शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

उमटे धरणात पाणी कमी अन् गाळ जास्त; गढूळ पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका

By निखिल म्हात्रे | Updated: May 3, 2024 14:18 IST

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर, अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरण रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित आहे

अलिबाग : येथील ४५ वर्षे जुन्या उमटे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून पाणी कमी अन् गाळ जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा गाळ काढला जात नसल्यामुळे आजही येथील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून विविध प्रकारच्या जलजन्य आजारांचा धोका उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरण रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित आहे. अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये १९७८-७९ या कालावधीत उमटे धरण बांधण्यात आले. या धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा, चौल या ग्रामपंचायत हद्दीतील ४५ गावांतील सुमारे ६० हजारांहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या धरणाने तळ गाठला आहे. त्याचा परिणाम तालुक्यातील हजारो नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब, कावीळ, विषमज्वरसारखे जलजन्य आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अनेक गावे, वाड्यांना तीन दिवसाआड पाणीधरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पाणी कपातीचे संकट सुरू झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून या पाणी कपातीत वाढ करण्यात आली आहे. अनेक गावे, वाड्यांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून हजारो नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे.

लोकांच्या डोक्यातील राजकीय गुलामीचा गाळ निघत नाही तोपर्यंत उमटे धरण आणि त्यातील गाळ तसाच राहणार आहे. आम्ही २०१६ पासून आजपर्यंत या विषयावर अर्ज, तक्रारी करीत आहोत. उमटे धरणाच्या गाळाच्या आणि पाण्याच्या प्रश्नासाठी आता उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ लोकांवर येणे हे राज्यकर्ते आणि प्रशासनाचे अपयश आहे.- ॲड. राकेश पाटील, उमटे धरण आंदोलनकर्ते