शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

रानसईतील जखमींवर उपचार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:32 IST

रानसईमधील आदिवासींना कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू झाला व सात जण जखमी झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

नवी मुंबई : रानसईमधील आदिवासींना कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू झाला व सात जण जखमी झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक लस दिली आहे; परंतु रानसईमधील नागरिकांवर मात्र अद्याप उपचार करण्यात आले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.कर्नाळा किल्ल्याच्या समोरील डोंगरावर उरण तालुक्यातील रानसई आदिवासीपाड्यांमध्ये कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू झाल्याने पूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. उपचार न मिळाल्याने, या दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित सात जणांवरही अद्याप योग्य उपचार करण्यात आलेले नाहीत. त्या सर्वांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत, तर एखाद्याची प्रकृती खालावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; परंतु रायगड जिल्हा परिषदेचे डॉक्टर अद्याप रानसईमध्ये गेलेले नाहीत. आदिवासींनी नक्की उपचारासाठी कोठे जायचे, याविषयीही त्यांना कोणीच मार्गदर्शन केलेले नाही. दोघांचा बळी गेला असून, अजून किती जणांचा बळी गेल्यावर यंत्रणा जागी होणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.मयत अनिकेत शिंगवा शिक्षण घेत असलेल्या आदिवासी आश्रमशाळेतील व्यवस्थापनाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याची कार्यवाही सोमवारीच सुरू केली आहे. मंगळवारीही विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून कोणाला काही बाधा होऊ नये, यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे; परंतु ज्या आदिवासीपाड्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, त्या पाड्यांमध्ये मात्र नागरिकांना अद्याप प्रतिबंधात्मक लस देण्यात न आल्याने नाराजी वाढू लागली आहे.