शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

जिल्ह्यातील महिलांचे सर्वच क्षेत्रातील काम कौतुकास्पद : पालकमंत्री उदय सामंत

By निखिल म्हात्रे | Updated: October 26, 2023 13:51 IST

मंत्री अदिती तटकरे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 18 नवदुर्गांचा सन्मान 

अलिबाग -जिल्ह्यातील महिलांचे सर्वच क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे. राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई , राणी लक्ष्मीबाई यांचा वारसा त्या समर्थपणे पेलत आहेत. आपल्या कार्याद्वारे विविध क्षेत्रात ठसा उमटवत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवदुर्गा सन्मान सोहळा 2023 अंतर्गत पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन नागोठणे येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांची प्रमुख उपस्थित होती. या कार्यक्रमात मंत्री अदिती तटकरे यासह सामाजिक, शासकीय, पोलीस, वैद्यकीय सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 18 महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

सन्मानित करण्यात येणाऱ्या नवदुर्गांचे कौतुक करताना पालकमंत्री सामंत म्हणाले, पोलीस दलात देखील विविध पदांवर कार्यरत राहून आमच्या महिला भगिनी उत्तम कामगिरी बजावत असून त्या दुर्गामातेचा अवतार आहे. मुलींना स्वसंरक्षणासाठी सक्षम होतील असा उपक्रम व प्रशिक्षण पोलीस दलाने राबवावा त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ तसेच बचत गटांच्यासाठी काम करणाऱ्या महिला समन्वयकांना रत्नागिरी जिल्ह्याच्या धर्तीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोबाईल फोन देण्यात येतील ज्यामुळे त्यांचे ते काम कार्यक्षमपणे करू शकतील, असे ते म्हणाले.

विशेष नवदुर्गा पुरस्कार स्वीकारल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .त्या म्हणाल्या, नवरात्र निमित्ताने हा सन्मान केला जात असून या उत्सवात देखील महिला पोलीस अधिकारी पासून ते गृहिणींपर्यंत सर्व महिला उत्साहाने सहभागी असतात त्यांच्या व्यस्ततेमुळे हा सन्मान सोहळा नवरात्र नंतर होत आहे. महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या मुलांना देखील पुरेसा वेळ देऊ शकत नाही, याची खंत त्यांना वाटत असेल पण त्यांच्यामुळेच समाजातील इतर सर्व मुलं सुरक्षित असतात. नवदुर्गांच्या कार्याचा सन्मान हा महत्त्वाचा आहे. असे सांगून सन्मान झालेल्या विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याची माहिती देऊन मंत्री तटकरे यांनी गौरव केला. 

कार्यक्रमात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी पोलीस दलात जवळपास 30 टक्के महिला असून त्या आपली जबाबदारी सक्षमतेने पूर्ण करीत आहेत . डायल 112 च्या माध्यमातून पथकाचा जिल्ह्यातील सरासरी रिस्पॉन्स टाईम सहा मिनिट आहे . शहरी व ग्रामीण दुर्गम भागात देखील डायल 112 वर कॉल प्राप्त झाल्यानंतर पथक तातडीने पोहोचते असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरे