शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पाऊस, तुडतुड्याने मोहोर खाल्ला; आंबा बागायतदारांची झोप उडाली! अवकाळीमुळे आंबा पीक अडचणीत

By निखिल म्हात्रे | Updated: March 8, 2024 11:17 IST

आंबा उत्पादनावर परिणाम होऊन तुडतुड्या, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे.

अलिबाग : जिल्ह्यातील अनेक भागांत मागील शुक्रवारी सकाळी अवकाळी पाऊस कोसळला होता. या पावसामुळे आंब्याचा फुललेला मोहर काळा पडण्याची शक्यता आहे. त्याचा आंबा उत्पादनावर परिणाम होऊन तुडतुड्या, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे १४ हजार हेक्टर आंबा लागवडीचे क्षेत्र आहे. त्यात आंबा उत्पादनाचे साडेबारा हजार हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक आंबा उत्पादक शेतकरी आहेत. या उत्पादनातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत आहे. रायगड जिल्ह्यातील काही आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच वाशी मार्केटमध्ये तयार आंबा विक्रीस नेला असला तरी बहुतांश बागायतदारांच्या बागेतील कलमे अद्याप मोहरत आहेत.

मोहर टिकवण्यासाठी त्यावर करावी लागणारी औषध फवारणी व अन्य उपाययोजना करूनही फलधारणा कशी होते, याकडे बागायतदारांचे लक्ष लागले असताना, पुन्हा एकदा पडलेल्या अवकाळीमुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे. परिणामी, यावर्षी उत्पादन लांबणीवर पडणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात घट होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे.काही बागांमध्ये आंब्याला मोहर येत आहे, तर काही ठिकाणी कैरी तयार होण्याबरोबरच आंबेदेखील तयार झाले आहेत; परंतु आठवड्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे तुडतुड्या, बुरशीजन्य रोग येण्याची भीती आहे. त्यामुळे दहा टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आहे.- चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघअवकाळी पाऊस फारच कमी पडला आहे. त्यामुळे आंबा उत्पादनावर परिणाम होणार नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी आलेले मोहर गळून पडेल; परंतु शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.- उज्ज्वला बाणखेले, अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी