शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

उमटे धरणात पाणी कमी अन् गाळ जास्त; गढूळ पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका

By निखिल म्हात्रे | Updated: May 3, 2024 14:18 IST

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर, अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरण रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित आहे

अलिबाग : येथील ४५ वर्षे जुन्या उमटे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून पाणी कमी अन् गाळ जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा गाळ काढला जात नसल्यामुळे आजही येथील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून विविध प्रकारच्या जलजन्य आजारांचा धोका उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरण रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित आहे. अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये १९७८-७९ या कालावधीत उमटे धरण बांधण्यात आले. या धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा, चौल या ग्रामपंचायत हद्दीतील ४५ गावांतील सुमारे ६० हजारांहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या धरणाने तळ गाठला आहे. त्याचा परिणाम तालुक्यातील हजारो नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब, कावीळ, विषमज्वरसारखे जलजन्य आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अनेक गावे, वाड्यांना तीन दिवसाआड पाणीधरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पाणी कपातीचे संकट सुरू झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून या पाणी कपातीत वाढ करण्यात आली आहे. अनेक गावे, वाड्यांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून हजारो नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे.

लोकांच्या डोक्यातील राजकीय गुलामीचा गाळ निघत नाही तोपर्यंत उमटे धरण आणि त्यातील गाळ तसाच राहणार आहे. आम्ही २०१६ पासून आजपर्यंत या विषयावर अर्ज, तक्रारी करीत आहोत. उमटे धरणाच्या गाळाच्या आणि पाण्याच्या प्रश्नासाठी आता उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ लोकांवर येणे हे राज्यकर्ते आणि प्रशासनाचे अपयश आहे.- ॲड. राकेश पाटील, उमटे धरण आंदोलनकर्ते