शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

रानसईतील जखमींवर उपचार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:32 IST

रानसईमधील आदिवासींना कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू झाला व सात जण जखमी झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

नवी मुंबई : रानसईमधील आदिवासींना कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू झाला व सात जण जखमी झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक लस दिली आहे; परंतु रानसईमधील नागरिकांवर मात्र अद्याप उपचार करण्यात आले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.कर्नाळा किल्ल्याच्या समोरील डोंगरावर उरण तालुक्यातील रानसई आदिवासीपाड्यांमध्ये कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू झाल्याने पूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. उपचार न मिळाल्याने, या दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित सात जणांवरही अद्याप योग्य उपचार करण्यात आलेले नाहीत. त्या सर्वांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत, तर एखाद्याची प्रकृती खालावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; परंतु रायगड जिल्हा परिषदेचे डॉक्टर अद्याप रानसईमध्ये गेलेले नाहीत. आदिवासींनी नक्की उपचारासाठी कोठे जायचे, याविषयीही त्यांना कोणीच मार्गदर्शन केलेले नाही. दोघांचा बळी गेला असून, अजून किती जणांचा बळी गेल्यावर यंत्रणा जागी होणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.मयत अनिकेत शिंगवा शिक्षण घेत असलेल्या आदिवासी आश्रमशाळेतील व्यवस्थापनाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याची कार्यवाही सोमवारीच सुरू केली आहे. मंगळवारीही विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून कोणाला काही बाधा होऊ नये, यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे; परंतु ज्या आदिवासीपाड्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, त्या पाड्यांमध्ये मात्र नागरिकांना अद्याप प्रतिबंधात्मक लस देण्यात न आल्याने नाराजी वाढू लागली आहे.