शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

"सरकार येत्या २-३ दिवसात निर्यात शुल्क कमी करण्याबाबत सकात्मक निर्णय घेईल"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2023 20:19 IST

शुल्क वाढीनंतर आतापर्यंत ४० टक्के शुल्क भरुन सुमारे ६० कार्गो व्यापाऱ्यांनी निर्यात केले असल्याची माहिती ॲग्रो प्रोडक्ट एक्सपोर्टर असोशिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी दिली.

मधुकर ठाकूर

उरण :  कांद्याच्या निर्यातीवर अचानकपणे वाढविण्यात आलेल्या ४० टक्के करवाढीविरोधात निर्यातदारांच्या पाच दिवसांच्या संघर्षानंतर केंद्र सरकार येत्या दोन- तीन दिवसात निर्यात शुल्क कमी करण्याबाबत सकात्मक निर्णय घेईल असा विश्वास ॲग्रो प्रोडक्ट एक्सपोर्टर असोशिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी व्यक्त केला आहे.

 केंद्र सरकारने शनिवारी अचानक कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मात्र व्यापारी, शेतकरी, निर्यातदार आर्थिक संकटात सापडले आहेत.काही व्यापाऱ्यांनी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ४० टक्के शुल्क भरुन कांद्याचे कार्गो निर्यात केले आहेत.तर काहींनी ४० टक्के शुल्क परवडत नसल्याने कांद्याचे कार्गो निर्यात करण्याऐवजी जवळच्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आले आहेत.असे जवळपास १०० कांद्याचे कार्गो नजीकच्या बाजारात विक्रीसाठी पाठविले आहेत.तर शुल्क वाढीनंतर आतापर्यंत ४० टक्के शुल्क भरुन सुमारे ६० कार्गो व्यापाऱ्यांनी निर्यात केले असल्याची माहिती ॲग्रो प्रोडक्ट एक्सपोर्टर असोशिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी दिली.

केंद्र सरकारच्या कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क वाढीच्या निर्णयामुळे व्यापारी, शेतकरी आणि निर्यातदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.याचे पडसाद देशभरात उमटले आहेत.केंद्र सरकारच्या शुल्कवाढी विरोधात उफाळून आलेल्या संघर्षानंतरयाबाबत सकारात्मक धोरण स्वीकारण्याच्या हालचाली केंद्राने सुरू केल्या आहेत.यामुळे केंद्र सरकार येत्या दोन- तीन दिवसात निर्यात शुल्क कमी करण्याबाबत सकात्मक निर्णय घेईल असा विश्वास ॲग्रो प्रोडक्ट एक्सपोर्टर असोशिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी व्यक्त केला आहे.