शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

विठ्ठल मंदिराची जत्रा म्हणजे अलिबागकरांसाठी पर्वणीच

By निखिल म्हात्रे | Updated: December 7, 2023 13:59 IST

दरवर्षी या जत्रेतील उलाढाल कोटींच्या घरात असते. प्रचंड गर्दी असूनही तेवढीच शिस्त‍बदध म्हणून या जत्रेकडे पाहिले जाते.

अलिबाग - भात कापणीचा हंगाम संपला की कोकणात गावोगावच्या जत्रांना सुरूवात होते. अलिबाग तालुक्याकतील वरसोली येथील आंग्रेकालीन विठ्ठल मंदिराची जत्रा म्हणजे अलिबागकरांसाठीच पर्वणीच. पारंपरिकपणाचा बाज जपणाऱ्या या जत्रेत बदलणाऱ्या काळाचीही झलक दिसतेय. या यात्रोत्सवाला शुक्रवार पासून सुरुवात होत आहे. त्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.

अलिबागजवळचे वरसोली गावचे आंग्रेकालीन विठ्ठ्ल मंदिर, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुतणे रघुजी आणि त्यांच्या पत्नी नर्मदाबाई आंग्रे यांनी अठराव्या शतकात या मंदिरांची बांधणी केल्याची इतिहासात नोंद आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील निर्मल एकादशीला या मंदिरात जत्रोत्सव असतो. जत्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तब्बल पाच दिवस चालणारी ही जत्रा अलिबागकरांसह जिल्ह्यातील भाविकांसाठी मोठी पर्वणी असते. जत्रेच्या निमित्ताने चालणारा व्यापार उदीम हा आजही छोट्या छोट्या दुकानदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. जत्रेतील या दुकांनाचा बच्चेकंपनीसह मोठेही आनंद लुटतात. वरसोलीच्या जत्रेने जपलेली खाद्यसंस्कृती हा देखील या जत्रेतला मौजेचाच भाग असतो. शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापाऱ्यांनाही या जत्रेमुळे सुगीचे दिवस येत असतात. देवाच्या पूजेसाठी लागणारया फुलांपासून अगदी केरसुणीपर्यंतची विक्री इथं होत असते. दरवर्षी या जत्रेतील उलाढाल कोटींच्या घरात असते. प्रचंड गर्दी असूनही तेवढीच शिस्त‍बदध म्हणून या जत्रेकडे पाहिले जाते.

टॅग्स :Raigadरायगडaligarh-pcअलीगढ