शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील महिलांचे सर्वच क्षेत्रातील काम कौतुकास्पद : पालकमंत्री उदय सामंत

By निखिल म्हात्रे | Updated: October 26, 2023 13:51 IST

मंत्री अदिती तटकरे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 18 नवदुर्गांचा सन्मान 

अलिबाग -जिल्ह्यातील महिलांचे सर्वच क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे. राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई , राणी लक्ष्मीबाई यांचा वारसा त्या समर्थपणे पेलत आहेत. आपल्या कार्याद्वारे विविध क्षेत्रात ठसा उमटवत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवदुर्गा सन्मान सोहळा 2023 अंतर्गत पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन नागोठणे येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांची प्रमुख उपस्थित होती. या कार्यक्रमात मंत्री अदिती तटकरे यासह सामाजिक, शासकीय, पोलीस, वैद्यकीय सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 18 महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

सन्मानित करण्यात येणाऱ्या नवदुर्गांचे कौतुक करताना पालकमंत्री सामंत म्हणाले, पोलीस दलात देखील विविध पदांवर कार्यरत राहून आमच्या महिला भगिनी उत्तम कामगिरी बजावत असून त्या दुर्गामातेचा अवतार आहे. मुलींना स्वसंरक्षणासाठी सक्षम होतील असा उपक्रम व प्रशिक्षण पोलीस दलाने राबवावा त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ तसेच बचत गटांच्यासाठी काम करणाऱ्या महिला समन्वयकांना रत्नागिरी जिल्ह्याच्या धर्तीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोबाईल फोन देण्यात येतील ज्यामुळे त्यांचे ते काम कार्यक्षमपणे करू शकतील, असे ते म्हणाले.

विशेष नवदुर्गा पुरस्कार स्वीकारल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .त्या म्हणाल्या, नवरात्र निमित्ताने हा सन्मान केला जात असून या उत्सवात देखील महिला पोलीस अधिकारी पासून ते गृहिणींपर्यंत सर्व महिला उत्साहाने सहभागी असतात त्यांच्या व्यस्ततेमुळे हा सन्मान सोहळा नवरात्र नंतर होत आहे. महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या मुलांना देखील पुरेसा वेळ देऊ शकत नाही, याची खंत त्यांना वाटत असेल पण त्यांच्यामुळेच समाजातील इतर सर्व मुलं सुरक्षित असतात. नवदुर्गांच्या कार्याचा सन्मान हा महत्त्वाचा आहे. असे सांगून सन्मान झालेल्या विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याची माहिती देऊन मंत्री तटकरे यांनी गौरव केला. 

कार्यक्रमात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी पोलीस दलात जवळपास 30 टक्के महिला असून त्या आपली जबाबदारी सक्षमतेने पूर्ण करीत आहेत . डायल 112 च्या माध्यमातून पथकाचा जिल्ह्यातील सरासरी रिस्पॉन्स टाईम सहा मिनिट आहे . शहरी व ग्रामीण दुर्गम भागात देखील डायल 112 वर कॉल प्राप्त झाल्यानंतर पथक तातडीने पोहोचते असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरे