शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

जिल्ह्यातील महिलांचे सर्वच क्षेत्रातील काम कौतुकास्पद : पालकमंत्री उदय सामंत

By निखिल म्हात्रे | Updated: October 26, 2023 13:51 IST

मंत्री अदिती तटकरे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 18 नवदुर्गांचा सन्मान 

अलिबाग -जिल्ह्यातील महिलांचे सर्वच क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे. राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई , राणी लक्ष्मीबाई यांचा वारसा त्या समर्थपणे पेलत आहेत. आपल्या कार्याद्वारे विविध क्षेत्रात ठसा उमटवत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवदुर्गा सन्मान सोहळा 2023 अंतर्गत पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन नागोठणे येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांची प्रमुख उपस्थित होती. या कार्यक्रमात मंत्री अदिती तटकरे यासह सामाजिक, शासकीय, पोलीस, वैद्यकीय सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 18 महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

सन्मानित करण्यात येणाऱ्या नवदुर्गांचे कौतुक करताना पालकमंत्री सामंत म्हणाले, पोलीस दलात देखील विविध पदांवर कार्यरत राहून आमच्या महिला भगिनी उत्तम कामगिरी बजावत असून त्या दुर्गामातेचा अवतार आहे. मुलींना स्वसंरक्षणासाठी सक्षम होतील असा उपक्रम व प्रशिक्षण पोलीस दलाने राबवावा त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ तसेच बचत गटांच्यासाठी काम करणाऱ्या महिला समन्वयकांना रत्नागिरी जिल्ह्याच्या धर्तीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोबाईल फोन देण्यात येतील ज्यामुळे त्यांचे ते काम कार्यक्षमपणे करू शकतील, असे ते म्हणाले.

विशेष नवदुर्गा पुरस्कार स्वीकारल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .त्या म्हणाल्या, नवरात्र निमित्ताने हा सन्मान केला जात असून या उत्सवात देखील महिला पोलीस अधिकारी पासून ते गृहिणींपर्यंत सर्व महिला उत्साहाने सहभागी असतात त्यांच्या व्यस्ततेमुळे हा सन्मान सोहळा नवरात्र नंतर होत आहे. महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या मुलांना देखील पुरेसा वेळ देऊ शकत नाही, याची खंत त्यांना वाटत असेल पण त्यांच्यामुळेच समाजातील इतर सर्व मुलं सुरक्षित असतात. नवदुर्गांच्या कार्याचा सन्मान हा महत्त्वाचा आहे. असे सांगून सन्मान झालेल्या विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याची माहिती देऊन मंत्री तटकरे यांनी गौरव केला. 

कार्यक्रमात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी पोलीस दलात जवळपास 30 टक्के महिला असून त्या आपली जबाबदारी सक्षमतेने पूर्ण करीत आहेत . डायल 112 च्या माध्यमातून पथकाचा जिल्ह्यातील सरासरी रिस्पॉन्स टाईम सहा मिनिट आहे . शहरी व ग्रामीण दुर्गम भागात देखील डायल 112 वर कॉल प्राप्त झाल्यानंतर पथक तातडीने पोहोचते असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरे