्यांना वनशेती करण्याची तरतूद रद्द करावी, वन संसाधनावर असलेला आदिवासींचा पारंपरिक अधिकार अबाधित राखावा, संयुक्त वन व्यवस्थापनाऐवजी वन हक्कदारांची समिती गठित करून त्यांच्यावर वन संवर्धन व संरक्षण करण्याची सक्ती करण्यात यावी, आदी नऊ मागण्यांचा समावेश आहे.जिल्हाधिकारी घेणार बैठकश्रमजीवी संघटना पदाधिकारी व आदिवासी बांधव यांच्यासमवेत निवेदनात नमूद मागण्यांबाबत प्रभारी जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी चर्चा केली. मोर्चाने दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने १२ जुलै रोजी पनवेल येथे रायगडचे जिल्हाधिकारी, संबंधित महसूल अधिकारी आणि अन्य शासकीय विभागांचे अधिकारी आणि श्रमजीवी संघटना पदाधिकारी यांची संयुक्त बैठक पनवेलमध्ये आयोजित करून निर्णय घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग